[ad_1]
तासगाव, जि. सांगली : गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. त्यात शुक्रवारी (ता.२५) पडलेल्या पावसाने द्राक्ष हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात द्राक्ष उत्पादकांना फटका बसला आहे. द्राक्ष दर कोसळण्याची भीती वर्तविली जात आहे. द्राक्ष तडकण्याच्या (क्रॅकिंग) भीतीने व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबविली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
हंगाम सुरू झाल्यानंतर द्राक्षाला अपेक्षित दर नव्हते. त्यानंतर मागणीही कमी होईल, अशा दुहेरी संकटात सापडला होता. गेल्या काही दिवसांपासून द्राक्षाची मागणी वाढली आहे. दरातदेखील सुधारणा झाली आहे. द्राक्ष हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. अजून शेकडो एकर द्राक्षे बागेतच आहेत. तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले. काही गावांत बागेत पाणी साठले. तासगाव, विसापूर, हातनूर, वासुंबे, कवठेएकंदमध्ये जोरदार पाऊस झाला. शनिवारी (ता.२६) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.
शेतकऱ्यांच्या पोटात गोळा
ज्या बागांमधील द्राक्षाची काढणी झाली आहे, त्यांना हा पाऊस चांगला आहे. मात्र ज्या बागांमध्ये द्राक्षे अजून वेलीवर आहेत, अशा बागांमध्ये द्राक्ष क्रॅकिंगची भीती आहे. परिणामी द्राक्ष व्यापाऱ्यांनी अनेक गावांमध्ये द्राक्ष काढणी थांबविल्याचे चित्र आहे. बदलत्या वातावरणाचा फायदा व्यापारी उचलण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.
तासगाव, जि. सांगली : गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. त्यात शुक्रवारी (ता.२५) पडलेल्या पावसाने द्राक्ष हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात द्राक्ष उत्पादकांना फटका बसला आहे. द्राक्ष दर कोसळण्याची भीती वर्तविली जात आहे. द्राक्ष तडकण्याच्या (क्रॅकिंग) भीतीने व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबविली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
हंगाम सुरू झाल्यानंतर द्राक्षाला अपेक्षित दर नव्हते. त्यानंतर मागणीही कमी होईल, अशा दुहेरी संकटात सापडला होता. गेल्या काही दिवसांपासून द्राक्षाची मागणी वाढली आहे. दरातदेखील सुधारणा झाली आहे. द्राक्ष हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. अजून शेकडो एकर द्राक्षे बागेतच आहेत. तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले. काही गावांत बागेत पाणी साठले. तासगाव, विसापूर, हातनूर, वासुंबे, कवठेएकंदमध्ये जोरदार पाऊस झाला. शनिवारी (ता.२६) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.
शेतकऱ्यांच्या पोटात गोळा
ज्या बागांमधील द्राक्षाची काढणी झाली आहे, त्यांना हा पाऊस चांगला आहे. मात्र ज्या बागांमध्ये द्राक्षे अजून वेलीवर आहेत, अशा बागांमध्ये द्राक्ष क्रॅकिंगची भीती आहे. परिणामी द्राक्ष व्यापाऱ्यांनी अनेक गावांमध्ये द्राक्ष काढणी थांबविल्याचे चित्र आहे. बदलत्या वातावरणाचा फायदा व्यापारी उचलण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.
[ad_2]
Source link