[ad_1]
अंबाजोगाई, जि. बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा, वीज व अतिरिक्त उसाचा प्रश्नावर आक्रमक शेतकऱ्यांनी अंबाजोगाई तहसील कार्यालयावर मंगळवारी (ता.८) मोर्चा काढला. या आधी अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) परळी तहसील कार्यालयावर धडक दिली होती.
परळीपासून पुणे-मुंबईपर्यंत वारंवार दाद मागूनही प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आता आणखी विलंब करून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तत्परतेने मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी अंबाजोगाई तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली.
या मोर्चात कॉ. अजय बुरांडे, कॉ. उत्रेश्वर इंगोले, कॉ. दिनेश शेप, कॉ. रवींद्र देवरवाडे, कॉ. जगन्नाथ धाळे, कॉ. दत्तात्रेय नेवल, कॉ. विष्णू जाधव, कॉ. राहुल हाके, कॉ. गणपत गायके आदी सहभागी झाले.
..या आहेत मागण्या
२०२० च्या खरीप व रब्बी पिकांचा पीकविमा जमा करा, २०२१ चा पीकविमा नुकसानीच्या प्रमाणात सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने जमा करा. २०१८ च्या पीकविम्यापासून वंचित सर्व शेतकऱ्यांना विमा वितरित करा, उसाचे पंचनामे करून ऊस कार्यक्षेत्राबाहेर नेऊन गाळप करावा. वेळेत एफआरपीनुसार रक्कम आदा करावी. १५ महिन्यांपुढील उसाला नुकसान भरपाई द्यावी, विद्युतपुरवठा सुरळीत करावा.


अंबाजोगाई, जि. बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा, वीज व अतिरिक्त उसाचा प्रश्नावर आक्रमक शेतकऱ्यांनी अंबाजोगाई तहसील कार्यालयावर मंगळवारी (ता.८) मोर्चा काढला. या आधी अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) परळी तहसील कार्यालयावर धडक दिली होती.
परळीपासून पुणे-मुंबईपर्यंत वारंवार दाद मागूनही प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आता आणखी विलंब करून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तत्परतेने मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी अंबाजोगाई तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली.
या मोर्चात कॉ. अजय बुरांडे, कॉ. उत्रेश्वर इंगोले, कॉ. दिनेश शेप, कॉ. रवींद्र देवरवाडे, कॉ. जगन्नाथ धाळे, कॉ. दत्तात्रेय नेवल, कॉ. विष्णू जाधव, कॉ. राहुल हाके, कॉ. गणपत गायके आदी सहभागी झाले.
..या आहेत मागण्या
२०२० च्या खरीप व रब्बी पिकांचा पीकविमा जमा करा, २०२१ चा पीकविमा नुकसानीच्या प्रमाणात सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने जमा करा. २०१८ च्या पीकविम्यापासून वंचित सर्व शेतकऱ्यांना विमा वितरित करा, उसाचे पंचनामे करून ऊस कार्यक्षेत्राबाहेर नेऊन गाळप करावा. वेळेत एफआरपीनुसार रक्कम आदा करावी. १५ महिन्यांपुढील उसाला नुकसान भरपाई द्यावी, विद्युतपुरवठा सुरळीत करावा.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.