[ad_1]
मालेगाव कॅम्प, जि. नाशिक : काळाची गरज ओळखून विषमुक्त शेतीकडे हळूहळू शेतकरी वळत आहेत. कृषी शिक्षणाचे धडे गिरवणारे अनेक विद्यार्थी यात कामकाज करत आहेत. येथील एचएच श्री श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सेंद्रिय शेतीचे प्रयोग करून त्यात यशस्वी उत्पादन घेण्यासाठी कार्यरत आहेत.
महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर दीड एकरांवर विद्यार्थ्यांच्या मदतीने सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पाची अंमलबजावणी करत प्रत्येक कर्मचाऱ्याकडे प्रकल्पाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यानुसार दर आठवड्याला आढावा घेतला जातो. प्रकल्प अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रक्षेत्रावर कामाचे नियोजन, व्यवस्थापनही केले जाते. ग्राहकांच्या पसंती व मागणीनुसार पिकांची निवड करून बारमाही पिके उपलब्ध होतील यादृष्टीने पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने पीक लागवड केली जात आहेत.
महाविद्यालयाच्या परिसरात सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासह कच्च्या मालाची उपलब्धता करण्यात आली आहे. दुग्धविकास विभागाकडे गोवंश असल्याने मुबलक प्रमाणात शेण व गोमूत्र उपलब्ध होते. नाडेप कंपोस्टसह गांडूळ खत, व्हर्मिवॉश तयार करून त्याचा वापर केला जातो. सेंद्रिय शेती प्रकल्पात पूजा बच्छाव, कोमल डांगे, चेतना रायते, समीक्षा पवार, दीक्षिता हिरे, सूरज गायकवाड, संदीप कदम, राकेश चव्हाण, रूपेश पवार, प्रसाद बोरसे, विकास जाधव, कृष्णा वाघ, सुहास नाईकनवरे, निखिल रसाळ यांचा सहभाग आहे.
कामकाजाच्या ठळक बाबी
- लागवडीपूर्वी भाजीपाला बियाण्यास बीजामृत व ट्रायकोडर्मा यांची प्रक्रिया
- वेलवर्गीय, कंदवर्गीय व वेलवर्गीय ३० हून अधिक प्रकारच्या भाजीपाला लागवड
- वीस गुंठे यानुसार संपूर्ण प्रक्षेत्रावर एकात्मिक कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे यांचा प्रभावी वापर. यासह जैविक कीडनाशकांच्या फवारण्या.
- ग्राहकांच्या मागणीनुसार, रंग, चव यावरून टप्प्याटप्प्याने काढणी
- माल काढणीवेळी स्वच्छता, गुणवत्ता,पॅकिंग यावर विद्यार्थ्याकडून विशेष काळजी
- उत्पादित शेतीमालाची ग्राहकांना विक्री
प्रतिक्रिया…
महाविद्यालयात या शेतीचा पर्याय म्हणून आम्ही निवड केली. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने उभ्या केलेल्या या प्रकल्पाचा भविष्यात विस्तार केला जाईल.
– डॉ. पंकज सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी
महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर कृषी अनुभवातून शिक्षण या संकल्पनेतून सेंद्रिय भाजीपाला लागवड करून त्याची विक्री व्यवस्था सुरू केली आहे, येणाऱ्या काळात वर्षभर भाजीपाला, फळे उपलब्ध असतील असे प्रयत्न केले जात आहेत.
– डॉ. सतीश राऊत, प्राचार्य
मालेगाव कॅम्प, जि. नाशिक : काळाची गरज ओळखून विषमुक्त शेतीकडे हळूहळू शेतकरी वळत आहेत. कृषी शिक्षणाचे धडे गिरवणारे अनेक विद्यार्थी यात कामकाज करत आहेत. येथील एचएच श्री श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सेंद्रिय शेतीचे प्रयोग करून त्यात यशस्वी उत्पादन घेण्यासाठी कार्यरत आहेत.
महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर दीड एकरांवर विद्यार्थ्यांच्या मदतीने सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पाची अंमलबजावणी करत प्रत्येक कर्मचाऱ्याकडे प्रकल्पाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यानुसार दर आठवड्याला आढावा घेतला जातो. प्रकल्प अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रक्षेत्रावर कामाचे नियोजन, व्यवस्थापनही केले जाते. ग्राहकांच्या पसंती व मागणीनुसार पिकांची निवड करून बारमाही पिके उपलब्ध होतील यादृष्टीने पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने पीक लागवड केली जात आहेत.
महाविद्यालयाच्या परिसरात सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासह कच्च्या मालाची उपलब्धता करण्यात आली आहे. दुग्धविकास विभागाकडे गोवंश असल्याने मुबलक प्रमाणात शेण व गोमूत्र उपलब्ध होते. नाडेप कंपोस्टसह गांडूळ खत, व्हर्मिवॉश तयार करून त्याचा वापर केला जातो. सेंद्रिय शेती प्रकल्पात पूजा बच्छाव, कोमल डांगे, चेतना रायते, समीक्षा पवार, दीक्षिता हिरे, सूरज गायकवाड, संदीप कदम, राकेश चव्हाण, रूपेश पवार, प्रसाद बोरसे, विकास जाधव, कृष्णा वाघ, सुहास नाईकनवरे, निखिल रसाळ यांचा सहभाग आहे.
कामकाजाच्या ठळक बाबी
- लागवडीपूर्वी भाजीपाला बियाण्यास बीजामृत व ट्रायकोडर्मा यांची प्रक्रिया
- वेलवर्गीय, कंदवर्गीय व वेलवर्गीय ३० हून अधिक प्रकारच्या भाजीपाला लागवड
- वीस गुंठे यानुसार संपूर्ण प्रक्षेत्रावर एकात्मिक कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे यांचा प्रभावी वापर. यासह जैविक कीडनाशकांच्या फवारण्या.
- ग्राहकांच्या मागणीनुसार, रंग, चव यावरून टप्प्याटप्प्याने काढणी
- माल काढणीवेळी स्वच्छता, गुणवत्ता,पॅकिंग यावर विद्यार्थ्याकडून विशेष काळजी
- उत्पादित शेतीमालाची ग्राहकांना विक्री
प्रतिक्रिया…
महाविद्यालयात या शेतीचा पर्याय म्हणून आम्ही निवड केली. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने उभ्या केलेल्या या प्रकल्पाचा भविष्यात विस्तार केला जाईल.
– डॉ. पंकज सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी
महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर कृषी अनुभवातून शिक्षण या संकल्पनेतून सेंद्रिय भाजीपाला लागवड करून त्याची विक्री व्यवस्था सुरू केली आहे, येणाऱ्या काळात वर्षभर भाजीपाला, फळे उपलब्ध असतील असे प्रयत्न केले जात आहेत.
– डॉ. सतीश राऊत, प्राचार्य
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.