[ad_1]
पुणे : सूर्य तळपल्याने कोकणात उष्णतेची लाट आली आहे. राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १६) राज्याच्या कमाल तापमानात वाढ कायम राहण्याबरोबरच कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरुणाचलपासून दक्षिण कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. विषुववृत्ताजवळील हिंद महासागर आणि लगतच असलेल्या बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे या भागात आज (ता. १६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यातच कोकणात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होत आहे.
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसानंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आज (ता.१६) कोकणासह, गुजरात, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरीसह, सांताक्रूझ, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील अकोला, वाशीम, चंद्रपूर आणि वर्धा येथे तापमानाचा पारा ३८ अंशांपार गेल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत.
मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३५.८, धुळे ३७, जळगाव ३९, कोल्हापूर ३६, महाबळेश्वर ३०.९, मालेगाव ३८.०, नाशिक ३६.२, निफाड ३४.५, सांगली ३६.६, सातारा ३६.२, सोलापूर ३८.४, सांताक्रूझ ३९.९, डहाणू ३४.८, रत्नागिरी ४०.२, औरंगाबाद ३७.३, परभणी ३८.२, अकोला ३९, अमरावती ३७.८, बुलडाणा ३६, ब्रह्मपुरी ३७.९, चंद्रपूर ३८, गडचिरोली ३६, गोंदिया ३६, नागपूर ३७.४, वर्धा ३८.८, वाशीम ३८.५, यवतमाळ ३५.
उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : रत्नागिरी ४०.२, सांताक्रूझ ३९.९, जळगाव ३९, अकोला ३९, वर्धा ३८.८, वाशीम ३८.५, सोलापूर ३८.४, परभणी ३८.२, मालेगाव ३८, चंद्रपूर ३८.
पुणे : सूर्य तळपल्याने कोकणात उष्णतेची लाट आली आहे. राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १६) राज्याच्या कमाल तापमानात वाढ कायम राहण्याबरोबरच कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरुणाचलपासून दक्षिण कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. विषुववृत्ताजवळील हिंद महासागर आणि लगतच असलेल्या बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे या भागात आज (ता. १६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यातच कोकणात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होत आहे.
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसानंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आज (ता.१६) कोकणासह, गुजरात, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरीसह, सांताक्रूझ, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील अकोला, वाशीम, चंद्रपूर आणि वर्धा येथे तापमानाचा पारा ३८ अंशांपार गेल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत.
मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३५.८, धुळे ३७, जळगाव ३९, कोल्हापूर ३६, महाबळेश्वर ३०.९, मालेगाव ३८.०, नाशिक ३६.२, निफाड ३४.५, सांगली ३६.६, सातारा ३६.२, सोलापूर ३८.४, सांताक्रूझ ३९.९, डहाणू ३४.८, रत्नागिरी ४०.२, औरंगाबाद ३७.३, परभणी ३८.२, अकोला ३९, अमरावती ३७.८, बुलडाणा ३६, ब्रह्मपुरी ३७.९, चंद्रपूर ३८, गडचिरोली ३६, गोंदिया ३६, नागपूर ३७.४, वर्धा ३८.८, वाशीम ३८.५, यवतमाळ ३५.
उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : रत्नागिरी ४०.२, सांताक्रूझ ३९.९, जळगाव ३९, अकोला ३९, वर्धा ३८.८, वाशीम ३८.५, सोलापूर ३८.४, परभणी ३८.२, मालेगाव ३८, चंद्रपूर ३८.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.