[ad_1]
चंद्रपूर : उन्हाची काहिली वाढण्यासोबतच जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी प्रश्न गंभीर होण्याची भीती वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २०२०-२१ या वर्षाकरिता कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ५२५ गावांकरिता १५ कोटींच्या निधीची मागणी आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या कमीच पावसाची नोंद झाली. त्यामुळे सिंचन प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. जिल्ह्याची भूजल पातळी देखील खालावत असून, बोअरवेल व विहिरींनी अनेक भागात तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५२५ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भूजल सर्व्हेक्षण विभागाने आपल्या अहवालात तसे संकेत दिले आहेत. त्याचाच आधार घेत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या आराखड्यानुसार भाग दोनमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान ५२५ गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. त्यावर मात करण्यासाठी ६३८ कामांचे नियोजन करण्यात आले. भाग एक, दोन व तीन साठी १४ कोटी ९६ लाखांच्या निधीची गरज आहे.
शासनाकडून किमान पहिल्या भागातील १२ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी तत्काळ मिळाला नाही, तर उपाययोजनांची कामे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर निधीसाठी पाठपुरावा केला जात आहे.
एप्रिल, जूनमध्ये प्रशासनाकडून ३० गावांमध्ये ३० टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावीत आहे. याकरिता २ कोटी २२ लाख २५ हजाराची तरतूद आराखड्यात आहे. पाणीटंचाईमुळे सिंदेवाही, गोंडपिपरी हे तालुके सर्वाधीक प्रभावित होणार आहेत.
एकूण गावे ः १४२६
- संभाव्य टंचाईग्रस्त गावे ः १३३३
- बोअरवेल दुरुस्ती ः ११७
- विहिरीतील गाळ काढणे ः ५४९
- नवीन विंधन विहिरींसह हातपंप ः ३४७
- पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती ः १४७
चंद्रपूर : उन्हाची काहिली वाढण्यासोबतच जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी प्रश्न गंभीर होण्याची भीती वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २०२०-२१ या वर्षाकरिता कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ५२५ गावांकरिता १५ कोटींच्या निधीची मागणी आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या कमीच पावसाची नोंद झाली. त्यामुळे सिंचन प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. जिल्ह्याची भूजल पातळी देखील खालावत असून, बोअरवेल व विहिरींनी अनेक भागात तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५२५ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भूजल सर्व्हेक्षण विभागाने आपल्या अहवालात तसे संकेत दिले आहेत. त्याचाच आधार घेत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या आराखड्यानुसार भाग दोनमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान ५२५ गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. त्यावर मात करण्यासाठी ६३८ कामांचे नियोजन करण्यात आले. भाग एक, दोन व तीन साठी १४ कोटी ९६ लाखांच्या निधीची गरज आहे.
शासनाकडून किमान पहिल्या भागातील १२ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी तत्काळ मिळाला नाही, तर उपाययोजनांची कामे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर निधीसाठी पाठपुरावा केला जात आहे.
एप्रिल, जूनमध्ये प्रशासनाकडून ३० गावांमध्ये ३० टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावीत आहे. याकरिता २ कोटी २२ लाख २५ हजाराची तरतूद आराखड्यात आहे. पाणीटंचाईमुळे सिंदेवाही, गोंडपिपरी हे तालुके सर्वाधीक प्रभावित होणार आहेत.
एकूण गावे ः १४२६
- संभाव्य टंचाईग्रस्त गावे ः १३३३
- बोअरवेल दुरुस्ती ः ११७
- विहिरीतील गाळ काढणे ः ५४९
- नवीन विंधन विहिरींसह हातपंप ः ३४७
- पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती ः १४७
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.