[ad_1]
मुंबई : तलाठ्यांना सज्जाच्या ठिकाणी राहण्याची सक्ती करावी. जे तलाठी राहणार नाहीत, त्यांचा घरभत्ता बंद करावा, अशी मागणी विधानसभेत सदस्यांनी केली. या बाबत तातडीने विचार करू, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील आंबी येथील तलाठी कार्यालय बंद असल्याचा मुद्दा मांडून तारांकित प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत प्रकाश सोळंके, प्रकाश आबिटकर, रणधीर सावंत यांनी सहभाग घेतला.
संगमनेर तालुक्यातील आंबी येथील तलाठी कार्यालयाला गेल्या काही महिन्यांपासून टाळे लागले आहे. त्यामुळे बोटो, केळवाडी, म्हासवंडी कुरकुटवाडी, माळवाडी, आंबीद दुमाला येथील शेतीविषयक वारसा नोंदी, दाखले, उतारे, सातबारा दुरुस्ती, सातबारा फेरफार आदी कामे थांबली आहेत. या कार्यालयात वीजच नसल्याने तेथे संगणक चालविणे शक्य नाही, याकडे विखे यांनी महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले.
यावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ‘‘या कार्यालयात तलाठी नियमित होत होते. काही काळ येथे अतिरिक्त कार्यभार होता. कोरोना काळात बिल न भरल्याने काही काळ वीज नव्हती. मात्र, लॅपटॉपवरून सातबारा उतारे देणे सुरू होते. त्यामुळे असा प्रकार झाला आहे, असे वाटत नाही.’’
या चर्चेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘सरकारने तलाठी कार्यालये सुसज्ज केली. मात्र, त्या कार्यालयात तलाठी उपस्थित असतो का हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार शेतकऱ्यांना त्रास देतात. निश्चित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करायला हवा, याबाबत सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा.’’
यावर सत्तार यांनी तलाठी कार्यालयात वेळेत काम व्हावीत, या साठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असे सांगितले.
मुंबई : तलाठ्यांना सज्जाच्या ठिकाणी राहण्याची सक्ती करावी. जे तलाठी राहणार नाहीत, त्यांचा घरभत्ता बंद करावा, अशी मागणी विधानसभेत सदस्यांनी केली. या बाबत तातडीने विचार करू, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील आंबी येथील तलाठी कार्यालय बंद असल्याचा मुद्दा मांडून तारांकित प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत प्रकाश सोळंके, प्रकाश आबिटकर, रणधीर सावंत यांनी सहभाग घेतला.
संगमनेर तालुक्यातील आंबी येथील तलाठी कार्यालयाला गेल्या काही महिन्यांपासून टाळे लागले आहे. त्यामुळे बोटो, केळवाडी, म्हासवंडी कुरकुटवाडी, माळवाडी, आंबीद दुमाला येथील शेतीविषयक वारसा नोंदी, दाखले, उतारे, सातबारा दुरुस्ती, सातबारा फेरफार आदी कामे थांबली आहेत. या कार्यालयात वीजच नसल्याने तेथे संगणक चालविणे शक्य नाही, याकडे विखे यांनी महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले.
यावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ‘‘या कार्यालयात तलाठी नियमित होत होते. काही काळ येथे अतिरिक्त कार्यभार होता. कोरोना काळात बिल न भरल्याने काही काळ वीज नव्हती. मात्र, लॅपटॉपवरून सातबारा उतारे देणे सुरू होते. त्यामुळे असा प्रकार झाला आहे, असे वाटत नाही.’’
या चर्चेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘सरकारने तलाठी कार्यालये सुसज्ज केली. मात्र, त्या कार्यालयात तलाठी उपस्थित असतो का हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार शेतकऱ्यांना त्रास देतात. निश्चित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करायला हवा, याबाबत सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा.’’
यावर सत्तार यांनी तलाठी कार्यालयात वेळेत काम व्हावीत, या साठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असे सांगितले.
[ad_2]
Source link