[ad_1]
जालना ः फळपीक विमा योजनेत असलेल्या अनेक त्रुटीनी शेतकऱ्यांना विमा उतरविण्यापासून वंचित ठेवले. या त्रुटी दूर करून विमा भरण्यापासून वंचित राहिलेल्या असंख्य शेतकऱ्यांसाठी या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय दमोतराव मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मोरे यांच्या निवेदनानुसार हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अनेक त्रुटी आहेत. प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेत आपल्या फळपिकांचा विमा उतरविण्याचा ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. फळपिकाला सर्वात जास्त धोका हा गारपिटीपासून आहे.
पीक गारपिटीपासून संरक्षित करण्यासाठी या योजनेत अतिरिक्त रक्कम भरावी लागते. ती रक्कम भरण्यास शेतकरी तयारही आहे. परंतु सदरील संकेत स्थळावर ही रक्कम भरण्यासाठी आवश्यक रकानाच उपलब्ध नाही.
‘तापमानाचे प्रमाणक चुकीचे’
याशिवाय ३१ मार्च पर्यंतच दिलेले ४० अंश सेल्सिअस तापमानाचे प्रमाणक सुद्धा चुकीचे आहे. खऱ्या तापमानाचा पारा हा मे महिन्यात वाढत असल्याने या प्रमाणकात बदल करून पूर्वी प्रमाणेच ३१ मे पर्यंत त्याचा कालावधी असावा, असे शेतकरी मोरे यांनी म्हटले आहे. संकटे सांगून येत नाहीत. संकट काळात फळपीक विमा योजनाच शेतकऱ्यांना एक आधार ठरू शकते, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
जालना ः फळपीक विमा योजनेत असलेल्या अनेक त्रुटीनी शेतकऱ्यांना विमा उतरविण्यापासून वंचित ठेवले. या त्रुटी दूर करून विमा भरण्यापासून वंचित राहिलेल्या असंख्य शेतकऱ्यांसाठी या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय दमोतराव मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मोरे यांच्या निवेदनानुसार हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अनेक त्रुटी आहेत. प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेत आपल्या फळपिकांचा विमा उतरविण्याचा ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. फळपिकाला सर्वात जास्त धोका हा गारपिटीपासून आहे.
पीक गारपिटीपासून संरक्षित करण्यासाठी या योजनेत अतिरिक्त रक्कम भरावी लागते. ती रक्कम भरण्यास शेतकरी तयारही आहे. परंतु सदरील संकेत स्थळावर ही रक्कम भरण्यासाठी आवश्यक रकानाच उपलब्ध नाही.
‘तापमानाचे प्रमाणक चुकीचे’
याशिवाय ३१ मार्च पर्यंतच दिलेले ४० अंश सेल्सिअस तापमानाचे प्रमाणक सुद्धा चुकीचे आहे. खऱ्या तापमानाचा पारा हा मे महिन्यात वाढत असल्याने या प्रमाणकात बदल करून पूर्वी प्रमाणेच ३१ मे पर्यंत त्याचा कालावधी असावा, असे शेतकरी मोरे यांनी म्हटले आहे. संकटे सांगून येत नाहीत. संकट काळात फळपीक विमा योजनाच शेतकऱ्यांना एक आधार ठरू शकते, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
[ad_2]
Source link