[ad_1]
नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या ६७ हजार शेतकऱ्यांना परतावा मिळाला होता. यानंतर ज्या शेतकऱ्यांना दावा दाखल करुनही विमा मिळाला नाही तसेच इतरही शेतकऱ्यांना नुकसानीबाबत भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ५२ हजार ८४५ शेतकऱ्यांनी विमा कंपनी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले आहेत.
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून ७२ तासाच्या आत वैयक्तीक दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते. परंतु यात अनेकांनी दावा करुनही विमा मिळाला नाही, अशी तक्रार होती. तसेच अनेकांनी कंपनीचा संपर्क लागला नसल्यामुळे तक्रारी करता आल्या नाहीत.
यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. यानुसार जिल्ह्यातील ५२ हजार ८४५ शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत अर्ज सादर केले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १३९, सोळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ८०१ तर विमा कंपनीकडे ५१ हजार ९०५ अर्ज आल्याची माहिती मिळाली.
आपत्ती काळातील आठ हजार तक्रारी
जिल्ह्यातून तक्रारींचा ओघ सुरु झाल्यानंतर मदत न मिळालेल्या तक्रारीत पाच हजार ७४७ अर्जांचा समावेश आहे. क्रॉप इन्शुरंस ॲपवर ६३०, टोलफ्री क्रमांकावर १४७०, मेलवर तारीख नसलेले २३० अशा आठ हजार तक्रारींचा समावेश आहे. तर नैसर्गिक आपत्ती काळात तक्रार न केलेले ४३ हजार ९९८ अर्ज मिळाल्याची माहिती कंपनीकडून मिळाली.
पीकविम्याची स्थिती
दाखल दावे : ७३ हजार
शेतकऱ्यांना भरपाई : ६७,६२२
भरपाई रक्कम : ६४ कोटी
नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या ६७ हजार शेतकऱ्यांना परतावा मिळाला होता. यानंतर ज्या शेतकऱ्यांना दावा दाखल करुनही विमा मिळाला नाही तसेच इतरही शेतकऱ्यांना नुकसानीबाबत भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ५२ हजार ८४५ शेतकऱ्यांनी विमा कंपनी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले आहेत.
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून ७२ तासाच्या आत वैयक्तीक दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते. परंतु यात अनेकांनी दावा करुनही विमा मिळाला नाही, अशी तक्रार होती. तसेच अनेकांनी कंपनीचा संपर्क लागला नसल्यामुळे तक्रारी करता आल्या नाहीत.
यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. यानुसार जिल्ह्यातील ५२ हजार ८४५ शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत अर्ज सादर केले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १३९, सोळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ८०१ तर विमा कंपनीकडे ५१ हजार ९०५ अर्ज आल्याची माहिती मिळाली.
आपत्ती काळातील आठ हजार तक्रारी
जिल्ह्यातून तक्रारींचा ओघ सुरु झाल्यानंतर मदत न मिळालेल्या तक्रारीत पाच हजार ७४७ अर्जांचा समावेश आहे. क्रॉप इन्शुरंस ॲपवर ६३०, टोलफ्री क्रमांकावर १४७०, मेलवर तारीख नसलेले २३० अशा आठ हजार तक्रारींचा समावेश आहे. तर नैसर्गिक आपत्ती काळात तक्रार न केलेले ४३ हजार ९९८ अर्ज मिळाल्याची माहिती कंपनीकडून मिळाली.
पीकविम्याची स्थिती
दाखल दावे : ७३ हजार
शेतकऱ्यांना भरपाई : ६७,६२२
भरपाई रक्कम : ६४ कोटी
[ad_2]
Source link