[ad_1]
परळी, जि. बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा व अतिरिक्त उसाचा प्रश्नावर शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.७) परळीत तहसील कार्यालयावर धडक दिली. या वेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील किसान सभेच्या निवेदनानुसार, या अगोदर परळीपासून पुणे-मुंबईपर्यंत वारंवार दाद मागून ही आमचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आता आणखी विलंब करून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तत्परतेने मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. पी. एस. घाडगे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. गंगाधर पोटभरे, कॉ. बाळासाहेब कडभाने, कॉ. विशाल देशमुख यांची भाषणे झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शेजूळ यांना देण्यात आले.
या वेळी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार शेजूळ, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. किसान सभेतर्फे आज (ता.८) अंबाजोगाई तहसीलवर, त्यानंतर ११ मार्च रोजी धारूर तहसीलवर, १४ मार्च रोजी माजलगाव तहसिलवर, तर १६ मार्च रोजी वडवणी तहसिलवर मोर्चा काढणार असल्याची माहिती कॉ. बुरांडे यांनी दिली.
प्रशासनाने या वर्षीच्या अतिवृष्टी अनुदानाचा २५ टक्के रक्कमेचा राहिलेला दुसरा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचे गाळप करून होणारे नुकसान कमी करावे. रासायनिक खतांची दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा यासाठी किसान सभा तीव्र लढा उभारणार आहे.
– कॉ. अजय बुरांडे.
अशा आहेत मागण्या
२०२० चा खरीप व रब्बी पिकांचा पीकविमा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करा, २०२१ चा पीकविमा नुकसानीच्या प्रमाणात सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने जमा करा. कोणताही विमाधारक शेतकरी या पासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्या. २०१८ च्या पीकविम्यापासून वंचित सर्व शेतकऱ्यांना विमारक्कम द्या आदी मागण्या करण्यात आल्या.
परळी, जि. बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा व अतिरिक्त उसाचा प्रश्नावर शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.७) परळीत तहसील कार्यालयावर धडक दिली. या वेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील किसान सभेच्या निवेदनानुसार, या अगोदर परळीपासून पुणे-मुंबईपर्यंत वारंवार दाद मागून ही आमचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आता आणखी विलंब करून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तत्परतेने मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. पी. एस. घाडगे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. गंगाधर पोटभरे, कॉ. बाळासाहेब कडभाने, कॉ. विशाल देशमुख यांची भाषणे झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शेजूळ यांना देण्यात आले.
या वेळी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार शेजूळ, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. किसान सभेतर्फे आज (ता.८) अंबाजोगाई तहसीलवर, त्यानंतर ११ मार्च रोजी धारूर तहसीलवर, १४ मार्च रोजी माजलगाव तहसिलवर, तर १६ मार्च रोजी वडवणी तहसिलवर मोर्चा काढणार असल्याची माहिती कॉ. बुरांडे यांनी दिली.
प्रशासनाने या वर्षीच्या अतिवृष्टी अनुदानाचा २५ टक्के रक्कमेचा राहिलेला दुसरा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचे गाळप करून होणारे नुकसान कमी करावे. रासायनिक खतांची दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा यासाठी किसान सभा तीव्र लढा उभारणार आहे.
– कॉ. अजय बुरांडे.
अशा आहेत मागण्या
२०२० चा खरीप व रब्बी पिकांचा पीकविमा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करा, २०२१ चा पीकविमा नुकसानीच्या प्रमाणात सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने जमा करा. कोणताही विमाधारक शेतकरी या पासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्या. २०१८ च्या पीकविम्यापासून वंचित सर्व शेतकऱ्यांना विमारक्कम द्या आदी मागण्या करण्यात आल्या.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.