• Home
  • Blog
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
Tuesday, May 17, 2022
Amhi Kastkar™
No Result
View All Result
  • Login
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result
Home शेती

प्रतिकूलतेशी लढताना नैसर्गिक आयुधांचा वापर

Team Amhi Kastkar™ by Team Amhi Kastkar™
28 February 2022
in शेती
0
प्रतिकूलतेशी लढताना नैसर्गिक आयुधांचा वापर
0
SHARES
0
VIEWS

[ad_1]

गत भागामध्ये आपण राजस्थानची भौगोलिक रचना जाणून घेतली. त्यातून राजस्थानचे पश्‍चिम आणि पूर्व असे दोन भाग पडतात. पश्‍चिम भाग हा थरच्या वाळवंटामुळे पूर्णपणे वालुकामय आहे. या ६० टक्के भागात शेती फारच कमी, मात्र खुरटे काटेरी जंगल जास्त आहे. येथे पाऊसही जेमतेम ३०० मि.मी., त्यामुळे वाहणाऱ्या नद्या वाळवंटातच जिरून जातात. भूगर्भातील पाणीही अल्प आणि खूप खोल गेलेले. मॉन्सूनच्या ऑगस्ट, सप्टेंबरमधील पावसावरच थोडीफार शेती होते. या तुलनेत पूर्व भाग पाणी, शेती आणि विविध पिकांनी समृद्ध आहे. येथे पश्‍चिमेच्या तुलनेत दुप्पट पाऊस (६०० मि.मी. व अधिक) पडतो. खरेतर वाळवंटात राहण्याची सवय, कडक हिवाळा आणि तेवढाच अतिउष्ण उन्हाळा याची येथील लोकांना सवय आहे. वातावरण बदलाच्या झळा गेल्या दोन, तीन दशकांमध्ये थोड्या थोड्या जाणवू लागल्या असल्या तर सर्वसामान्य शेतकरी मात्र त्यापासून अनभिज्ञ आहेत. ज्यांना हे बदल जाणवले आहेत, असे शेतकरी सावध पावले टाकत आहेत.
राज्याने २०१० मध्ये वातावरण बदलाचा अहवाल तयार केला. त्यामधील संभाव्य संकटे आणि भविष्यामधील उपाययोजना याबद्दल शासनाच्या कृषी विज्ञान केंद्रे, सामाजिक संस्था मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. अहवालानुसार ‘थर’च्या विशाल वाळवंटात वादळांची संख्या वाढणार आहे, सोबत पावसाचे प्रमाणसुद्धा वाढणार आहे. पडणारा हा पाऊस जमिनीत जास्तीत जास्त कसा मुरवता येईल. त्यातून भूजलाची पातळी वाढवता येईल, यावर भर दिला जात आहे. शेतकऱ्‍यांच्या कार्यशाळा घेतल्या जात असून, नावीन्यपूर्ण प्रयोगांचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारीही शासन दाखवत आहे.
१) गावकुसामध्ये ठरावीक आकाराचे खड्डे घेऊन, प्लॅस्टिकचे अस्तर लावून शेतकरी त्यात पावसाचे पाणी साठवतात.
२) वातावरण बदलास सामोरे जाण्यासाठी शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या भरड धान्यांची शिफारस केली जात आहे. या वाणांचे वैशिष्ट्य म्हणजे ताण सहन करत उत्पादन देण्याची क्षमता होय. यातूनच बाजरीचे पीक राजस्थानात अधिक यशस्वी झाले आहे. कमी पावसात टपोरे दाणे, धान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध होतो.

महाराष्ट्रातही हे करणे शक्य ः

राजस्थानमध्ये गाव पातळीवर बाजरीचा कडबा खरेदी करून त्यापासून मुरघास केला जातो. शेतकऱ्यांना योग्य किमतीमध्ये पुरवला जातो. परिणामी, शेतकऱ्यांचा पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. राजस्थानमधील दुग्ध उत्पादकांची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. आपल्या महाराष्ट्रातही गाव पातळीवर असे प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. एकाच जागी बांधून पशुपालन करणे, विकतचा चारा, कडबा, पेंड इ. पशुखाद्य यातून खर्चाचे प्रमाण वाढत आहे. सोबतच अशी बांधलेली जनावरांकडून अधिक मिथेन उत्सर्जित होतो. हा मिथेन वातावरण उष्ण करण्यात कारणीभूत ठरतो. म्हणूनच शेताला मजबूत बांध आणि त्यावर जनावरांना चरण्यासाठी गवत वाढविलेले असावे. अगदी अल्पभूधारक शेतकरीही आपल्या चार पाच गुंठ्यामध्ये बाजरीसारखी ताण सहनशील पिके घेऊ शकतो. या पिकाचे अवशेष म्हणजेच चारा गाव पातळीवर एखाद्या गटाला मुरघास करण्यासाठी देता येईल. त्याचा फायदा गावातील दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. राजस्थानमधील शेतकऱ्यांनी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून मार्ग काढला. एकापेक्षा एक यशकथा निर्माण केल्या आहेत.

निसर्गाचीच आयुधे ठरली महत्त्वाची

भारत पाकिस्तान सीमेपासून १५० कि.मी. आत जैसलमेर जिल्ह्यामधील चंदनगावचा रहिवासी असलेला रघुवीर सिंग. चारही दिशांना वाळवंट, जेमतेम १६० मि.मी. पाऊस, सातत्याने येणारी वाळूची वादळे, तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत. अशा प्रतिकूल वातावरणात हा शेतकरी भूगर्भामधील अल्पशा पाण्यावर बडीशेप, मोहरी आणि भुईमुगाचे उत्पादन घेत असे. पाणी कमी म्हणून उत्पादन, उत्पन्न कमी. कुणास विचारायला जावे, सर्वांची जवळपास हीच स्थिती. उलट “यापुढे शेतीत काहीच अर्थ नाही, स्थलांतर हाच मार्ग आहे” असा नकारात्मक सल्ला मिळे. मात्र २०१६ मध्ये रघुवीर सिंग यांनी बारमेर जिल्ह्यामधील बालोट्रा गावात डाळिंब बागा पाहिल्या. आपण हे नवे पीक का घेऊ नये, या विचाराने काम सुरू केले. वाळवंटात डाळिंबाची शेती करण्याच्या कल्पनेलाच अन्य शेतकरी हसू लागले. अनेकांनी त्याला वेड्यात काढले. रघुवीर सिंग यांनी हार मानली नाही. त्यांनी डाळिंब शेतीचा अभ्यास केला. अगदी महाराष्ट्रामध्ये जात विविध डाळिंब बागांना भेटी दिल्या. येथील एका बागायतदाराकडून रोपे घेतानाच मी पहिल्यांदाच लागवड करतोय, मला मार्गदर्शन करा अशी विनंती केली. त्याची हमी मिळताच सुरुवातीस ४००० रोपे शेतात लावली. संपूर्ण बागेस मल्चिंग केले. ठिबक करून पाण्याचा कमीत कमी आणि कार्यक्षम वापर सुरू केला. वाळूची वादळे येणाऱ्या दिशेला आडवी नीम, देव बाभूळ यांची लागवड केली. परिणामी, वाळूच्या वादळापासून डाळिंब बागेचे रक्षण झाले. प्रयत्न, नवीन काहीतरी करण्याची जिद्द यातून वातावरण बदलास सडेतोड उत्तर दिले आहे. आज त्यांच्या एकूण ८५ एकर शेतीपैकी ३५ एकरांवर डाळिंब, ५० एकरांवर कापूस आहे. ९००० डाळिंबाची बाग फुललेली आहे. २०२० मध्ये त्यांच्या बागेत डाळिंबाची पहिली तोडणी झाली. त्यातून त्यांना ११ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता साडेसात लाख रुपये निव्वळ नफा होता. कापसाचे उत्पादनही ३०० क्विंटल झाले. त्यातून ७ लाख रु. मिळाले. राजस्थानच्या वाळवंटात लहान मोठ्या झुडूप वर्गामधील वृक्षच जास्त टिकाव धरू शकतात, या शास्त्रीय अभ्यासावर या शेतकऱ्याने आपली यशकथा लिहिली.

रघुवीर सिंग याच्याकडून आपण काय शिकायचे?
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हार मानावयाची नाही.
शेतीत सातत्याने नवीन प्रयोग करत राहायचे. त्याच त्या चक्रात अडकून पडावयाचे नाही.
पिकातील योग्य त्या तज्ज्ञांचा, अनुभवी व्यक्तींचा सल्ला, मार्गदर्शन घ्यायचे.
प्रतिकूल निसर्ग किंवा संकटाला सामोरे जाताना त्याच्याच आयुधांचा वापर करावयाचा.
नीट अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्‍वास यातून आपल्या महाराष्ट्रातही असे कितीतरी रघुवीर सिंग तयार होऊ शकतात. आपल्या शेतकऱ्यात ती क्षमता नक्कीच आहे.
————

News Item ID: 
820-news_story-1645351708-awsecm-790
Mobile Device Headline: 
प्रतिकूलतेशी लढताना नैसर्गिक आयुधांचा वापर
Appearance Status Tags: 
Section News
Site Section Tags: 
कृषी सल्ला
प्रतिकूलतेशी लढताना नैसर्गिक आयुधांचा वापरप्रतिकूलतेशी लढताना नैसर्गिक आयुधांचा वापर
Mobile Body: 

गत भागामध्ये आपण राजस्थानची भौगोलिक रचना जाणून घेतली. त्यातून राजस्थानचे पश्‍चिम आणि पूर्व असे दोन भाग पडतात. पश्‍चिम भाग हा थरच्या वाळवंटामुळे पूर्णपणे वालुकामय आहे. या ६० टक्के भागात शेती फारच कमी, मात्र खुरटे काटेरी जंगल जास्त आहे. येथे पाऊसही जेमतेम ३०० मि.मी., त्यामुळे वाहणाऱ्या नद्या वाळवंटातच जिरून जातात. भूगर्भातील पाणीही अल्प आणि खूप खोल गेलेले. मॉन्सूनच्या ऑगस्ट, सप्टेंबरमधील पावसावरच थोडीफार शेती होते. या तुलनेत पूर्व भाग पाणी, शेती आणि विविध पिकांनी समृद्ध आहे. येथे पश्‍चिमेच्या तुलनेत दुप्पट पाऊस (६०० मि.मी. व अधिक) पडतो. खरेतर वाळवंटात राहण्याची सवय, कडक हिवाळा आणि तेवढाच अतिउष्ण उन्हाळा याची येथील लोकांना सवय आहे. वातावरण बदलाच्या झळा गेल्या दोन, तीन दशकांमध्ये थोड्या थोड्या जाणवू लागल्या असल्या तर सर्वसामान्य शेतकरी मात्र त्यापासून अनभिज्ञ आहेत. ज्यांना हे बदल जाणवले आहेत, असे शेतकरी सावध पावले टाकत आहेत.
राज्याने २०१० मध्ये वातावरण बदलाचा अहवाल तयार केला. त्यामधील संभाव्य संकटे आणि भविष्यामधील उपाययोजना याबद्दल शासनाच्या कृषी विज्ञान केंद्रे, सामाजिक संस्था मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. अहवालानुसार ‘थर’च्या विशाल वाळवंटात वादळांची संख्या वाढणार आहे, सोबत पावसाचे प्रमाणसुद्धा वाढणार आहे. पडणारा हा पाऊस जमिनीत जास्तीत जास्त कसा मुरवता येईल. त्यातून भूजलाची पातळी वाढवता येईल, यावर भर दिला जात आहे. शेतकऱ्‍यांच्या कार्यशाळा घेतल्या जात असून, नावीन्यपूर्ण प्रयोगांचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारीही शासन दाखवत आहे.
१) गावकुसामध्ये ठरावीक आकाराचे खड्डे घेऊन, प्लॅस्टिकचे अस्तर लावून शेतकरी त्यात पावसाचे पाणी साठवतात.
२) वातावरण बदलास सामोरे जाण्यासाठी शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या भरड धान्यांची शिफारस केली जात आहे. या वाणांचे वैशिष्ट्य म्हणजे ताण सहन करत उत्पादन देण्याची क्षमता होय. यातूनच बाजरीचे पीक राजस्थानात अधिक यशस्वी झाले आहे. कमी पावसात टपोरे दाणे, धान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध होतो.

महाराष्ट्रातही हे करणे शक्य ः

राजस्थानमध्ये गाव पातळीवर बाजरीचा कडबा खरेदी करून त्यापासून मुरघास केला जातो. शेतकऱ्यांना योग्य किमतीमध्ये पुरवला जातो. परिणामी, शेतकऱ्यांचा पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. राजस्थानमधील दुग्ध उत्पादकांची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. आपल्या महाराष्ट्रातही गाव पातळीवर असे प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. एकाच जागी बांधून पशुपालन करणे, विकतचा चारा, कडबा, पेंड इ. पशुखाद्य यातून खर्चाचे प्रमाण वाढत आहे. सोबतच अशी बांधलेली जनावरांकडून अधिक मिथेन उत्सर्जित होतो. हा मिथेन वातावरण उष्ण करण्यात कारणीभूत ठरतो. म्हणूनच शेताला मजबूत बांध आणि त्यावर जनावरांना चरण्यासाठी गवत वाढविलेले असावे. अगदी अल्पभूधारक शेतकरीही आपल्या चार पाच गुंठ्यामध्ये बाजरीसारखी ताण सहनशील पिके घेऊ शकतो. या पिकाचे अवशेष म्हणजेच चारा गाव पातळीवर एखाद्या गटाला मुरघास करण्यासाठी देता येईल. त्याचा फायदा गावातील दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. राजस्थानमधील शेतकऱ्यांनी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून मार्ग काढला. एकापेक्षा एक यशकथा निर्माण केल्या आहेत.

निसर्गाचीच आयुधे ठरली महत्त्वाची

भारत पाकिस्तान सीमेपासून १५० कि.मी. आत जैसलमेर जिल्ह्यामधील चंदनगावचा रहिवासी असलेला रघुवीर सिंग. चारही दिशांना वाळवंट, जेमतेम १६० मि.मी. पाऊस, सातत्याने येणारी वाळूची वादळे, तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत. अशा प्रतिकूल वातावरणात हा शेतकरी भूगर्भामधील अल्पशा पाण्यावर बडीशेप, मोहरी आणि भुईमुगाचे उत्पादन घेत असे. पाणी कमी म्हणून उत्पादन, उत्पन्न कमी. कुणास विचारायला जावे, सर्वांची जवळपास हीच स्थिती. उलट “यापुढे शेतीत काहीच अर्थ नाही, स्थलांतर हाच मार्ग आहे” असा नकारात्मक सल्ला मिळे. मात्र २०१६ मध्ये रघुवीर सिंग यांनी बारमेर जिल्ह्यामधील बालोट्रा गावात डाळिंब बागा पाहिल्या. आपण हे नवे पीक का घेऊ नये, या विचाराने काम सुरू केले. वाळवंटात डाळिंबाची शेती करण्याच्या कल्पनेलाच अन्य शेतकरी हसू लागले. अनेकांनी त्याला वेड्यात काढले. रघुवीर सिंग यांनी हार मानली नाही. त्यांनी डाळिंब शेतीचा अभ्यास केला. अगदी महाराष्ट्रामध्ये जात विविध डाळिंब बागांना भेटी दिल्या. येथील एका बागायतदाराकडून रोपे घेतानाच मी पहिल्यांदाच लागवड करतोय, मला मार्गदर्शन करा अशी विनंती केली. त्याची हमी मिळताच सुरुवातीस ४००० रोपे शेतात लावली. संपूर्ण बागेस मल्चिंग केले. ठिबक करून पाण्याचा कमीत कमी आणि कार्यक्षम वापर सुरू केला. वाळूची वादळे येणाऱ्या दिशेला आडवी नीम, देव बाभूळ यांची लागवड केली. परिणामी, वाळूच्या वादळापासून डाळिंब बागेचे रक्षण झाले. प्रयत्न, नवीन काहीतरी करण्याची जिद्द यातून वातावरण बदलास सडेतोड उत्तर दिले आहे. आज त्यांच्या एकूण ८५ एकर शेतीपैकी ३५ एकरांवर डाळिंब, ५० एकरांवर कापूस आहे. ९००० डाळिंबाची बाग फुललेली आहे. २०२० मध्ये त्यांच्या बागेत डाळिंबाची पहिली तोडणी झाली. त्यातून त्यांना ११ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता साडेसात लाख रुपये निव्वळ नफा होता. कापसाचे उत्पादनही ३०० क्विंटल झाले. त्यातून ७ लाख रु. मिळाले. राजस्थानच्या वाळवंटात लहान मोठ्या झुडूप वर्गामधील वृक्षच जास्त टिकाव धरू शकतात, या शास्त्रीय अभ्यासावर या शेतकऱ्याने आपली यशकथा लिहिली.

रघुवीर सिंग याच्याकडून आपण काय शिकायचे?
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हार मानावयाची नाही.
शेतीत सातत्याने नवीन प्रयोग करत राहायचे. त्याच त्या चक्रात अडकून पडावयाचे नाही.
पिकातील योग्य त्या तज्ज्ञांचा, अनुभवी व्यक्तींचा सल्ला, मार्गदर्शन घ्यायचे.
प्रतिकूल निसर्ग किंवा संकटाला सामोरे जाताना त्याच्याच आयुधांचा वापर करावयाचा.
नीट अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्‍वास यातून आपल्या महाराष्ट्रातही असे कितीतरी रघुवीर सिंग तयार होऊ शकतात. आपल्या शेतकऱ्यात ती क्षमता नक्कीच आहे.
————

English Headline: 
agricultural stories in Marathi, Dr. Nagesh Tekale, climate change, Rajasthan2
Author Type: 
External Author
डॉ. नागेश टेकाळे
राजस्थान शेतकरी कोरडवाहू वृक्ष शेती farming निसर्ग ऊस पाणी water पाऊस खड्डे पशुधन महाराष्ट्र maharashtra पशुखाद्य पुढाकार initiatives भारत पाकिस्तान उत्पन्न स्थलांतर डाळ डाळिंब कापूस स्त्री
Search Functional Tags: 
राजस्थान, शेतकरी, कोरडवाहू, वृक्ष, शेती, farming, निसर्ग, ऊस, पाणी, Water, पाऊस, खड्डे, पशुधन, महाराष्ट्र, Maharashtra, पशुखाद्य, पुढाकार, Initiatives, भारत, पाकिस्तान, उत्पन्न, स्थलांतर, डाळ, डाळिंब, कापूस, स्त्री
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Dr. Nagesh Tekale, climate change, Rajasthan2
Meta Description: 
तीव्र वातावरण, ५० अंशांपेक्षा अधिक तापमान, पाण्याची कमतरता अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीतही राजस्थानातील शेतकरी पुढे जात आहे. भरडधान्य, कोरडवाहू पिके, झुडूपवर्गीय वृक्ष शेती यातून मार्ग काढला जात आहे. प्रतिकूल निसर्गाशी लढताना निसर्गाच्या आयुधांचा वापर करत अनेक जण येथे आपल्या यशकथा रचत आहेत.

[ad_2]

Source link

READ ALSO

gram panchayat yojana । या ग्रामपंचायतीच्या खात्यात येणार ₹861 कोटी पहा लाभार्थी ग्रामपंचायतीची यादी

pm mudra yojana in marathi घरबसल्या मिळेल 50 हजार रुपयांचे बिनव्याजी लोन फक्त 2 मिनिटात

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. 

ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

Grampanchayat-Nidhi
शेतीविषयक योजना

gram panchayat yojana । या ग्रामपंचायतीच्या खात्यात येणार ₹861 कोटी पहा लाभार्थी ग्रामपंचायतीची यादी

30 April 2022
pradhan-mantri-mudra-yojana-in-marathi
शेती

pm mudra yojana in marathi घरबसल्या मिळेल 50 हजार रुपयांचे बिनव्याजी लोन फक्त 2 मिनिटात

29 April 2022
सिंचन-विहीर-योजना-2022-750x430
शेती

Well Subsidy : नवीन विहिरी साठी मिळणार 100% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु

29 April 2022
gharkul-yojana-yadi
संधी

PM Awas Yojana घरकुल योजना 2021-2022 साठी 36 जिल्ह्याच्या याद्या जाहीर! या यादीत नाव असेल तर मिळणार घरकुल

29 April 2022
pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा

23 April 2022
Black Cumin Benifits in Marathi: काळ्या जिऱ्याचे औषधी गुणधर्म आणि लागवड पद्धती
कृषिपूरक

Black Cumin Benifits in Marathi: काळ्या जिऱ्याचे औषधी गुणधर्म आणि लागवड पद्धती

06 April 2022
Next Post
International Soybean Market Rates Are High Again.

International Soybean Market Rates Are High Again.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

[MJPSKY 4th,5th, 6th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020

MJPSKY All 7th List महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी 2020 Download Free

22 January 2020 - Updated on 12 April 2021
soyabean-rate

आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav Today 15/03/2022

15 March 2022
Farming Business Idea: गावात राहून हे 3 शेती व्यवसाय सुरू करा, कमी वेळात बक्कळ पैसे कमवा

Farming Business Idea: गावात राहून हे 3 शेती व्यवसाय सुरू करा, कमी वेळात बक्कळ पैसे कमवा

09 March 2022
pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा

pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा

23 April 2022
3rd list mjpsky (3rd List Village Wise) Mahatama jyotirao Phule karj Mafi 3rd List 2020 Download PDF

(Village Wise Yadi) Mahatama Jyotirao Phule karj Mafi 3rd, 4th, 5th, 6rh, 7th List 2020 Free Download PDF

29 February 2020 - Updated on 12 April 2021

EDITOR'S PICK

संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार…

संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार…

26 January 2022
Farmers Protest Update: शेतकरी 31 जानेवारीला ‘विश्वासघात दिवस’ साजरा करणार, वाचा काय आहे कारण?

Farmers Protest Update: शेतकरी 31 जानेवारीला ‘विश्वासघात दिवस’ साजरा करणार, वाचा काय आहे कारण?

29 January 2022
‘तुमची प्रणाली पूर्णपणे अयशस्वी झाली’, असे सांगत उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले.

‘तुमची प्रणाली पूर्णपणे अयशस्वी झाली’, असे सांगत उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले.

06 May 2021
औरंगाबाद जिल्ह्यातील पात्र ८९ कार्यकारी सोसायटीच्या निवडणूका 

औरंगाबाद जिल्ह्यातील पात्र ८९ कार्यकारी सोसायटीच्या निवडणूका 

20 March 2022

About Us

Amhi Kastkar™

❣️Maharashtra’s Fastest Growing Agricultural YouTube Channel & Youngest Agriculture Media News Publisher

Follow us

Categories

  • कर्जमाफी
  • किसान क्रेडिट कार्ड
  • कुक्कुट पालन
  • कृषिपूरक
  • कृषी प्रक्रिया
  • कृषी सल्ला
  • तंत्रज्ञान
  • धान्य
  • नगदी पिके
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
  • पंतप्रधान पीक विमा योजना
  • पीक व्यवस्थापन
  • फळे
  • फुले
  • बाजारभाव
  • बातम्या
  • भाजीपाला
  • मत्स्य व्यवसाय
  • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासन निर्णय
  • शुभेच्छा
  • शेती
  • शेतीविषयक योजना
  • शेळी पालन
  • संधी
  • सरकारी योजना
  • सौर कृषी पंप योजना
  • हवामान अंदाज

Recent Posts

  • gram panchayat yojana । या ग्रामपंचायतीच्या खात्यात येणार ₹861 कोटी पहा लाभार्थी ग्रामपंचायतीची यादी
  • pm mudra yojana in marathi घरबसल्या मिळेल 50 हजार रुपयांचे बिनव्याजी लोन फक्त 2 मिनिटात
  • Well Subsidy : नवीन विहिरी साठी मिळणार 100% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु
  • PM Awas Yojana घरकुल योजना 2021-2022 साठी 36 जिल्ह्याच्या याद्या जाहीर! या यादीत नाव असेल तर मिळणार घरकुल
  • pm kisan 11th installment पी एम किसान 11व्या हप्त्याचे 2000 हजार तारखेला खात्यात होणार जमा
  • लग्नपत्रिका ऑनलाइन अर्ज व स्टेटस
  • ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2022: ऑनलाइन व लॉगिन
  • ऑनलाइन नोंदणी, लॉगिन आणि फायदे
  • Home
  • Blog
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions

© 2022 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम

© 2022 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.

Welcome Back!

OR

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In