[ad_1]
लॉकडाऊनमुळे बंद झालेली कापूस खरेदी लॉकडाऊनचे नियम पाळून पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु खरेदीचा वेग कमी होता. तो खरेदी वेग वाढविण्याचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या राज्याच्या कृषि विभागाच्या आढावा बैठकीत निघाला. यावर खरेदीचा वेग वाढवित दररोज १०० गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
यात जे ग्रेडर सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पणन सचिवांना दिले.
कापूस उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात आजही कापूस शिल्लक आहे.पावसाळ्यापूर्वी तो खरेदी होणे अत्यंत गरजेचे आहे असा सूर कृषी विभागाच्या आढावा बैठकीत निघाला. सध्या २० ते २५ गाड्या खरेदी होत असल्याची माहिती अनेक मंत्र्यांनी या बैठकीत उपस्थित केली.यावर सविस्तर चर्चा होऊन दररोज १०० गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारताशी व्यावसायिक संबंधही तुटल्यामुळे पाकिस्तानमधील जनता अडचणीत
दररोज प्रत्येक केंद्रावर शंभर गाड्या कापूस खरेदी झालीच पाहिजे. यात जे ग्रेडर हयगय करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
हे सरकार जनतेच्या विरोधात झालेले असून ते उधारीवरचे सरकार आहे – हर्षवर्धन पाटील
KrushiNama.com covers marathi agriculture news from India and Maharashtra. Get all exclusive headlines, breaking news on agriculture, business, agriculture videos and photos. Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from agriculture news from all cities of Maharashtra and India.
[ad_2]
Source link