[ad_1]
केदारखेडा, जि. जालना : बाणेगाव येथील धरणात साठ ते सत्तर टक्के पाणीसाठा आहे. परंतु प्रकल्पाच्या डाव्या व उजवा कालव्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
बाणेगाव येथील लघुप्रकल्पाचे काम नोव्हेबर २००३ ला सुरू होऊन २००५ मध्ये पूर्ण झाले. तरी संपादित जमिनीचा शासनाकडून मावेजा मिळाला नव्हता. तरीही त्या शेतकऱ्यांनी शासनाला धार दाबण्यासाठी सहकार्य केले. त्या शेतकऱ्यांचा मावेजा धरणाची धार दाबल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर मिळाला. या मुळे संबंधित खात्याच्या त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले होते.
धरणात पाणी असूनही त्याचा शेतकऱ्यांना लाभच नाही. या कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडले असते, तर शासनाची पाणी पट्टी वसुली झाली असती. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीतून पाट गेले. त्यातील काही शेतकऱ्यांना मावेजा मिळाला. परंतु, यात डाव्या कालव्याकडील बामखेडा येथील शेतकऱ्यांची मावेजा मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.
धरणाच्या उजव्या कालव्याची जमीन शेतकरी संपादित करू देत नसल्याने तो कालवा बंद आहे. डावा कालवा काही ठिकाणी अपूर्ण आहे. तो पूर्ण करूनच पाणी सोडले जाईल. डाव्या कालव्यासाठी पाणी सोडण्याला अडचण आली नाही, तर पाणी सोडू.
– एस. डी. चौधरी, उपअभियंता, जलसंपदा, भोकरदन.
केदारखेडा, जि. जालना : बाणेगाव येथील धरणात साठ ते सत्तर टक्के पाणीसाठा आहे. परंतु प्रकल्पाच्या डाव्या व उजवा कालव्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
बाणेगाव येथील लघुप्रकल्पाचे काम नोव्हेबर २००३ ला सुरू होऊन २००५ मध्ये पूर्ण झाले. तरी संपादित जमिनीचा शासनाकडून मावेजा मिळाला नव्हता. तरीही त्या शेतकऱ्यांनी शासनाला धार दाबण्यासाठी सहकार्य केले. त्या शेतकऱ्यांचा मावेजा धरणाची धार दाबल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर मिळाला. या मुळे संबंधित खात्याच्या त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले होते.
धरणात पाणी असूनही त्याचा शेतकऱ्यांना लाभच नाही. या कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडले असते, तर शासनाची पाणी पट्टी वसुली झाली असती. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीतून पाट गेले. त्यातील काही शेतकऱ्यांना मावेजा मिळाला. परंतु, यात डाव्या कालव्याकडील बामखेडा येथील शेतकऱ्यांची मावेजा मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.
धरणाच्या उजव्या कालव्याची जमीन शेतकरी संपादित करू देत नसल्याने तो कालवा बंद आहे. डावा कालवा काही ठिकाणी अपूर्ण आहे. तो पूर्ण करूनच पाणी सोडले जाईल. डाव्या कालव्यासाठी पाणी सोडण्याला अडचण आली नाही, तर पाणी सोडू.
– एस. डी. चौधरी, उपअभियंता, जलसंपदा, भोकरदन.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.