[ad_1]
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ५९ कारखाने यंदा ऊस गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. या कारखान्यांनी सहा मार्चपर्यंत २ कोटी १० लाख ८० हजार ५६८ टन उसाचे गाळप केले. तर २ कोटी १० लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड व उस्मानाबाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपुढे राहिला आहे.
यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे अनेक कारखाने क्षमतेच्या पुढे जाऊन उसाचे गाळप करत आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तोडणीला उशीर झाल्यामुळे उभ्या उसाला तुरे फुटल्याचेही चित्र आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी ४९ लाख १० हजार ९२५ टन उसाचे गाळप केले. ९.५० टक्के साखर उताऱ्याने ४६ लाख ६६ हजार ५९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ३७ लाख ३५ हजार ३१३ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.६९ टक्के साखर उताऱ्याने ३९ लाख ९३ हजार ५८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी १८ लाख ८७ हजार १०५ टन उसाचे गाळप करून १९ लाख ३९ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी १७ लाख ९३ हजार ५५३ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.१९ टक्के साखर उताऱ्याने १८ लाख २६ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २७ लाख ४८ हजार ६८० टन उसाचे गाळप केले.
हिंगोलीत १५ लाख ३७ हजार टन गाळप
हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी १५ लाख ३७ हजार ७९७ टन उसाचे गाळप करताना १०.३१ टक्के सरासरी साखर उतारा राखला. तर १५ लाख ८५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १७ लाख ६९ हजार ९३४ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८० टक्के साखर उताऱ्याने १७ लाख ३५ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती साखर विभागातील सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ५९ कारखाने यंदा ऊस गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. या कारखान्यांनी सहा मार्चपर्यंत २ कोटी १० लाख ८० हजार ५६८ टन उसाचे गाळप केले. तर २ कोटी १० लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड व उस्मानाबाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपुढे राहिला आहे.
यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे अनेक कारखाने क्षमतेच्या पुढे जाऊन उसाचे गाळप करत आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तोडणीला उशीर झाल्यामुळे उभ्या उसाला तुरे फुटल्याचेही चित्र आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी ४९ लाख १० हजार ९२५ टन उसाचे गाळप केले. ९.५० टक्के साखर उताऱ्याने ४६ लाख ६६ हजार ५९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ३७ लाख ३५ हजार ३१३ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.६९ टक्के साखर उताऱ्याने ३९ लाख ९३ हजार ५८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी १८ लाख ८७ हजार १०५ टन उसाचे गाळप करून १९ लाख ३९ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी १७ लाख ९३ हजार ५५३ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.१९ टक्के साखर उताऱ्याने १८ लाख २६ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २७ लाख ४८ हजार ६८० टन उसाचे गाळप केले.
हिंगोलीत १५ लाख ३७ हजार टन गाळप
हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी १५ लाख ३७ हजार ७९७ टन उसाचे गाळप करताना १०.३१ टक्के सरासरी साखर उतारा राखला. तर १५ लाख ८५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १७ लाख ६९ हजार ९३४ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८० टक्के साखर उताऱ्याने १७ लाख ३५ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती साखर विभागातील सूत्रांनी दिली.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.