[ad_1]
पुणे : राज्यात दिवस रात्रीच्या तापमानातील तफावत वाढल्याने रात्री थंडी, तर दिवसा उन्हाचा चटका अशा प्रारंभीच्या वातावरणातच दुसऱ्या पंधरवड्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमी पावसाने लावलेली जोरदार हजेरी, काही ठिकाणी गारांचा पाऊस, अन् तापमानात झालेली घट, काहीसा थंड दिवस, यानंतर शेवटच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत देत कमाल तापमानात झालेली वाढ, असे बदल हे मार्च महिनाभरातील हवामानाचे वैशिष्ट्ये ठरले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे २९ मार्चला देशातील उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअसची सर्वाधिक नोंद झाल्याने देशासह जगभरात दखलपात्र ठरली.
दिवस रात्रीच्या तापमानात तफावत
राज्यात दिवसाच्या तापमानात वाढ होत असताना ढगाळ वातावरण आणि वेगवान वाऱ्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तापमानातील तफावत वाढली होती. बऱ्यांच ठिकाणी ही तफावत १२ ते २० अंशांपर्यंत होती. रात्रीच्या वेळी थंडी तर दिवसा उन्हाचा चटका असे परस्पर विरोधी हवामान अनुभवायला मिळाले. तापमानातील ही तफावत महिन्यातील अनेक दिवस कायम होती.
अवकाळी पावसाचा दणका
राज्यात ९ ते १६ मार्च आणि १८ ते २४ मार्च या कालावधीत अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन ढगाळ वातावरण तयार झाले होते. यामुळे ९ ते १६ या काळात पाऊस पडला नसला, तरी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याचे पाहायला मिळाले. तर १८ ते २४ या कालावधीत अवकाळी पावसाने अक्षरश धुमाकूळ घातला होता. राज्यात १ ते २४ मार्च या कालावधीत पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, बीड, धुळे, जळगाव, बुलडाणा, परभणी, नांदेड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, पालघर, रायगड या जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश पाऊस झाला होता. तर भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. अमरावती, सातारा जिल्ह्यांत सर्वसाधारण पाऊस झाला. तर नंदुरबार, जालना, अकोला या जिल्ह्यांत कमी, तर औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडला होता. या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारपीठ, विजाच्या कडकडाट झाल्याने वित्तहानीसह काही प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या.
उन्हाचा चटका
मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढण्यास सुरुवात झाल्याने ७ आणि ८ मार्चला पारा चाळिशीपार गेला होता. त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला. राज्यात ९ ते १६ मार्च या कालावधीत पारा हा ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होता. तर १७ मार्च रोजी पुन्हा ढगाळ वातावरणाची स्थिती झाल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाल्याने पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला. तर १९ ते २४ मार्च या कालावधीत पारा पुन्हा कमी झाला होता. तर २५ मार्चपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढत जाऊन मार्चच्या अखेरीस ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली होती.
फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे सरकत होता. दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात काही अंशी घट झाली. तिसऱ्या आठवड्यात वातावरणात वेगाने बदल होऊन मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होऊन पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर पाऊस झाल्याने दिवसही काही प्रमाणात थंड अनुभवायला येत होता. या काळात किमान तापमान खाली उतरत असताना २८ मार्च रोजी बुलडाणा येथे १४.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान नोंदविले गेले होते.
उष्णतेची लाट :
मार्चच्या अखेरच्या दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले होते. त्यामुळे उष्णतेत वेगाने वाढ झाली होती. राज्यात २९ मार्चपासून उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली. तर २८ ते ३१ मार्च या कालावधीत विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ या भागांत काही प्रमाणात उष्णतेची लाट आली होती. त्यामुळे २९ मार्च रोजी ब्रह्मपुरी येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर ३० व ३१ मार्च रोजी चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले होते.
मार्च महिन्यातील विविध शहरांतील उच्चांकी तापमान अंश सेल्सिअसमध्ये, कंसात तारीख :
- शहर —- कमाल तापमान
- चंद्रपूर ४३.६ (३०, ३१)
- जळगाव ४१.५ (२९)
- मालेगाव ४२.० (२९)
- सोलापूर ४१.५ (२९)
- परभणी ४१.१ (२९)
- अकोला ४२.८ (२९)
- अमरावती ४१.८ (२९)
- बुलडाणा ४० (२९)
- ब्रह्मपुरी ४३.३ (२९)
- चंद्रपूर ४२.८ (२९)
- गोंदिया ४०.८ (२९)
- नागपूर ४१.५ (२९)
- वर्धा ४२ (२९)
- जळगाव ४१.४ (२८)
- मालेगाव ४१.८ (२८)
- अकोला ४१.५ (२८)
- अमरावती ४०.२(२८)
- ब्रम्हपुरी ४१.८ (२८)
- चंद्रपूर ४२.४ (२८)
- नागपूर ४०.२ (२८)
- वर्धा ४०.६ (२८)
- मुंबई (सांताक्रूझ) ४०.९ (२७)
- जळगाव ४०.४ (२७)
- सोलापूर ४०.२ (२७)
- अकोला ४०.४ (२७)
- चंद्रपूर ४१.२ (२७)
- रत्नागिरी ४० (२६)
- सोलापूर ४०.३ (२६)
- चंद्रपूर ४०.२ (२६)
- चंद्रपूर ४०.६ (२५)
- रत्नागिरी ३९ (२४)
- अकोला ४०.३ (१७)
- ब्रम्हपुरी ४०.१ (१७)
- ब्रह्मपुरी ३९.९ (१५)
- चंद्रपूर ३९.४ (१४)
- यवतमाळ ३९.५ (११)
- ब्रह्मपुरी ४०.१ (८)
- ब्रम्हपुरी ४०.६ (७)
- ब्रह्मपुरी ३९.८ (४)
- अकोला ३९.५ (२)
- चंद्रपूर ३९.९ (१)
पुणे : राज्यात दिवस रात्रीच्या तापमानातील तफावत वाढल्याने रात्री थंडी, तर दिवसा उन्हाचा चटका अशा प्रारंभीच्या वातावरणातच दुसऱ्या पंधरवड्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमी पावसाने लावलेली जोरदार हजेरी, काही ठिकाणी गारांचा पाऊस, अन् तापमानात झालेली घट, काहीसा थंड दिवस, यानंतर शेवटच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत देत कमाल तापमानात झालेली वाढ, असे बदल हे मार्च महिनाभरातील हवामानाचे वैशिष्ट्ये ठरले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे २९ मार्चला देशातील उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअसची सर्वाधिक नोंद झाल्याने देशासह जगभरात दखलपात्र ठरली.
दिवस रात्रीच्या तापमानात तफावत
राज्यात दिवसाच्या तापमानात वाढ होत असताना ढगाळ वातावरण आणि वेगवान वाऱ्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तापमानातील तफावत वाढली होती. बऱ्यांच ठिकाणी ही तफावत १२ ते २० अंशांपर्यंत होती. रात्रीच्या वेळी थंडी तर दिवसा उन्हाचा चटका असे परस्पर विरोधी हवामान अनुभवायला मिळाले. तापमानातील ही तफावत महिन्यातील अनेक दिवस कायम होती.
अवकाळी पावसाचा दणका
राज्यात ९ ते १६ मार्च आणि १८ ते २४ मार्च या कालावधीत अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन ढगाळ वातावरण तयार झाले होते. यामुळे ९ ते १६ या काळात पाऊस पडला नसला, तरी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याचे पाहायला मिळाले. तर १८ ते २४ या कालावधीत अवकाळी पावसाने अक्षरश धुमाकूळ घातला होता. राज्यात १ ते २४ मार्च या कालावधीत पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, बीड, धुळे, जळगाव, बुलडाणा, परभणी, नांदेड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, पालघर, रायगड या जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश पाऊस झाला होता. तर भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. अमरावती, सातारा जिल्ह्यांत सर्वसाधारण पाऊस झाला. तर नंदुरबार, जालना, अकोला या जिल्ह्यांत कमी, तर औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडला होता. या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारपीठ, विजाच्या कडकडाट झाल्याने वित्तहानीसह काही प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या.
उन्हाचा चटका
मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढण्यास सुरुवात झाल्याने ७ आणि ८ मार्चला पारा चाळिशीपार गेला होता. त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला. राज्यात ९ ते १६ मार्च या कालावधीत पारा हा ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होता. तर १७ मार्च रोजी पुन्हा ढगाळ वातावरणाची स्थिती झाल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाल्याने पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला. तर १९ ते २४ मार्च या कालावधीत पारा पुन्हा कमी झाला होता. तर २५ मार्चपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढत जाऊन मार्चच्या अखेरीस ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली होती.
फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे सरकत होता. दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात काही अंशी घट झाली. तिसऱ्या आठवड्यात वातावरणात वेगाने बदल होऊन मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होऊन पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर पाऊस झाल्याने दिवसही काही प्रमाणात थंड अनुभवायला येत होता. या काळात किमान तापमान खाली उतरत असताना २८ मार्च रोजी बुलडाणा येथे १४.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान नोंदविले गेले होते.
उष्णतेची लाट :
मार्चच्या अखेरच्या दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले होते. त्यामुळे उष्णतेत वेगाने वाढ झाली होती. राज्यात २९ मार्चपासून उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली. तर २८ ते ३१ मार्च या कालावधीत विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ या भागांत काही प्रमाणात उष्णतेची लाट आली होती. त्यामुळे २९ मार्च रोजी ब्रह्मपुरी येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर ३० व ३१ मार्च रोजी चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले होते.
मार्च महिन्यातील विविध शहरांतील उच्चांकी तापमान अंश सेल्सिअसमध्ये, कंसात तारीख :
- शहर —- कमाल तापमान
- चंद्रपूर ४३.६ (३०, ३१)
- जळगाव ४१.५ (२९)
- मालेगाव ४२.० (२९)
- सोलापूर ४१.५ (२९)
- परभणी ४१.१ (२९)
- अकोला ४२.८ (२९)
- अमरावती ४१.८ (२९)
- बुलडाणा ४० (२९)
- ब्रह्मपुरी ४३.३ (२९)
- चंद्रपूर ४२.८ (२९)
- गोंदिया ४०.८ (२९)
- नागपूर ४१.५ (२९)
- वर्धा ४२ (२९)
- जळगाव ४१.४ (२८)
- मालेगाव ४१.८ (२८)
- अकोला ४१.५ (२८)
- अमरावती ४०.२(२८)
- ब्रम्हपुरी ४१.८ (२८)
- चंद्रपूर ४२.४ (२८)
- नागपूर ४०.२ (२८)
- वर्धा ४०.६ (२८)
- मुंबई (सांताक्रूझ) ४०.९ (२७)
- जळगाव ४०.४ (२७)
- सोलापूर ४०.२ (२७)
- अकोला ४०.४ (२७)
- चंद्रपूर ४१.२ (२७)
- रत्नागिरी ४० (२६)
- सोलापूर ४०.३ (२६)
- चंद्रपूर ४०.२ (२६)
- चंद्रपूर ४०.६ (२५)
- रत्नागिरी ३९ (२४)
- अकोला ४०.३ (१७)
- ब्रम्हपुरी ४०.१ (१७)
- ब्रह्मपुरी ३९.९ (१५)
- चंद्रपूर ३९.४ (१४)
- यवतमाळ ३९.५ (११)
- ब्रह्मपुरी ४०.१ (८)
- ब्रम्हपुरी ४०.६ (७)
- ब्रह्मपुरी ३९.८ (४)
- अकोला ३९.५ (२)
- चंद्रपूर ३९.९ (१)
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.