[ad_1]
चंडीगड ः पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आपण राज्यपालांकडे सादर केले असून त्यांनी देखील ते स्वीकारले असल्याचे मान राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मान यांची शुक्रवारी ‘आप’च्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. थोर क्रांतिकारक भगतसिंग यांचे जन्मगाव असलेल्या खातकर कालन (जि. नवानशहर) येथे १६ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मान हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister)शपथ घेतील. मान यांनी या समारंभासाठी ‘आप’चे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री(Chief Minister of Delhi) अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण दिले आहे.
सावंत गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री
गोव्यामध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. सावंत यांनी आज दुपारीच राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची राजभवनामध्ये जाऊन भेट घेतली. नवे सरकार स्थापन होईपर्यंत सावंत हे गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दरम्यान सरकार स्थापनेचा दावा नेमका कधी करायचा याची तारीख अद्याप ठरली नसल्याचे सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तीन अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना सोबत घेऊन भाजप राज्यात सरकार स्थापन करणार आहे.
‘यूपी’मध्ये होळीनंतर नवे सरकार
उत्तरप्रदेशात होळीनंतर सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या ( ता.१३) दिल्लीत येत असून ते येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतील. उत्तर प्रदेशातील यशानंतरचा हा योगींचा पहिलाच दिल्ली दौरा असल्याने भाजपनेही त्यांच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे. योगी हे याच भेटीमध्ये मोदी आणि शहा यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे समाजवादी पक्षाने देखील २१ मार्च रोजी नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलाविली असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील मार्गदर्शन करतील
चंडीगड ः पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आपण राज्यपालांकडे सादर केले असून त्यांनी देखील ते स्वीकारले असल्याचे मान राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मान यांची शुक्रवारी ‘आप’च्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. थोर क्रांतिकारक भगतसिंग यांचे जन्मगाव असलेल्या खातकर कालन (जि. नवानशहर) येथे १६ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मान हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister)शपथ घेतील. मान यांनी या समारंभासाठी ‘आप’चे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री(Chief Minister of Delhi) अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण दिले आहे.
सावंत गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री
गोव्यामध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. सावंत यांनी आज दुपारीच राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची राजभवनामध्ये जाऊन भेट घेतली. नवे सरकार स्थापन होईपर्यंत सावंत हे गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दरम्यान सरकार स्थापनेचा दावा नेमका कधी करायचा याची तारीख अद्याप ठरली नसल्याचे सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तीन अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना सोबत घेऊन भाजप राज्यात सरकार स्थापन करणार आहे.
‘यूपी’मध्ये होळीनंतर नवे सरकार
उत्तरप्रदेशात होळीनंतर सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या ( ता.१३) दिल्लीत येत असून ते येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतील. उत्तर प्रदेशातील यशानंतरचा हा योगींचा पहिलाच दिल्ली दौरा असल्याने भाजपनेही त्यांच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे. योगी हे याच भेटीमध्ये मोदी आणि शहा यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे समाजवादी पक्षाने देखील २१ मार्च रोजी नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलाविली असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील मार्गदर्शन करतील
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.