[ad_1]
पुणे ः कोरोना काळातील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची कामगिरी उल्लेखनीय आहे. ‘कॉपशॉप’सारख्या दुकानांची शृंखला, शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांकरिता कमी दरात आणि वेळेवर झालेली खतांची उपलब्धता यांसारख्या उपक्रमांमुळे महामंडळाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे, असे गौरवोद््गार मंडळाचे अध्यक्ष व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २६) साखर संकुल, शिवाजीनगर येथे पार पडली. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पणन संचालक सतीशकुमार सोनी, संचालक गोकूळ राठी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे व महामंडळाचे भागधारक यांच्या उपस्थितीत झाली.
मंत्री पाटील म्हणाले, “कोरोना काळातील स्थिती कठीण असताना या कालावधीत महामंडळाने उल्लेखनीय कामगिरी केली. अनेकविध उपक्रम राबविले. ‘कॉपशॉप’सारख्या दुकानांची शृंखला हा त्याचाच एक भाग आहे. पुढील आर्थिक वर्षात याच गतीने कामकाज करावे लागेल. महामंडळाची प्रगती होण्याच्या दृष्टीने अशाच उपक्रमांचे आयोजन करावे.“
“मागील आर्थिक वर्षात महामंडळास सुमारे १.५१ लाख नफा झाला असून, सुमारे २०० शेतकरी उत्पादक कंपन्यांतील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला ‘कॉपशॉप’द्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात महामंडळाला यश आले आहे. त्याअनुषंगाने राज्यात अशाप्रकारे ‘कॉपशॉप’ची निर्मिती करून जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती होईल असे नियोजन करण्यात यावे,’’ अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली.
‘‘चालू आर्थिक वर्षात महामंडळामार्फत १७५ शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुमारे १० हजार टन खतांचा पुरवठा रास्त दरात केला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महामंडळाने प्रयत्न करावेत,’’ असे मत सोनी यांनी व्यक्त केले.
कृषी उद्योजक निर्माण करण्यासाठी कार्यशाळा
राज्यामध्ये अधिकाधिक कृषी उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महामंडळाने नियोजन करावे. नाबार्ड व एनसीडीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती व संगोपन करण्यासाठी महामंडळास संलग्नित करण्यात आले असल्याने त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने कृषी पर्यटन निर्मिती व बाजारपेठेची उपलब्धता, यासाठी महामंडळामार्फत सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी व्यवसाय कक्षामार्फत मार्गदर्शनपर सेवा
सूक्ष्म व लघू उद्योगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने महामंडळाच्या कृषी व्यवसायवृद्धी कक्षामार्फत मार्गदर्शनपर सेवा पुरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या पुढील प्रगतीच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचारी वर्गाने उपरोक्त उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले असून, त्यात नक्कीच यश मिळवू, अशी ग्वाही महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी दिली.
पुणे ः कोरोना काळातील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची कामगिरी उल्लेखनीय आहे. ‘कॉपशॉप’सारख्या दुकानांची शृंखला, शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांकरिता कमी दरात आणि वेळेवर झालेली खतांची उपलब्धता यांसारख्या उपक्रमांमुळे महामंडळाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे, असे गौरवोद््गार मंडळाचे अध्यक्ष व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २६) साखर संकुल, शिवाजीनगर येथे पार पडली. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पणन संचालक सतीशकुमार सोनी, संचालक गोकूळ राठी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे व महामंडळाचे भागधारक यांच्या उपस्थितीत झाली.
मंत्री पाटील म्हणाले, “कोरोना काळातील स्थिती कठीण असताना या कालावधीत महामंडळाने उल्लेखनीय कामगिरी केली. अनेकविध उपक्रम राबविले. ‘कॉपशॉप’सारख्या दुकानांची शृंखला हा त्याचाच एक भाग आहे. पुढील आर्थिक वर्षात याच गतीने कामकाज करावे लागेल. महामंडळाची प्रगती होण्याच्या दृष्टीने अशाच उपक्रमांचे आयोजन करावे.“
“मागील आर्थिक वर्षात महामंडळास सुमारे १.५१ लाख नफा झाला असून, सुमारे २०० शेतकरी उत्पादक कंपन्यांतील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला ‘कॉपशॉप’द्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात महामंडळाला यश आले आहे. त्याअनुषंगाने राज्यात अशाप्रकारे ‘कॉपशॉप’ची निर्मिती करून जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती होईल असे नियोजन करण्यात यावे,’’ अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली.
‘‘चालू आर्थिक वर्षात महामंडळामार्फत १७५ शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुमारे १० हजार टन खतांचा पुरवठा रास्त दरात केला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महामंडळाने प्रयत्न करावेत,’’ असे मत सोनी यांनी व्यक्त केले.
कृषी उद्योजक निर्माण करण्यासाठी कार्यशाळा
राज्यामध्ये अधिकाधिक कृषी उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महामंडळाने नियोजन करावे. नाबार्ड व एनसीडीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती व संगोपन करण्यासाठी महामंडळास संलग्नित करण्यात आले असल्याने त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने कृषी पर्यटन निर्मिती व बाजारपेठेची उपलब्धता, यासाठी महामंडळामार्फत सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी व्यवसाय कक्षामार्फत मार्गदर्शनपर सेवा
सूक्ष्म व लघू उद्योगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने महामंडळाच्या कृषी व्यवसायवृद्धी कक्षामार्फत मार्गदर्शनपर सेवा पुरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या पुढील प्रगतीच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचारी वर्गाने उपरोक्त उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले असून, त्यात नक्कीच यश मिळवू, अशी ग्वाही महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी दिली.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.