[ad_1]
सोलापूर ः मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता आणि पौट येथील साठवण तलाव पुनरुज्जीवित करण्याच्या मागण्यांसाठी आमदार समाधान आवताडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे भूमिका मांडली. या दोन्ही योजनांचे मंगळवेढा तालुक्यासाठी असणारे महत्त्व आणि त्यासाठी निधीची किती गरज आहे, याकडेही मंत्री पाटील यांचे त्यांनी लक्ष वेधले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील हे नुकतेच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. त्यात स्वतः आमदार आवताडे यांनी हे दोन्ही प्रश्न मांडले. या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसंदर्भातील प्रस्ताव या आधीच शासनाकडे पाठवल्याचे सांगण्यात आले. तसेच ही योजना कार्यान्वित झाल्यास मंगळवेढा तालुक्यातील २४ गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी विधीमंडळाच्या अधिवेशनात या योजनेसाठी एक कोटी रुपये टोकन निधीही मंजूर झाला. पण ही योजना मंजूर असूनही पुढे काहीच काम झाले नाही, ही गंभीर बाब असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
आज या योजनेच्या एकूण खर्चात ५८७.६४ कोटी रुपये वाढ झाली. सुधारित प्रस्ताव शासनदरबारी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित आहे, असेही त्यांनी सांगितले.
आता शेतकऱ्यांचा विरोध नाही
पौट साठवण तलावास कृष्णा खोरे महामंडळाने दोन वर्षापूर्वी प्रशासकीय मंजूरी दिली. परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या भूसंपादन विरोधामुळे काम होऊ शकले नाही. त्यानंतर महामंडळाने प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता रद्द केली. आता लोकांचे मत परिवर्तन झाल्याने या भागातील ग्रामपंचायतींनी तलावासाठी एकमताने ठराव दिल्याने पौट साठवण तलावाची मान्यता पुनर्जीवित करावी, अशी मागणीही आवताडे यानी केली आहे.
सोलापूर ः मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता आणि पौट येथील साठवण तलाव पुनरुज्जीवित करण्याच्या मागण्यांसाठी आमदार समाधान आवताडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे भूमिका मांडली. या दोन्ही योजनांचे मंगळवेढा तालुक्यासाठी असणारे महत्त्व आणि त्यासाठी निधीची किती गरज आहे, याकडेही मंत्री पाटील यांचे त्यांनी लक्ष वेधले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील हे नुकतेच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. त्यात स्वतः आमदार आवताडे यांनी हे दोन्ही प्रश्न मांडले. या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसंदर्भातील प्रस्ताव या आधीच शासनाकडे पाठवल्याचे सांगण्यात आले. तसेच ही योजना कार्यान्वित झाल्यास मंगळवेढा तालुक्यातील २४ गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी विधीमंडळाच्या अधिवेशनात या योजनेसाठी एक कोटी रुपये टोकन निधीही मंजूर झाला. पण ही योजना मंजूर असूनही पुढे काहीच काम झाले नाही, ही गंभीर बाब असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
आज या योजनेच्या एकूण खर्चात ५८७.६४ कोटी रुपये वाढ झाली. सुधारित प्रस्ताव शासनदरबारी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित आहे, असेही त्यांनी सांगितले.
आता शेतकऱ्यांचा विरोध नाही
पौट साठवण तलावास कृष्णा खोरे महामंडळाने दोन वर्षापूर्वी प्रशासकीय मंजूरी दिली. परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या भूसंपादन विरोधामुळे काम होऊ शकले नाही. त्यानंतर महामंडळाने प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता रद्द केली. आता लोकांचे मत परिवर्तन झाल्याने या भागातील ग्रामपंचायतींनी तलावासाठी एकमताने ठराव दिल्याने पौट साठवण तलावाची मान्यता पुनर्जीवित करावी, अशी मागणीही आवताडे यानी केली आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.