[ad_1]
कोल्हापूर : `‘शेतीला दिवसा वीज देण्याबाबत आयआयटी तज्ज्ञांकडून येत्या पंधरा दिवसांत अभ्यास करून अहवाल मागविला जाईल, असे आश्वासन शासनाने दिले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे’’, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. ८) दिली.
सोमवारी (ता.७) मुंबईमध्ये ऊर्जामंत्र्यांसोबत शेट्टी यांची चर्चा झाली. यात अनेक मुद्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविली. शेट्टी म्हणाले, ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी रास्त असल्याचे दिसल्यास योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले. त्यामुळे पंधरा दिवस आम्ही शासनाच्या निर्णयाची वाट पाहू. मात्र शासनाने दिलेला शब्द पाळला नाही, तर राज्यभरात आंदोलनाचा डोंब उसळेल.’’
राज्यातील शेतकऱ्यांना वीजबिले अनेक ठिकाणी सदोष आली आहेत. मृतांच्या नावावरही थकबाकीचे बिल मारले जात आहे. वीज ग्राहकांची वीज तोडली जात आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी सदोष बिले तातडीने दुरुस्त करण्यासाठी तालुकावार शिबिरे घेण्यात येतील. त्यात ही बिले दुरुस्त करून देऊ, असे आश्वासन दिले.
थकीत वीजबिले भरण्यासाठी सवलतीची देण्याची योजना येत्या ३१ मार्चपर्यंत आहे. त्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. त्यालाही ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या बाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
तीव्र आंदोलनाचा ‘बी प्लॅन’
‘‘दिवसा शेतीला वीजपुरवठा व्हावा, या मागणीसंदर्भात गेले पंधरा दिवस झालेली उपोषणे, त्यानंतर ऊर्जामंत्री यांच्याशी झालेली चर्चा, त्यांनी दिलेली आश्वासने, याची माहिती राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाईल. त्यातून शेतकऱ्यांना जागृत केले जाईल. पंधरा दिवसांत शासनाने दिवसा वीज देण्यासंदर्भात निर्णय न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा ‘बी प्लॅन’ बनविला आहे’’, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.
कोल्हापूर : `‘शेतीला दिवसा वीज देण्याबाबत आयआयटी तज्ज्ञांकडून येत्या पंधरा दिवसांत अभ्यास करून अहवाल मागविला जाईल, असे आश्वासन शासनाने दिले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे’’, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. ८) दिली.
सोमवारी (ता.७) मुंबईमध्ये ऊर्जामंत्र्यांसोबत शेट्टी यांची चर्चा झाली. यात अनेक मुद्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविली. शेट्टी म्हणाले, ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी रास्त असल्याचे दिसल्यास योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले. त्यामुळे पंधरा दिवस आम्ही शासनाच्या निर्णयाची वाट पाहू. मात्र शासनाने दिलेला शब्द पाळला नाही, तर राज्यभरात आंदोलनाचा डोंब उसळेल.’’
राज्यातील शेतकऱ्यांना वीजबिले अनेक ठिकाणी सदोष आली आहेत. मृतांच्या नावावरही थकबाकीचे बिल मारले जात आहे. वीज ग्राहकांची वीज तोडली जात आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी सदोष बिले तातडीने दुरुस्त करण्यासाठी तालुकावार शिबिरे घेण्यात येतील. त्यात ही बिले दुरुस्त करून देऊ, असे आश्वासन दिले.
थकीत वीजबिले भरण्यासाठी सवलतीची देण्याची योजना येत्या ३१ मार्चपर्यंत आहे. त्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. त्यालाही ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या बाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
तीव्र आंदोलनाचा ‘बी प्लॅन’
‘‘दिवसा शेतीला वीजपुरवठा व्हावा, या मागणीसंदर्भात गेले पंधरा दिवस झालेली उपोषणे, त्यानंतर ऊर्जामंत्री यांच्याशी झालेली चर्चा, त्यांनी दिलेली आश्वासने, याची माहिती राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाईल. त्यातून शेतकऱ्यांना जागृत केले जाईल. पंधरा दिवसांत शासनाने दिवसा वीज देण्यासंदर्भात निर्णय न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा ‘बी प्लॅन’ बनविला आहे’’, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.
[ad_2]
Source link