[ad_1]
अंबड, जि. जालना : एकीकडे शासन सिंचन वाढविण्यासाठी, तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांची तहान भागविण्यासाठी नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधत आहे. त्याद्वारे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ मोहिमेवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, बांधण्यात आलेले बंधारे दरवाज्याविना काही कामाचे नसल्याचे चित्र आबे. पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने हे बंधारे नावापुरतेच उरले आहेत.
अंबड तालुक्यातील आलमगाव, हनुमाननगर, कर्जत परिसरातील नदी, करंजी नाल्यावर पुर्वी पावसाचे पाणी आडविण्यासाठी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. त्यावेळी यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. यातून दुष्काळ, पाणी टंचाई दुर व्हावी, हाच हेतु होता. शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढीस लागावे, यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब आडविणे व जमीनित जिरविण्यासाठी बंधारे बांधले. पण, त्यांना दरवाजेच बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे नाल्यावरील बंधारे अनेक वर्षांपासून उघडेच आहेत.
करंजी नाल्यात आलेले पाणी खाली वाहून जात आहे. यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ म्हणण्याची वेळ ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालकांवर आली आहे.
करंजी नाल्यावरील बंधाऱ्याला पाणी आडविण्यासाठी दरवाजेच नाहीत. यामुळे पावसाचे आडविता येत नाही. येणारे पाणी तसेच खाली वाहून जात आहे. बंधारे केवळ बुजगावणे म्हणून उभे आहेत.
– विष्णु खाडे, शेतकरी.
अंबड, जि. जालना : एकीकडे शासन सिंचन वाढविण्यासाठी, तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांची तहान भागविण्यासाठी नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधत आहे. त्याद्वारे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ मोहिमेवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, बांधण्यात आलेले बंधारे दरवाज्याविना काही कामाचे नसल्याचे चित्र आबे. पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने हे बंधारे नावापुरतेच उरले आहेत.
अंबड तालुक्यातील आलमगाव, हनुमाननगर, कर्जत परिसरातील नदी, करंजी नाल्यावर पुर्वी पावसाचे पाणी आडविण्यासाठी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. त्यावेळी यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. यातून दुष्काळ, पाणी टंचाई दुर व्हावी, हाच हेतु होता. शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढीस लागावे, यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब आडविणे व जमीनित जिरविण्यासाठी बंधारे बांधले. पण, त्यांना दरवाजेच बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे नाल्यावरील बंधारे अनेक वर्षांपासून उघडेच आहेत.
करंजी नाल्यात आलेले पाणी खाली वाहून जात आहे. यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ म्हणण्याची वेळ ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालकांवर आली आहे.
करंजी नाल्यावरील बंधाऱ्याला पाणी आडविण्यासाठी दरवाजेच नाहीत. यामुळे पावसाचे आडविता येत नाही. येणारे पाणी तसेच खाली वाहून जात आहे. बंधारे केवळ बुजगावणे म्हणून उभे आहेत.
– विष्णु खाडे, शेतकरी.
[ad_2]
Source link