[ad_1]
अंबड, जि. जालना : तालुक्यात खरीप पिकांची चांगलीच वाट लागली आहे. पांढरे सोनं व नगदी पीक म्हणून शेतकरी कपाशीकडे पाहतो. मात्र, एकाच वेचणीत कपाशीचा खराटा झाला आहे. तर, बाजरी, सोयाबीन, मका, मूग, उडीद यांची पुरती वाट लागली आहे.
खरीप पेरणीत केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी आता चांगलाच आर्थिक अडचणीत आला आहे. कापसातून चार पैशांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बाळगत असताना पुरती निराशा झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच वेचणीसाठी महिला मजूर मिळत नाही. सोंगणी केलेली बाजरी, सोयाबिनची नासाडी झाली आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्यापपर्यंत सुरु झालेले नाही. यामुळे शेतकरी चोहोबाजुने कोंडीत सापडला आहे.
तुरीचे पीक जोमात
सध्या जिकडे तिकडे शेतं पिवळी धमक दिसत आहेत. तुरीचे पीक जोमात आले आहे. मात्र वातावरणात सतत होणारा बदल, ढगाळ वातारवण, धुक पडण्याची भीती, यामुळे जोमात आलेल्या तुरीचे पिक कोमात जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. खरिपाची सगऴीच पिके हातची गेल्याने तुरीतून चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. यामुळे तुरीच्या पिकांवरच पूर्ण भिस्त अवलंबून आहे.
शेतात दोन बंग कपाशीची लागवड केली. त्यासाठी बियाणे, खते, औषधे, मशागत, वेचणी यासाठी सरासरी आठ ते दहा हजार रुपये खर्च केला. यामध्ये केवळ वेचणी केल्यानंतर नव्वद किलो कापूस हातात पडला. यामुळे केलेला खर्च वसुल झाला नाही.
– योगेश जोशी, शेतकरी, अंबड.
अंबड, जि. जालना : तालुक्यात खरीप पिकांची चांगलीच वाट लागली आहे. पांढरे सोनं व नगदी पीक म्हणून शेतकरी कपाशीकडे पाहतो. मात्र, एकाच वेचणीत कपाशीचा खराटा झाला आहे. तर, बाजरी, सोयाबीन, मका, मूग, उडीद यांची पुरती वाट लागली आहे.
खरीप पेरणीत केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी आता चांगलाच आर्थिक अडचणीत आला आहे. कापसातून चार पैशांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बाळगत असताना पुरती निराशा झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच वेचणीसाठी महिला मजूर मिळत नाही. सोंगणी केलेली बाजरी, सोयाबिनची नासाडी झाली आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्यापपर्यंत सुरु झालेले नाही. यामुळे शेतकरी चोहोबाजुने कोंडीत सापडला आहे.
तुरीचे पीक जोमात
सध्या जिकडे तिकडे शेतं पिवळी धमक दिसत आहेत. तुरीचे पीक जोमात आले आहे. मात्र वातावरणात सतत होणारा बदल, ढगाळ वातारवण, धुक पडण्याची भीती, यामुळे जोमात आलेल्या तुरीचे पिक कोमात जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. खरिपाची सगऴीच पिके हातची गेल्याने तुरीतून चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. यामुळे तुरीच्या पिकांवरच पूर्ण भिस्त अवलंबून आहे.
शेतात दोन बंग कपाशीची लागवड केली. त्यासाठी बियाणे, खते, औषधे, मशागत, वेचणी यासाठी सरासरी आठ ते दहा हजार रुपये खर्च केला. यामध्ये केवळ वेचणी केल्यानंतर नव्वद किलो कापूस हातात पडला. यामुळे केलेला खर्च वसुल झाला नाही.
– योगेश जोशी, शेतकरी, अंबड.
[ad_2]
Source link