[ad_1]
अकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट तालुक्यातील खारपाण पट्ट्यात मोठे नुकसान झाले आहे. मूग, उडीद व सोयाबीनला आधीच फटका बसला आहे. त्यानंतर आता अतिवृष्टीने कपाशीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
महिनाभरापासून अकोट तालुक्यातील तरोडा व परिसरात जोरदार पाऊस आहे. यामुळे कापसाच्या बोंडांना कीड लागली आहे. काही शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे जमिनीलगतच्या बोंड्या कुजल्या. कोरडवाहू पट्ट्यात एका झाडाला किमान १० ते १२ बोंड्या परिपक्व झाल्या होत्या. पण, दररोज येत असलेल्या पावसामुळे आता या बोंड्या काळवंडल्या आहेत.
बियाणे, पेरणी, निंदन, खत, फवारणी, डवरणी आदींसाठी एकरी किमान १५ हजारांवर खर्च झाला आहे. एवढा खर्च करून आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जात असल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच पाणी फेरले आहे. हंगामात याआधी मूग, उडीद या पिकांपासून काहीच उत्पादन आलेले नाही. त्यानंतर सोयाबीनवर किडीने हल्ला केला.
चक्रीभूंगा, खोडकिडा, मर, अशा रोगांनी पीक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांच्या अपेक्षा कपाशी पिकावर लागलेल्या असताना अतिवृष्टीमुळे कपाशीच्या परिपक्व बोंड्या सडू लागल्या आहेत. पातेगळ वाढली आहे. अकोट तालुक्यात कावसा, तरोडा, पळसोद, मरोडा, कुटासा, दनोरी, पनोरी, दिनोडा, पाटसुल, आलवाडी, रेल, धारेल या भागातील शेतीला पावसाचा बसला आहे.
दहा एकरात कपाशीची लागवड केली होती. पीक चांगले दिसत असतानाच अतिवृष्टीमुळे बोंड्या काळवंडल्या आहेत.
– नकुल साबळे, शेतकरी, तरोडा
सततच्या पावसामुळे अकोट तालुक्यात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. मुगाचे पीक आधीच गेले. यंदा अनिश्चितता वाढलेली आहे. कापसाच्या बोंड्या काळवंडल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.
– अनुप साबळे, शेतकरी, तरोडा.
अकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट तालुक्यातील खारपाण पट्ट्यात मोठे नुकसान झाले आहे. मूग, उडीद व सोयाबीनला आधीच फटका बसला आहे. त्यानंतर आता अतिवृष्टीने कपाशीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
महिनाभरापासून अकोट तालुक्यातील तरोडा व परिसरात जोरदार पाऊस आहे. यामुळे कापसाच्या बोंडांना कीड लागली आहे. काही शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे जमिनीलगतच्या बोंड्या कुजल्या. कोरडवाहू पट्ट्यात एका झाडाला किमान १० ते १२ बोंड्या परिपक्व झाल्या होत्या. पण, दररोज येत असलेल्या पावसामुळे आता या बोंड्या काळवंडल्या आहेत.
बियाणे, पेरणी, निंदन, खत, फवारणी, डवरणी आदींसाठी एकरी किमान १५ हजारांवर खर्च झाला आहे. एवढा खर्च करून आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जात असल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच पाणी फेरले आहे. हंगामात याआधी मूग, उडीद या पिकांपासून काहीच उत्पादन आलेले नाही. त्यानंतर सोयाबीनवर किडीने हल्ला केला.
चक्रीभूंगा, खोडकिडा, मर, अशा रोगांनी पीक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांच्या अपेक्षा कपाशी पिकावर लागलेल्या असताना अतिवृष्टीमुळे कपाशीच्या परिपक्व बोंड्या सडू लागल्या आहेत. पातेगळ वाढली आहे. अकोट तालुक्यात कावसा, तरोडा, पळसोद, मरोडा, कुटासा, दनोरी, पनोरी, दिनोडा, पाटसुल, आलवाडी, रेल, धारेल या भागातील शेतीला पावसाचा बसला आहे.
दहा एकरात कपाशीची लागवड केली होती. पीक चांगले दिसत असतानाच अतिवृष्टीमुळे बोंड्या काळवंडल्या आहेत.
– नकुल साबळे, शेतकरी, तरोडा
सततच्या पावसामुळे अकोट तालुक्यात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. मुगाचे पीक आधीच गेले. यंदा अनिश्चितता वाढलेली आहे. कापसाच्या बोंड्या काळवंडल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.
– अनुप साबळे, शेतकरी, तरोडा.
[ad_2]
Source link