[ad_1]
कोल्हापूर | जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कडक धोरणे अवलंबण्यास सुरवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर देसाई यांनी दैनंदिन पासचा गैरवापर करणाऱ्यांचे पास थेट रद्द करण्याच्या सूचना दिल्यात.
नोकरी अथवा व्यवसायाच्या निमित्ताने नजिकच्या जिल्ह्यात विशेषत: सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी दैनंदिन पास देण्यात आले आहेत. अशा पासधारकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर त्याचबरोबर सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. परजिल्ह्यातून आपल्या घरी परतल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घेणे त्यांना बंधनकारक आहे.
विनाकारण, विनाकाळजी असे जर कुणी समुहामध्ये फिरत असेल, नियमांचा भंग करत असेल तर अशा पासधारकांचे दैनंदिन पास रद्द करावेत. विशेषत: शिरोळ, जयसिंगपूर या नगरपालिकांनी याबाबत सोमवारपासून कडक अंमलबजावणी करावी. यासाठी विशेष पथके नेमून पोलीस, गृहरक्षक दल यांची मदत घ्यावी अशा सूचना आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्यात.
[ad_2]
Source link