[ad_1]
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने काही भागात रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. १२) पुन्हा दिवसभर कधी ऊन्ह आणि कधी ढगाळ असे वातावरण राहिले.
बार्शी तालुक्यातील पिंपरी, वालवड, चारे येथे रविवारी (ता. ११) वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तर उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, कारंबा, पाकणी, कोंडी परिसरात सायंकाळी गारांसह हलकासा पाऊस पडला. यामुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण आहे.
जिल्ह्यात अनेक भागात सध्या ज्वारीची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी मळणीची कामे सुरु आहेत. तसेच कडब्याची ढेपणी लावण्याची कामेही सुरू आहेत.
रविवारी मोहोळ तालुक्यातील नरखेड, मसले चौधरी, भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बार्शी तालुक्यातील वालवड, चारे, पिंपरी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे रब्बी कांदा पिकाचे नुकसान झाले.
काही ठिकाणी शेतात काढून पडलेली ज्वारी, खळ्यातील पिके भिजली. वाऱ्यामुळे गंजीचा कडबा उडाल्याने नुकसान झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, कारंबा, पाकणी, कोंडी परिसरात गारांसह हलकासा पाऊस झाला. रात्री नऊ वाजता झालेल्या या पावसामुळे उशिरा काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने काही भागात रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. १२) पुन्हा दिवसभर कधी ऊन्ह आणि कधी ढगाळ असे वातावरण राहिले.
बार्शी तालुक्यातील पिंपरी, वालवड, चारे येथे रविवारी (ता. ११) वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तर उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, कारंबा, पाकणी, कोंडी परिसरात सायंकाळी गारांसह हलकासा पाऊस पडला. यामुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण आहे.
जिल्ह्यात अनेक भागात सध्या ज्वारीची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी मळणीची कामे सुरु आहेत. तसेच कडब्याची ढेपणी लावण्याची कामेही सुरू आहेत.
रविवारी मोहोळ तालुक्यातील नरखेड, मसले चौधरी, भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बार्शी तालुक्यातील वालवड, चारे, पिंपरी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे रब्बी कांदा पिकाचे नुकसान झाले.
काही ठिकाणी शेतात काढून पडलेली ज्वारी, खळ्यातील पिके भिजली. वाऱ्यामुळे गंजीचा कडबा उडाल्याने नुकसान झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, कारंबा, पाकणी, कोंडी परिसरात गारांसह हलकासा पाऊस झाला. रात्री नऊ वाजता झालेल्या या पावसामुळे उशिरा काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.