[ad_1]
इचलकरंजी | प्रविण पवार | गेले अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात यश आले असून तसा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सच्या बैठकीत घेण्यात आलाय. याची माहिती हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिलीय.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशिल माने, तसेच इतर स्थानिक प्रतिनिधींनी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या चर्चेतून इचलकरंजी शहराला कागल तालुक्यातील सुळकुड येथील दूधगंगा नदीतून पाण्याचा उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कागल शहराला पाण्याचा एकही थेंब कमी न पडू देता हे नियोजन केले जाणार आहे, भविष्यात सुळकुडच्या पुढे एक बंधारा बांधून तिथून इचलकरंजीला पाणी पुरवठा केला जाणार असल्याचेही माने यांनी स्पष्ट केलंय.
इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न मिटावा यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झालेत. त्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधीही खर्ची घालण्यात आला आहे. तरीदेखील अद्याप इतलकरंजी शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात अपयश आले होते. आज झालेल्या निर्णयामुळे भविष्यात इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल अशी आशा यामुळे निर्माण झालीय.
[ad_2]
Source link