[ad_1]
सोलापूर ः ‘‘उजनी जलाशयासाठी करमाळा तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले. मात्र ज्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, तोच तालुका शेतीच्या नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीही तहानलेला आहे. त्यामुळे दहीगाव, कुकडी उपसा सिंचन या योजनेमधून ‘टेल टू हेड’ या धोरणानुसार पाणी मिळायला हवे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे-पाटील यांनी दिला.
वरकुटे (ता. करमाळा) येथे जनशक्ती शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी नितीन जगताप, सूरज धोत्रे, मोहन गायकवाड, गणेश गुंडगिरे, पपू कोळी, सुरेश डोलारे, अक्षय शिंदे, नयन मस्के, राजाभाऊ डोलारे, समाधान डोलारे, रामराजे डोलारे, राणा वाघमारे, चंदू डोलारे, बप्पा डोलारे, महेश डोलारे, रघुनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
खुपसे म्हणाले, ‘‘विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते ‘टेल टू हेड’ या नियमाला तिलांजली देत, जेसीबी मशिनच्या साह्याने कॅनॉल फोडून सोयीने आणि सवडीने पाणी घेत आहेत. या दादागिरीला अधिकारीदेखील पाठिंबा दर्शवीत काणाडोळा करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात ही दादागिरी मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी लढ्यात उतरले पाहिजे.’’
सोलापूर ः ‘‘उजनी जलाशयासाठी करमाळा तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले. मात्र ज्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, तोच तालुका शेतीच्या नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीही तहानलेला आहे. त्यामुळे दहीगाव, कुकडी उपसा सिंचन या योजनेमधून ‘टेल टू हेड’ या धोरणानुसार पाणी मिळायला हवे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे-पाटील यांनी दिला.
वरकुटे (ता. करमाळा) येथे जनशक्ती शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी नितीन जगताप, सूरज धोत्रे, मोहन गायकवाड, गणेश गुंडगिरे, पपू कोळी, सुरेश डोलारे, अक्षय शिंदे, नयन मस्के, राजाभाऊ डोलारे, समाधान डोलारे, रामराजे डोलारे, राणा वाघमारे, चंदू डोलारे, बप्पा डोलारे, महेश डोलारे, रघुनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
खुपसे म्हणाले, ‘‘विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते ‘टेल टू हेड’ या नियमाला तिलांजली देत, जेसीबी मशिनच्या साह्याने कॅनॉल फोडून सोयीने आणि सवडीने पाणी घेत आहेत. या दादागिरीला अधिकारीदेखील पाठिंबा दर्शवीत काणाडोळा करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात ही दादागिरी मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी लढ्यात उतरले पाहिजे.’’
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.