[ad_1]
पुणे : आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे रविवारी दिवसभर धुक्याचे साम्राज्य पसरल्यानंतर सोमवारी (ता.२४) राज्याच्या किमान तापमानात वेगाने घसरण झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.२५) उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला असून, उर्वरीत राज्यातही गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आखाती देशातून पाकिस्तान, राजस्थानकडे येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्याने आणि वेग अधिक असल्याने धुळीचे वादळ थेट महाराष्ट्रात पोचले. या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात दिवसभर धुके पसरले होते. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमान ३० अंशाच्या खाली घसरले. तर सायंकाळनंतर किमान तापमानात मोठी घट होत गेली.
सोमवारी पहाटे उत्तर महाराष्ट्रातील निफाड, नाशिक, धुळे, जळगाव, मालेगावसह पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली आले. तर उर्वरित राज्यात गारठा वाढला. उद्या (ता.२५) उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. वायव्य भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थानसह, गुजरात, मध्य प्रदेशात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा आहे.
सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २४.३ (१०.४), धुळे २४.० (६.८), जळगाव २८.० (९.२), कोल्हापूर २७.७ (१६.१), महाबळेश्वर १८.५(६.५), मालेगाव २९.० (९.६), नाशिक २१.६ (६.६), निफाड २२.५ (५.५ ), सांगली २८.५ (१६.४), सातारा २६.८(१४.९), सोलापूर ३०.८ (१४.०), सांताक्रूझ २३.८(१५.०), अलिबाग – (१४.७), डहाणू ३०.२ (१३.६), रत्नागिरी २८.७ (१८.९), औरंगाबाद २३.६ (१०.२), नांदेड २७.४ (१४.६), उस्मानाबाद – (१४.७), परभणी २७.५ (१२.९), अकोला २६.४ (१३.४), अमरावती २५.६ (१३.७), बुलडाणा २७.६ (११.०), ब्रह्मपुरी – (१४.१), चंद्रपूर – (१४.२), गडचिरोली २७.०(११.४), गोंदिया २७.५ (१३.०), नागपूर २७.९ (१४.३), वर्धा २७.०(१३.०), वाशीम ३२.० (-), यवतमाळ २६.७ (१२.५).
दहा अंशांपेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे
निफाड ५.५, महाबळेश्वर – ६.५, नाशिक ६.६, धुळे ६.८, जळगाव ९.२, मालेगाव ९.६.
थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट)
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक
राज्यातील वातावरण बदलावर दृष्टिक्षेप
खानदेश
खानदेशात सूर्यदर्शनच नाही
दिवसभर ढगाळ वातावरण, तापमानातही घसरण
कुठे दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली
जळगाव, धुळ्यात आठ अंश सेल्सीअसपर्यंतच्या तापमानाची नोद
रत्नागिरी
जिल्ह्यात हलके धुळीच साम्राज्य पसरले
धुळीचे वादळ सोमवारपर्यंत (ता. 24) राहण्याचा अंदाज
उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग धुळीकणांच्या लोळांनी झाकोळला
रविवारी पहाटेच अवकाळी पाऊस झाल्याने ढगाळ वातावरण
वाऱ्याचा वेग देखील वाढला होता
वैभववाडी, तळेरे, खारेपाटण, फोंडा परिसर झाकोळला होता
नाशिक
रविवारी सकाळपासूनच धुके आणि धुळीचे कण
तापमानात घट झाल्याने द्राक्ष मण्यांना तडे
द्राक्ष मण्यांची फुगवण, साखर उतरण्यास अडचण
निफाड येथे सोमवारी (ता.२४) रोजी ५.५ अंश सेल्सिअसची नोंद
पुढील ४ ते ५ दिवस चांगली थंडी राहण्याचा अंदाज
कांदा, गहू, हरभरा या पिकांसाठी वातावरण अनुकूल
कांद्यावर करपा, बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव
पुणे : आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे रविवारी दिवसभर धुक्याचे साम्राज्य पसरल्यानंतर सोमवारी (ता.२४) राज्याच्या किमान तापमानात वेगाने घसरण झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.२५) उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला असून, उर्वरीत राज्यातही गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आखाती देशातून पाकिस्तान, राजस्थानकडे येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्याने आणि वेग अधिक असल्याने धुळीचे वादळ थेट महाराष्ट्रात पोचले. या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात दिवसभर धुके पसरले होते. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमान ३० अंशाच्या खाली घसरले. तर सायंकाळनंतर किमान तापमानात मोठी घट होत गेली.
सोमवारी पहाटे उत्तर महाराष्ट्रातील निफाड, नाशिक, धुळे, जळगाव, मालेगावसह पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली आले. तर उर्वरित राज्यात गारठा वाढला. उद्या (ता.२५) उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. वायव्य भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थानसह, गुजरात, मध्य प्रदेशात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा आहे.
सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २४.३ (१०.४), धुळे २४.० (६.८), जळगाव २८.० (९.२), कोल्हापूर २७.७ (१६.१), महाबळेश्वर १८.५(६.५), मालेगाव २९.० (९.६), नाशिक २१.६ (६.६), निफाड २२.५ (५.५ ), सांगली २८.५ (१६.४), सातारा २६.८(१४.९), सोलापूर ३०.८ (१४.०), सांताक्रूझ २३.८(१५.०), अलिबाग – (१४.७), डहाणू ३०.२ (१३.६), रत्नागिरी २८.७ (१८.९), औरंगाबाद २३.६ (१०.२), नांदेड २७.४ (१४.६), उस्मानाबाद – (१४.७), परभणी २७.५ (१२.९), अकोला २६.४ (१३.४), अमरावती २५.६ (१३.७), बुलडाणा २७.६ (११.०), ब्रह्मपुरी – (१४.१), चंद्रपूर – (१४.२), गडचिरोली २७.०(११.४), गोंदिया २७.५ (१३.०), नागपूर २७.९ (१४.३), वर्धा २७.०(१३.०), वाशीम ३२.० (-), यवतमाळ २६.७ (१२.५).
दहा अंशांपेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे
निफाड ५.५, महाबळेश्वर – ६.५, नाशिक ६.६, धुळे ६.८, जळगाव ९.२, मालेगाव ९.६.
थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट)
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक
राज्यातील वातावरण बदलावर दृष्टिक्षेप
खानदेश
खानदेशात सूर्यदर्शनच नाही
दिवसभर ढगाळ वातावरण, तापमानातही घसरण
कुठे दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली
जळगाव, धुळ्यात आठ अंश सेल्सीअसपर्यंतच्या तापमानाची नोद
रत्नागिरी
जिल्ह्यात हलके धुळीच साम्राज्य पसरले
धुळीचे वादळ सोमवारपर्यंत (ता. 24) राहण्याचा अंदाज
उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग धुळीकणांच्या लोळांनी झाकोळला
रविवारी पहाटेच अवकाळी पाऊस झाल्याने ढगाळ वातावरण
वाऱ्याचा वेग देखील वाढला होता
वैभववाडी, तळेरे, खारेपाटण, फोंडा परिसर झाकोळला होता
नाशिक
रविवारी सकाळपासूनच धुके आणि धुळीचे कण
तापमानात घट झाल्याने द्राक्ष मण्यांना तडे
द्राक्ष मण्यांची फुगवण, साखर उतरण्यास अडचण
निफाड येथे सोमवारी (ता.२४) रोजी ५.५ अंश सेल्सिअसची नोंद
पुढील ४ ते ५ दिवस चांगली थंडी राहण्याचा अंदाज
कांदा, गहू, हरभरा या पिकांसाठी वातावरण अनुकूल
कांद्यावर करपा, बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.