[ad_1]
नायगाव, जि. उस्मानाबाद : ऊस, सोयाबीन, फळबागा यासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद जिल्हा सततचा दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासला आहे. अशा वेळी इथे रेशमाचे धागे आता घट्ट बनले असून, शेतकऱ्यांना रेशीम शेतीने चांगला आधार व साथ दिली आहे.
येत्या काळात रेशीम शेतीही उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव घेतल्यास आश्चर्य वाटू नये. पूर्वी जिल्ह्यात जवळपास पंधराशे एकरावर रेशीम तुतीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तर २०२१ मध्ये जवळपास ५६० शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण, अनुदान यांच्या आधारे शेतकरी चांगल्या दर्जाचे रेशीम कोष तयार करू लागला आहे. वर्षाला सुमारे चार बॅचेस व प्रति बॅच सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले तरी या शेतीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम व शाश्वत होत आहे. सद्यःस्थितीत शेतीतील विविध समस्यांनी शेतकरी त्रस्त झाला आहे. पाऊस बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना हुकमी पर्याय शोधत आहेत. सध्या जिल्ह्याची मागासलेली ओळख पुसून उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी यातूनच शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून रेशीम उद्योगाचा पर्याय निवडला आहे.
कळंब तालुका अग्रेसर
रेशीम तुती लागवडीत जिल्ह्यातील निम्मा वाटा कळंब तालुक्याचा आहे. रेशीमचे कोठार म्हणून कळंब तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. तालुक्यात जवळपास आठशे एकरावर या पूर्वी रेशीम तुतीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. पुढील वर्षासाठी ३०० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचे लागवडीसाठी नाव नोंदणी केली आहे.
रेशीम शेती का भावते शेतकऱ्यांना?
बेभरवशाचे हवामान व शेतमालाचे दर यांच्यापेक्षा रेशीम शेती शेतकऱ्यांना शाश्वत वाटत आहे. नेटके व्यवस्थापन, हवामान अनुकूल दर मिळाल्यास प्रति बॅच अगदी ५० हजारांच्या दरम्यानही उत्पन्न देण्याची क्षमता तुतीची आहे. शिवाय एकदा लागवड केली की ती १५ वर्षांपर्यंत टिकते. तसेच रोग, किडींचा फार मोठा प्रादुर्भाव होत नसल्याने फवारणींची गरज अधिकची पडत नाही. तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत रेशीम कोषांना दर चांगला मिळतो.
नायगाव, जि. उस्मानाबाद : ऊस, सोयाबीन, फळबागा यासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद जिल्हा सततचा दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासला आहे. अशा वेळी इथे रेशमाचे धागे आता घट्ट बनले असून, शेतकऱ्यांना रेशीम शेतीने चांगला आधार व साथ दिली आहे.
येत्या काळात रेशीम शेतीही उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव घेतल्यास आश्चर्य वाटू नये. पूर्वी जिल्ह्यात जवळपास पंधराशे एकरावर रेशीम तुतीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तर २०२१ मध्ये जवळपास ५६० शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण, अनुदान यांच्या आधारे शेतकरी चांगल्या दर्जाचे रेशीम कोष तयार करू लागला आहे. वर्षाला सुमारे चार बॅचेस व प्रति बॅच सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले तरी या शेतीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम व शाश्वत होत आहे. सद्यःस्थितीत शेतीतील विविध समस्यांनी शेतकरी त्रस्त झाला आहे. पाऊस बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना हुकमी पर्याय शोधत आहेत. सध्या जिल्ह्याची मागासलेली ओळख पुसून उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी यातूनच शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून रेशीम उद्योगाचा पर्याय निवडला आहे.
कळंब तालुका अग्रेसर
रेशीम तुती लागवडीत जिल्ह्यातील निम्मा वाटा कळंब तालुक्याचा आहे. रेशीमचे कोठार म्हणून कळंब तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. तालुक्यात जवळपास आठशे एकरावर या पूर्वी रेशीम तुतीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. पुढील वर्षासाठी ३०० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचे लागवडीसाठी नाव नोंदणी केली आहे.
रेशीम शेती का भावते शेतकऱ्यांना?
बेभरवशाचे हवामान व शेतमालाचे दर यांच्यापेक्षा रेशीम शेती शेतकऱ्यांना शाश्वत वाटत आहे. नेटके व्यवस्थापन, हवामान अनुकूल दर मिळाल्यास प्रति बॅच अगदी ५० हजारांच्या दरम्यानही उत्पन्न देण्याची क्षमता तुतीची आहे. शिवाय एकदा लागवड केली की ती १५ वर्षांपर्यंत टिकते. तसेच रोग, किडींचा फार मोठा प्रादुर्भाव होत नसल्याने फवारणींची गरज अधिकची पडत नाही. तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत रेशीम कोषांना दर चांगला मिळतो.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.