[ad_1]
विहामांडवा, जि. औरंगाबाद : वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, विहामांडवासह नवगाव, तुळजापूर, टाकळी अंबड, हिरडपुरी, आपेगाव, हिंगणी आदी परिसरात रविवारी (ता.६) सायंकाळच्या सुमारास जोराच्या वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. त्यामुळे महिनाभरात कारखान्याला जाणारा ऊस आडवा झाला. या वाऱ्याच्या झटक्याने काही ऊस उन्मळून पडला आहे. आधी मूग गेला. सोयाबीनचे पीकही करपा आणि बुरशीने जाण्याच्या मार्गावर आहे.
विश्रांतीनंतर पावसाने लावलेली हजेरी काही ठिकाणच्या खरिपातील कापूस तूर, बाजरी, सोयाबीन, भुईमुगासारख्या पिकांना जीवदान देणारी ठरली. असे असतानाच उसाला त्याचा मोठा फटका बसला. विहामांडवा सह नवगाव, तुळजापूर, हिरडापुरी, टाकळी अंबड, आपेगाव, विहामांडवा, हिंगणीआदी गनथडी भागात शेकडो हेक्टरवर उस पीक घेतले जाते.
शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थचक्र त्यावर चालते. कबाडकष्ट करून मोठ्या उमेदीने चांगल्या पध्दतीने त्यांनी ऊस जोपासला आहे. सध्या उसाची पिके १८ ते २५ कांड्यावर आहेत. वाढही अपेक्षित झालेली आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून शेतकऱ्यांनी पिकावर लक्ष केंद्रित केल्याने ऊसाचे पीक बहरले. मात्र वादळी वाऱ्यामुळे त्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
आधीच हुमणी व लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव त्यावर ठिकठिकाणी आहे. हुमणी किडीने मुळांना लक्ष्य केले आहे. तर, माव्याने पानावर हल्ला केला आहे. त्यातच झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राजेंद्र पन्हाळकर, कैलास सातपुते, मोहन भाकरे, नवगाव गणाचे पंचायत समितीचे सदस्य रशिदाबी शेख, ग्रामपंचायत समितीचे सदस्य सत्तार शिंदे, विलास नरोडे, बाळासाहेब येवले, डॉ. शरीफ पठाण, हाशम पठाण, परमेश्वर डांगे, अख्तर पठाण, मुक्तार पठाण आदीनी तहसिलदार चंद्रकांत शेळके यांची भेट घेऊन नुकसाग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
विहामांडवा, जि. औरंगाबाद : वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, विहामांडवासह नवगाव, तुळजापूर, टाकळी अंबड, हिरडपुरी, आपेगाव, हिंगणी आदी परिसरात रविवारी (ता.६) सायंकाळच्या सुमारास जोराच्या वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. त्यामुळे महिनाभरात कारखान्याला जाणारा ऊस आडवा झाला. या वाऱ्याच्या झटक्याने काही ऊस उन्मळून पडला आहे. आधी मूग गेला. सोयाबीनचे पीकही करपा आणि बुरशीने जाण्याच्या मार्गावर आहे.
विश्रांतीनंतर पावसाने लावलेली हजेरी काही ठिकाणच्या खरिपातील कापूस तूर, बाजरी, सोयाबीन, भुईमुगासारख्या पिकांना जीवदान देणारी ठरली. असे असतानाच उसाला त्याचा मोठा फटका बसला. विहामांडवा सह नवगाव, तुळजापूर, हिरडापुरी, टाकळी अंबड, आपेगाव, विहामांडवा, हिंगणीआदी गनथडी भागात शेकडो हेक्टरवर उस पीक घेतले जाते.
शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थचक्र त्यावर चालते. कबाडकष्ट करून मोठ्या उमेदीने चांगल्या पध्दतीने त्यांनी ऊस जोपासला आहे. सध्या उसाची पिके १८ ते २५ कांड्यावर आहेत. वाढही अपेक्षित झालेली आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून शेतकऱ्यांनी पिकावर लक्ष केंद्रित केल्याने ऊसाचे पीक बहरले. मात्र वादळी वाऱ्यामुळे त्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
आधीच हुमणी व लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव त्यावर ठिकठिकाणी आहे. हुमणी किडीने मुळांना लक्ष्य केले आहे. तर, माव्याने पानावर हल्ला केला आहे. त्यातच झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राजेंद्र पन्हाळकर, कैलास सातपुते, मोहन भाकरे, नवगाव गणाचे पंचायत समितीचे सदस्य रशिदाबी शेख, ग्रामपंचायत समितीचे सदस्य सत्तार शिंदे, विलास नरोडे, बाळासाहेब येवले, डॉ. शरीफ पठाण, हाशम पठाण, परमेश्वर डांगे, अख्तर पठाण, मुक्तार पठाण आदीनी तहसिलदार चंद्रकांत शेळके यांची भेट घेऊन नुकसाग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
[ad_2]
Source link