[ad_1]
मल्हारपेठ, जि. सातारा ः कोरोनासाठी कडक निर्बंध लावल्याने मोठे आठवडे बाजार बंद झाले. भाजीपाल्यासह कलिंगडाला कवडीमोल भाव मिळत असल्याने कलिंगड विक्रीऐवजी रस्त्याकडेला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लॉकडाउनला पर्याय शोधून संचारबंदीबरोबर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपत्कालीन व्यवस्था वगळता सर्वच ठिकाणी कडक निर्बंध लादले गेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच गावांचे मोठे आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत.
ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यास थंडपेयांबरोबर कलिंगडालाही मागणी होत असते. मात्र कोरोना फैलावात कलिंगडांकडे खवय्यांनी पाठ फिरवली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बाजारात एरवी ५० रुपयांपासून ते ८०, ९० रुपयाला तीन ते चार किलो वजनाचे कलिंगड विकले जायचे. ते सध्या दहा ते १५ रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे घातलेला खर्चपण निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी कलिंगडे फोडून चिरून जनावरांना खायला घालण्यास प्रारंभ केला आहे. मात्र बाजारात आवकच मोठ्या प्रमाणावर होत असल्याने काढलेला माल बाजारात विक्रीसाठी न्यायचा तर दर नाही.
गेल्या दोन आठवड्यांत हवेतील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने कलिंगडाला पांढरे डाग पडले आहेत. त्यामुळे आतील गराचा रंग अति उष्णतेमुळे पिवळसर झाला आहे. त्यामुळेही ते विकता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न आहे.
मल्हारपेठ, जि. सातारा ः कोरोनासाठी कडक निर्बंध लावल्याने मोठे आठवडे बाजार बंद झाले. भाजीपाल्यासह कलिंगडाला कवडीमोल भाव मिळत असल्याने कलिंगड विक्रीऐवजी रस्त्याकडेला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लॉकडाउनला पर्याय शोधून संचारबंदीबरोबर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपत्कालीन व्यवस्था वगळता सर्वच ठिकाणी कडक निर्बंध लादले गेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच गावांचे मोठे आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत.
ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यास थंडपेयांबरोबर कलिंगडालाही मागणी होत असते. मात्र कोरोना फैलावात कलिंगडांकडे खवय्यांनी पाठ फिरवली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बाजारात एरवी ५० रुपयांपासून ते ८०, ९० रुपयाला तीन ते चार किलो वजनाचे कलिंगड विकले जायचे. ते सध्या दहा ते १५ रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे घातलेला खर्चपण निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी कलिंगडे फोडून चिरून जनावरांना खायला घालण्यास प्रारंभ केला आहे. मात्र बाजारात आवकच मोठ्या प्रमाणावर होत असल्याने काढलेला माल बाजारात विक्रीसाठी न्यायचा तर दर नाही.
गेल्या दोन आठवड्यांत हवेतील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने कलिंगडाला पांढरे डाग पडले आहेत. त्यामुळे आतील गराचा रंग अति उष्णतेमुळे पिवळसर झाला आहे. त्यामुळेही ते विकता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.