[ad_1]
नगर : पावसाने आधीच कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना जे हाती आले, तेही मातीमोल दराने विकावे लागत आहेत. दर्जा नसल्याचे कारण पुढे करत गावपातळीवर कापूस खरेदी करणारे व्यापारी अल्प दराने कापसाची खरेदी करत आहेत.
नगर जिल्ह्यात यंदा सव्वा लाख हेक्टरवर कापसाचे उत्पादन घेतले आहे. मात्र अजून कोठेच सरकारी खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. बाजार समितीच्या आवारात तसेच आठवडी बाजारात खासगी किरकोळ, ठोक खरेदीदार कापसाची खरेदी करत आहेत. मात्र कापसाला दर्जा नसल्याचे सांगत वाटेल त्या दरात कापूस खरेदी करून सर्रास लूट सुरू आहे.
कापसाला साधारण ५८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळणे अपेक्षित असताना पावसाने भिजलेल्या सोबत चांगल्या दर्जाचा कापूसही ३००० ते ४००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. मुळात कापूस वेचणीला प्रति किलोला दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत असताना तीस रुपये मिळतात, त्यामुळे पन्नास टक्केही रक्कम पदरात पडत नाही.
अनधिकृत खरेदी कोण थांबवणार
नगर जिल्ह्यातील तालुक्याच्या गावी, तसेच आठवडी बाजार असलेल्या गावांत खासगी खरेदीदार व्यापाऱ्यांनी सर्रास अनधिकृत दुकाने थाटली आहेत. बहुतांश खरेदीदार हे बाजार समित्यांशी निगडित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट केली जात असताना बाजार समित्या, स्थानिक ग्रामपंचायती अनधिकृत खरेदीकडे दुर्लक्ष करत आहेत.
प्रतिक्रिया
शेवगाव तालुक्यात गेल्या वर्षी दोन ठिकाणी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होती. यंदा अजूनही केंद्रे सुरू झाली नाहीत. त्यामुळे खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबवावी.
– अप्पासाहेब हरदास, शेतकरी, वडुले बुद्रुक
नगर : पावसाने आधीच कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना जे हाती आले, तेही मातीमोल दराने विकावे लागत आहेत. दर्जा नसल्याचे कारण पुढे करत गावपातळीवर कापूस खरेदी करणारे व्यापारी अल्प दराने कापसाची खरेदी करत आहेत.
नगर जिल्ह्यात यंदा सव्वा लाख हेक्टरवर कापसाचे उत्पादन घेतले आहे. मात्र अजून कोठेच सरकारी खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. बाजार समितीच्या आवारात तसेच आठवडी बाजारात खासगी किरकोळ, ठोक खरेदीदार कापसाची खरेदी करत आहेत. मात्र कापसाला दर्जा नसल्याचे सांगत वाटेल त्या दरात कापूस खरेदी करून सर्रास लूट सुरू आहे.
कापसाला साधारण ५८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळणे अपेक्षित असताना पावसाने भिजलेल्या सोबत चांगल्या दर्जाचा कापूसही ३००० ते ४००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. मुळात कापूस वेचणीला प्रति किलोला दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत असताना तीस रुपये मिळतात, त्यामुळे पन्नास टक्केही रक्कम पदरात पडत नाही.
अनधिकृत खरेदी कोण थांबवणार
नगर जिल्ह्यातील तालुक्याच्या गावी, तसेच आठवडी बाजार असलेल्या गावांत खासगी खरेदीदार व्यापाऱ्यांनी सर्रास अनधिकृत दुकाने थाटली आहेत. बहुतांश खरेदीदार हे बाजार समित्यांशी निगडित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट केली जात असताना बाजार समित्या, स्थानिक ग्रामपंचायती अनधिकृत खरेदीकडे दुर्लक्ष करत आहेत.
प्रतिक्रिया
शेवगाव तालुक्यात गेल्या वर्षी दोन ठिकाणी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होती. यंदा अजूनही केंद्रे सुरू झाली नाहीत. त्यामुळे खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबवावी.
– अप्पासाहेब हरदास, शेतकरी, वडुले बुद्रुक
[ad_2]
Source link