[ad_1]
मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे कॉटन कॉर्पेारेशन आॅफ इंडिया (सीसीआय) आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासूनच प्रभावी नियोजन करून कापूस खरेदी व्यवस्थितपणे पार पाडावी, अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत.
आगामी हंगामाच्या पूर्व तयारीबाबतचा आढावा मंत्री पाटील यांनी मंगळवारी (ता.२९) मंत्रालयात घेतला. बैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन संचालक सतीश सोनी, ‘सीसीआय’चे व्यवस्थापकीय संचालक पी. के. अग्रवाल आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, की कृषी खात्याच्या अंदाजानुसार आगामी हंगामामध्ये सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आले असून ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपेक्षित आहे. याचा विचार करून सीसीआय, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासून कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे. जेणेकरून खरेदी प्रक्रियेत अडथळे राहणार नाहीत.
जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी यांच्याशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करून प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान १ ग्रेडर असावा. कापूस खरेदी पूर्वीच कृषी विभागामार्फत आवश्यक ते मनुष्यबळ ग्रेडर म्हणून उपलब्ध करून घेत त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावेत. खरेदी केलेल्या कापूस साठवणुकीची व्यवस्था, सुविधा इतर नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने गोदामे, शेड, ताडपत्री ही व्यवस्था करावी.
बाजार समितीच्या स्तरावर शेतकरीनिहाय नोंदवही, रेकॉर्ड ठेवले जावे. ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावेत. खरेदी केंद्रांवर कापूस आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना कापूस खरेदीचे ठिकाण व वेळ याबाबत मोबाईलव्दारे संदेश पाठविण्यात यावेत, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.
प्रतिक्रिया
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी एकाच वेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही, या दृष्टीने सर्व उपाययोजना करावी. तसेच गाडी पार्किंग, शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था करावी.
– बाळासाहेब पाटील, सहकार व पणनमंत्री.
मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे कॉटन कॉर्पेारेशन आॅफ इंडिया (सीसीआय) आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासूनच प्रभावी नियोजन करून कापूस खरेदी व्यवस्थितपणे पार पाडावी, अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत.
आगामी हंगामाच्या पूर्व तयारीबाबतचा आढावा मंत्री पाटील यांनी मंगळवारी (ता.२९) मंत्रालयात घेतला. बैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन संचालक सतीश सोनी, ‘सीसीआय’चे व्यवस्थापकीय संचालक पी. के. अग्रवाल आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, की कृषी खात्याच्या अंदाजानुसार आगामी हंगामामध्ये सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आले असून ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपेक्षित आहे. याचा विचार करून सीसीआय, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासून कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे. जेणेकरून खरेदी प्रक्रियेत अडथळे राहणार नाहीत.
जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी यांच्याशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करून प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान १ ग्रेडर असावा. कापूस खरेदी पूर्वीच कृषी विभागामार्फत आवश्यक ते मनुष्यबळ ग्रेडर म्हणून उपलब्ध करून घेत त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावेत. खरेदी केलेल्या कापूस साठवणुकीची व्यवस्था, सुविधा इतर नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने गोदामे, शेड, ताडपत्री ही व्यवस्था करावी.
बाजार समितीच्या स्तरावर शेतकरीनिहाय नोंदवही, रेकॉर्ड ठेवले जावे. ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावेत. खरेदी केंद्रांवर कापूस आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना कापूस खरेदीचे ठिकाण व वेळ याबाबत मोबाईलव्दारे संदेश पाठविण्यात यावेत, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.
प्रतिक्रिया
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी एकाच वेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही, या दृष्टीने सर्व उपाययोजना करावी. तसेच गाडी पार्किंग, शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था करावी.
– बाळासाहेब पाटील, सहकार व पणनमंत्री.
[ad_2]
Source link