[ad_1]
नांदेड ः आदिवासी विकास महामंडळअंतर्गत किमान आधारभूत किंमत ज्वारी, मका आदी भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीची मुदत ३० जून रोजी संपली आहे. खरेदीस मुदत वाढ न दिल्यामुळे जलधारा (ता.किनवट) येथील केंद्रांवर नोंदणी केलेल्या केलेल्या किनवट तालुक्यातील ६११ शेतकऱ्यांची १४ हजारांवर क्विंटल ज्वारीचे मोजमाप तब्बल दीड महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जलधारा येथील केंद्रांवर हमीभावाने ज्वारीची विक्री करण्यासाठी जलधारा येथील केंद्रांवर ११ मे पासून ज्वारी आणि मका खरेदी सुरू करण्यात आली होती. ज्वारी खरेदीसाठी ३० जून तर मका खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत होती. विहित मुदतीत ११ हजार २९८ क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली तर ५० हजारांवर क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना विहित मुदतीत केंद्रांवर ज्वारी नेता आली नाही. त्यामुळे तब्बल ६११ शेतकऱ्यांची १४ हजार ५८६ क्विंटल ज्वारी घरात पडून आहे. या ज्वारीचे मोजमाप करून घेतले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरेदी केंद्र सुरू करून ज्वारीचे मोजमाप करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतरही मोठा कालावधी उलटला तरी अद्याप ज्वारीचे मोजमाप झालेले नाही.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे देखील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र सुरू करून ज्वारीचे मोजमाप करून घ्यावे, अशी मागणी केली. परंतु त्यानंतरीही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे सणासुदीच्या काळात मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तत्काळ ज्वारीचे वजनमाप करून घेऊन शेतकऱ्यांना चुकारे अदा करावेत, अशी मागणी मोजमाप शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.
सहाशेहून अधिक शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदी बाकी आहे. खरेदी सुरू करण्यासाठी नागरी पुरवठा विभागाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. परंतु त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
– बी. एस. भरकमकर,
उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, किनवट
नांदेड ः आदिवासी विकास महामंडळअंतर्गत किमान आधारभूत किंमत ज्वारी, मका आदी भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीची मुदत ३० जून रोजी संपली आहे. खरेदीस मुदत वाढ न दिल्यामुळे जलधारा (ता.किनवट) येथील केंद्रांवर नोंदणी केलेल्या केलेल्या किनवट तालुक्यातील ६११ शेतकऱ्यांची १४ हजारांवर क्विंटल ज्वारीचे मोजमाप तब्बल दीड महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जलधारा येथील केंद्रांवर हमीभावाने ज्वारीची विक्री करण्यासाठी जलधारा येथील केंद्रांवर ११ मे पासून ज्वारी आणि मका खरेदी सुरू करण्यात आली होती. ज्वारी खरेदीसाठी ३० जून तर मका खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत होती. विहित मुदतीत ११ हजार २९८ क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली तर ५० हजारांवर क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना विहित मुदतीत केंद्रांवर ज्वारी नेता आली नाही. त्यामुळे तब्बल ६११ शेतकऱ्यांची १४ हजार ५८६ क्विंटल ज्वारी घरात पडून आहे. या ज्वारीचे मोजमाप करून घेतले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरेदी केंद्र सुरू करून ज्वारीचे मोजमाप करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतरही मोठा कालावधी उलटला तरी अद्याप ज्वारीचे मोजमाप झालेले नाही.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे देखील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र सुरू करून ज्वारीचे मोजमाप करून घ्यावे, अशी मागणी केली. परंतु त्यानंतरीही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे सणासुदीच्या काळात मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तत्काळ ज्वारीचे वजनमाप करून घेऊन शेतकऱ्यांना चुकारे अदा करावेत, अशी मागणी मोजमाप शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.
सहाशेहून अधिक शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदी बाकी आहे. खरेदी सुरू करण्यासाठी नागरी पुरवठा विभागाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. परंतु त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
– बी. एस. भरकमकर,
उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, किनवट
[ad_2]
Source link