[ad_1]
नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार देवळाली(नाशिक) येथून किसान रेल्वेला प्रारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. ही रेल्वे देवळाली ते दानापूर (बिहार) दरम्यान धावणार आहे.
‘‘देशातील शेतकरी आता रेल्वेमार्गे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फळे आणि भाजीपाला वाहतूक करू शकणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. किसान रेल्वेच्या माध्यमातून फळे, दूध,भाजीपाला असा नाशवंत माल बाजारात वेळेत पोहचणार आहे. यासह राष्ट्रीय पुरवठा शीत साखळी चेन बनविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पडणार आहे,’’ असे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ.भारती पवार, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, आमदार सरोज आहिरे आदी सहभागी झाले होते.
या पहिल्या रेल्वेच्या माध्यमातून २२ टन कोबी, फ्लॉवर, मिरची व कुक्कुट पालन साहित्य पाठविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रतिक्रिया
देशातील पहिली रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. ही निवड सार्थ निवड असून किसान रेल्वेच्या माध्यमातून कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल.
-छगन भुजबळ, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री
नाशिक हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखा जातो, त्यामुळे जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष आणि भाजीपला वाहतुकीसाठी या रेल्वेचं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
-हेमंत गोडसे, खासदार, नाशिक लोकसभा मतदार संघ
शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या किसान रेल्वेमुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या राज्यात शेतमाल पोहचवता येणार आहे.
-डॉ. भारती पवार, खासदार, दिंडोरी लोकसभा मतदार संघ
नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार देवळाली(नाशिक) येथून किसान रेल्वेला प्रारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. ही रेल्वे देवळाली ते दानापूर (बिहार) दरम्यान धावणार आहे.
‘‘देशातील शेतकरी आता रेल्वेमार्गे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फळे आणि भाजीपाला वाहतूक करू शकणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. किसान रेल्वेच्या माध्यमातून फळे, दूध,भाजीपाला असा नाशवंत माल बाजारात वेळेत पोहचणार आहे. यासह राष्ट्रीय पुरवठा शीत साखळी चेन बनविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पडणार आहे,’’ असे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ.भारती पवार, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, आमदार सरोज आहिरे आदी सहभागी झाले होते.
या पहिल्या रेल्वेच्या माध्यमातून २२ टन कोबी, फ्लॉवर, मिरची व कुक्कुट पालन साहित्य पाठविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रतिक्रिया
देशातील पहिली रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. ही निवड सार्थ निवड असून किसान रेल्वेच्या माध्यमातून कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल.
-छगन भुजबळ, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री
नाशिक हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखा जातो, त्यामुळे जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष आणि भाजीपला वाहतुकीसाठी या रेल्वेचं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
-हेमंत गोडसे, खासदार, नाशिक लोकसभा मतदार संघ
शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या किसान रेल्वेमुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या राज्यात शेतमाल पोहचवता येणार आहे.
-डॉ. भारती पवार, खासदार, दिंडोरी लोकसभा मतदार संघ
[ad_2]
Source link