[ad_1]
पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे विक्रेते व कर्मचाऱ्यांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून प्राधान्य देत लसीकरण करावे, अशा सूचना कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्याचा खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत निविष्ठा मिळण्यासाठी कृषी सेवा केंद्र आयुक्तांनी अलीकडेच केंद्रचालकांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. केंद्रचालक व कर्मचारी स्वतःच लसीकरणापासून वंचित असल्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी लसीकरणाची समस्या सुटली पाहिजे, असा मुद्दा केंद्रचालकांच्या प्रतिनिधींनी मांडला. त्यामुळे आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याने विक्रेत्यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे.
शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीडनाशकांचा पुरवठा करण्यात सर्वांत मोलाची भूमिका बजावणाऱ्या कृषी सेवा केंद्रांना कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ‘फ्रंटलाइन वर्कर’ समजले पाहिजे. त्यामुळे त्यांचे लसीकरण प्राधान्याने होऊ शकेल. यामुळे राज्यातील केंद्रे वेळेत सुरू होतील व शेतकऱ्यांना अखंडित सेवा प्रदान करतील, असे आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘केंद्रचालक व कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांसोबत संपर्काचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यामुळे या घटकाला संसर्ग होण्याची शक्यता देखील अधिक आहे. लसीकरण न झाल्यास केंद्रचालक बाधित होण्याची शक्यता असल्याचे कृषी निविष्ठा पुरवठ्याबाबत माफदासोबत झालेल्या चर्चेत आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे,’’ असेही कृषी आयुक्तांनी एका पत्रात स्पष्ट केले आहे.
‘माफदा’च्या पाठपुराव्याला यश
अखिल भारतीय कृषी निविष्ठा संघटनेचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी सांगितले, ‘‘निविष्ठा विक्रेत्यांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून घोषित करावे तसेच लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे यासाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स असोसिएशनचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव बिपिन कासलीवाल यांच्यासह आपण आयुक्तालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यातील गांभीर्य ओळखून आयुक्तांनी स्वतंत्र सूचना जिल्हा प्रशासनाला जारी केल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनातील मोठा अडथळा दूर झाला आहे.’’
पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे विक्रेते व कर्मचाऱ्यांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून प्राधान्य देत लसीकरण करावे, अशा सूचना कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्याचा खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत निविष्ठा मिळण्यासाठी कृषी सेवा केंद्र आयुक्तांनी अलीकडेच केंद्रचालकांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. केंद्रचालक व कर्मचारी स्वतःच लसीकरणापासून वंचित असल्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी लसीकरणाची समस्या सुटली पाहिजे, असा मुद्दा केंद्रचालकांच्या प्रतिनिधींनी मांडला. त्यामुळे आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याने विक्रेत्यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे.
शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीडनाशकांचा पुरवठा करण्यात सर्वांत मोलाची भूमिका बजावणाऱ्या कृषी सेवा केंद्रांना कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ‘फ्रंटलाइन वर्कर’ समजले पाहिजे. त्यामुळे त्यांचे लसीकरण प्राधान्याने होऊ शकेल. यामुळे राज्यातील केंद्रे वेळेत सुरू होतील व शेतकऱ्यांना अखंडित सेवा प्रदान करतील, असे आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘केंद्रचालक व कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांसोबत संपर्काचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यामुळे या घटकाला संसर्ग होण्याची शक्यता देखील अधिक आहे. लसीकरण न झाल्यास केंद्रचालक बाधित होण्याची शक्यता असल्याचे कृषी निविष्ठा पुरवठ्याबाबत माफदासोबत झालेल्या चर्चेत आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे,’’ असेही कृषी आयुक्तांनी एका पत्रात स्पष्ट केले आहे.
‘माफदा’च्या पाठपुराव्याला यश
अखिल भारतीय कृषी निविष्ठा संघटनेचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी सांगितले, ‘‘निविष्ठा विक्रेत्यांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून घोषित करावे तसेच लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे यासाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स असोसिएशनचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव बिपिन कासलीवाल यांच्यासह आपण आयुक्तालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यातील गांभीर्य ओळखून आयुक्तांनी स्वतंत्र सूचना जिल्हा प्रशासनाला जारी केल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनातील मोठा अडथळा दूर झाला आहे.’’
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.