[ad_1]
कोल्हापूर : देशात वाढलेले साखर उत्पादन आणि कमी खपाने अडचण निर्माण झालेली असतानाच आता केंद्रानेही भरीस भर म्हणून एप्रिल महिन्याचा स्थानिक विक्री कोटा तब्बल २२ लाख टन इतका दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सरासरी १८ लाखांचा कोटा देण्यात येत होता. परंतु यंदाच्या एप्रिलसाठी चार लाख टन वाढवून दिल्याने आता ही साखर विकायची कशी या चिंतेत कारखानदार आहेत. देशावर लॉकडाउनचे संकट घोंघावत असताना हा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने वाढीव कोट्याच्या विरोधात दाद मागितली आहे.
विक्री होत नसल्याने केंद्राने गेल्या चार महिन्यांपासून अठरा टनापर्यंत विक्रीचा कोटा दिला होता. तोही पूर्ण करेपर्यंत कारखान्यांना नाकी नऊ आले होते. यातच केंद्राचा हा निर्णय आतबट्याचा ठरणार आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात इतर महिन्यांच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्क्यांनी साखरेची विक्री वाढते. लग्न समारंभ, शीतपेय, आइस्क्रीम कंपन्यांना मोठ्या प्रमाणात साखर लागते. यामुळे फेब्रुवारीपासून साखर बाजारात काहीशी तेजी निर्माण होते. परंतु यंदा लॉकडाउनच्या सावटामुळे अगदी नाममात्र खरेदी देशातील या उद्योगांनी केली आहे.
सहकारी कारखान्यांची साखर शिल्लक
मिळेल त्या दरामध्ये साखर विक्री करीत उत्तरप्रदेशच्या खासगी साखर कारखान्यांनी दिलेला कोटा पूर्ण केला आहे. पण सहकारी कारखान्यांना मात्र अनेक तांत्रिक अडचणीतून सामोरे जावे लागत असल्याने सहकारी साखर कारखान्यांची साखर शिल्लक आहे. बॅंकेचे व्याज वाढत असल्याने हे कारखाने आणखी अडचणीत आल्याचे साखर संघाच्या सूत्रांनी सांगितले.
ही परिस्थिती केंद्र शासनाच्या नजरेस आणली आहे. या कोट्याच्या साखर विक्रीसाठी मुदतवाढ व पुढील महिन्याचा मर्यादित साखर कोटा जाहीर करण्याबाबत केंद्राला विनंती करण्यात आली आहे.
– जयप्रकाश दांडेगावकर,
अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर, कारखाना महासंघ
कोल्हापूर : देशात वाढलेले साखर उत्पादन आणि कमी खपाने अडचण निर्माण झालेली असतानाच आता केंद्रानेही भरीस भर म्हणून एप्रिल महिन्याचा स्थानिक विक्री कोटा तब्बल २२ लाख टन इतका दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सरासरी १८ लाखांचा कोटा देण्यात येत होता. परंतु यंदाच्या एप्रिलसाठी चार लाख टन वाढवून दिल्याने आता ही साखर विकायची कशी या चिंतेत कारखानदार आहेत. देशावर लॉकडाउनचे संकट घोंघावत असताना हा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने वाढीव कोट्याच्या विरोधात दाद मागितली आहे.
विक्री होत नसल्याने केंद्राने गेल्या चार महिन्यांपासून अठरा टनापर्यंत विक्रीचा कोटा दिला होता. तोही पूर्ण करेपर्यंत कारखान्यांना नाकी नऊ आले होते. यातच केंद्राचा हा निर्णय आतबट्याचा ठरणार आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात इतर महिन्यांच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्क्यांनी साखरेची विक्री वाढते. लग्न समारंभ, शीतपेय, आइस्क्रीम कंपन्यांना मोठ्या प्रमाणात साखर लागते. यामुळे फेब्रुवारीपासून साखर बाजारात काहीशी तेजी निर्माण होते. परंतु यंदा लॉकडाउनच्या सावटामुळे अगदी नाममात्र खरेदी देशातील या उद्योगांनी केली आहे.
सहकारी कारखान्यांची साखर शिल्लक
मिळेल त्या दरामध्ये साखर विक्री करीत उत्तरप्रदेशच्या खासगी साखर कारखान्यांनी दिलेला कोटा पूर्ण केला आहे. पण सहकारी कारखान्यांना मात्र अनेक तांत्रिक अडचणीतून सामोरे जावे लागत असल्याने सहकारी साखर कारखान्यांची साखर शिल्लक आहे. बॅंकेचे व्याज वाढत असल्याने हे कारखाने आणखी अडचणीत आल्याचे साखर संघाच्या सूत्रांनी सांगितले.
ही परिस्थिती केंद्र शासनाच्या नजरेस आणली आहे. या कोट्याच्या साखर विक्रीसाठी मुदतवाढ व पुढील महिन्याचा मर्यादित साखर कोटा जाहीर करण्याबाबत केंद्राला विनंती करण्यात आली आहे.
– जयप्रकाश दांडेगावकर,
अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर, कारखाना महासंघ
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.