[ad_1]
दापोली (जि. रत्नागिरी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यांवर अन्याय झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. हे राज्यव्यापी आंदोलन असून, आंदोलनात लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या. ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’ अशा घोषणांनी कृषी महाविद्यालयीन परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला. राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन राज्यभर सुरू आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ फेब्रुवारी २०२२ रोजी घोषित केलेला असंतुलित, अन्यायकारक व तालिबानी नवीन अभ्यासक्रम तत्काळ रद्द करावा, कृषिसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रम तयार करावा व ज्यामध्ये कृषी अभियांत्रिकी व कृषी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमास समान गुण भारांकन असावे, कृषी अभियांत्रिकी पदवीधरांना कृषी पदवीधराप्रमाणे मुख्य परीक्षेच्या पेपर-१ व पेपर-२ च्या अभ्यासक्रमात व गुण भारांकानाची समान संधी निर्माण करून द्यावी यांचा समावेश आहे.
तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या इतर पदाच्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाप्रमाणे कृषिसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पदाशी संबंधित कर्तव्य व जबाबदाऱ्याही संबंधित असावा, नवीन संतुलित अभ्यासक्रम निर्माण होईपर्यंत जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी. परंतु नवीन न्यायीक अभ्यासक्रम लवकरात लवकर तयार करण्यात यावा, नवीन कृषिसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तयार करताना कृषी विभागामाफत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा विचार व्हावा व त्यासंबंधित अभ्यासक्रम असावा, अशाही मागण्या केल्या आहेत.
दापोली (जि. रत्नागिरी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यांवर अन्याय झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. हे राज्यव्यापी आंदोलन असून, आंदोलनात लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या. ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’ अशा घोषणांनी कृषी महाविद्यालयीन परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला. राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन राज्यभर सुरू आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ फेब्रुवारी २०२२ रोजी घोषित केलेला असंतुलित, अन्यायकारक व तालिबानी नवीन अभ्यासक्रम तत्काळ रद्द करावा, कृषिसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रम तयार करावा व ज्यामध्ये कृषी अभियांत्रिकी व कृषी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमास समान गुण भारांकन असावे, कृषी अभियांत्रिकी पदवीधरांना कृषी पदवीधराप्रमाणे मुख्य परीक्षेच्या पेपर-१ व पेपर-२ च्या अभ्यासक्रमात व गुण भारांकानाची समान संधी निर्माण करून द्यावी यांचा समावेश आहे.
तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या इतर पदाच्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाप्रमाणे कृषिसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पदाशी संबंधित कर्तव्य व जबाबदाऱ्याही संबंधित असावा, नवीन संतुलित अभ्यासक्रम निर्माण होईपर्यंत जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी. परंतु नवीन न्यायीक अभ्यासक्रम लवकरात लवकर तयार करण्यात यावा, नवीन कृषिसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तयार करताना कृषी विभागामाफत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा विचार व्हावा व त्यासंबंधित अभ्यासक्रम असावा, अशाही मागण्या केल्या आहेत.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.