[ad_1]
नागपूर : तपासणी करणे, क्वारंटाइन करणे आणि आवश्यक वैद्यकीय उपचाराची यंत्रणा बळकट करणे, या त्रिसूत्रीवर मुंबईमध्ये कोरोना उद्रेक नियंत्रणात आणता आला. याप्रमाणे नागपूर येथे देखील हीचा त्रिसूत्री अंगीकारात कोरोनावर नियंत्रण मिळवावे, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी शनिवारी (ता. ५) येथे केली.
नागपूर शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या बघता मुंबईतील धारावी व कोळीवाडा येथील कोरोना उद्रेक ज्या पद्धतीने नियंत्रणात आणला, त्याच पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चहल उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळासह नागपुरात दाखल झाले.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्ह्यातील सद्य:स्थितीबाबत नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील मृत्यूदर व बाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. चहल यांनी शिष्टमंडळाच्या वतीने नागपूरमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काही प्रमुख सूचना केल्या.
यामध्ये चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात याव्यात, आरटीपीसीआर चाचणीचा अधिक वापर व्हावा, गंभीर रुग्ण संशयित रुग्ण यांच्यासाठीच फक्त अँटिजेन चाचणीचा वापर करण्यात यावा, अॅम्बुलन्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यावी, खासगी असो वा सरकारी प्रत्येक हॉस्पिटल मध्ये वॉर रूम उघडल्या गेली पाहिजे. माहिती सदैव अद्ययावत झाली पाहिजे.
गंभीर रुग्णाच्या इलाजाबाबतचे प्रत्येक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये साठवले गेले पाहिजे, प्रत्येक बाधितांचे विश्लेषण झाले पाहिजे, बेडची उपलब्धता ऑनलाइन पद्धतीने सर्वांना माहीत झाली पाहिजे, हॉस्पिटल्सची कॅन्टीन्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावी, हॉस्पिटलमधील स्वच्छतागृहाचे दर चार ते पाच तासांनी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा सूचना केल्या आहेत.
नागपूर : तपासणी करणे, क्वारंटाइन करणे आणि आवश्यक वैद्यकीय उपचाराची यंत्रणा बळकट करणे, या त्रिसूत्रीवर मुंबईमध्ये कोरोना उद्रेक नियंत्रणात आणता आला. याप्रमाणे नागपूर येथे देखील हीचा त्रिसूत्री अंगीकारात कोरोनावर नियंत्रण मिळवावे, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी शनिवारी (ता. ५) येथे केली.
नागपूर शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या बघता मुंबईतील धारावी व कोळीवाडा येथील कोरोना उद्रेक ज्या पद्धतीने नियंत्रणात आणला, त्याच पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चहल उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळासह नागपुरात दाखल झाले.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्ह्यातील सद्य:स्थितीबाबत नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील मृत्यूदर व बाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. चहल यांनी शिष्टमंडळाच्या वतीने नागपूरमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काही प्रमुख सूचना केल्या.
यामध्ये चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात याव्यात, आरटीपीसीआर चाचणीचा अधिक वापर व्हावा, गंभीर रुग्ण संशयित रुग्ण यांच्यासाठीच फक्त अँटिजेन चाचणीचा वापर करण्यात यावा, अॅम्बुलन्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यावी, खासगी असो वा सरकारी प्रत्येक हॉस्पिटल मध्ये वॉर रूम उघडल्या गेली पाहिजे. माहिती सदैव अद्ययावत झाली पाहिजे.
गंभीर रुग्णाच्या इलाजाबाबतचे प्रत्येक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये साठवले गेले पाहिजे, प्रत्येक बाधितांचे विश्लेषण झाले पाहिजे, बेडची उपलब्धता ऑनलाइन पद्धतीने सर्वांना माहीत झाली पाहिजे, हॉस्पिटल्सची कॅन्टीन्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावी, हॉस्पिटलमधील स्वच्छतागृहाचे दर चार ते पाच तासांनी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा सूचना केल्या आहेत.
[ad_2]
Source link