[ad_1]
कोल्हापूर : राज्यात यंदाही साखर उताऱ्याच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. यंदाच्या हंगामाच्या १० एप्रिल अखेरच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या कारखान्यांनी ११.९९ टक्के साखर उतारा कायम ठेवत राज्यात साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकाविले आहे. १०३ लाख टनापैकी २७ लाख टन साखर केवळ कोल्हापूर विभागात तयार झाली आहे. राज्यातील १८६ पैकी ११८ कारखान्यांचा हंगाम संपुष्टात आला आहे.
राज्यात कोल्हापूर व सांगली जिल्हे साखर उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहेत. इतर भागाच्या तुलनेत या दोन्ही जिल्ह्यांत असणारे बारमाही पाणी व ऊस शेतीस अनुकुल हवामानामुळे दोन्ही जिल्ह्यातील ऊस उत्पादक पट्यातील उसाचे उत्पादन जादा असते. चांगल्या जमिनीमुळे उताराही १२ ते १२.५० टक्केपर्यंत असतो. यंदाही साखर उताऱ्याच्या बाबतीत सरासरी इतकी आकडेवारी विभागाने गाठली आहे.
या कालावधीत राज्यात ९८४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी १०.४७ टक्के उताऱ्याने १०३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यात यंदा १८९ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. ९५ सहकारी तर ९४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू झाल्यानंतर दररोज ७ लाख टन उसाचे दैनंदिन गाळप राज्यातील साखर कारखान्यांनी केले. पहिल्या दीड ते दोन महिन्यांत गाळपात मागे पडलेल्या कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी २३० लाख टन ऊस गाळप करीत २७ लाख टन साखरेचे उत्पादन करीत अग्रस्थान मिळवले. या खालोखाल पुणे विभागाने २२४ लाख टन ऊस गाळप करीत २४ लाख टन साखरेची निर्मिती केली.
यंदाची ऊस हंगामाची स्थिती १० एप्रिल अखेर (लाख टनात) | |||
विभाग | ऊस गाळप | साखर उत्पादन | साखर उतारा |
कोल्हापूर | २३०.३९ | २७ | ११.९९ |
पुणे | २२४.०१ | २४ | १०.९१ |
सोलापूर | १७५.७० | १६ | ९.३७ |
नगर | १५९.०९ | १५ | ९.७८ |
औरंगाबाद | ९२.७२ | ८ | ८.९३ |
नांदेड | ९२.२५ | ९ | ९.९७ |
अमरावती | ५.८२ | ०.५ | ८.९३ |
नागपूर | ४.१४ | ०.३ | ९.०३ |
एकूण | ९८४.१२ | १०३.७२ | १०.४७ |
कोल्हापूर : राज्यात यंदाही साखर उताऱ्याच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. यंदाच्या हंगामाच्या १० एप्रिल अखेरच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या कारखान्यांनी ११.९९ टक्के साखर उतारा कायम ठेवत राज्यात साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकाविले आहे. १०३ लाख टनापैकी २७ लाख टन साखर केवळ कोल्हापूर विभागात तयार झाली आहे. राज्यातील १८६ पैकी ११८ कारखान्यांचा हंगाम संपुष्टात आला आहे.
राज्यात कोल्हापूर व सांगली जिल्हे साखर उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहेत. इतर भागाच्या तुलनेत या दोन्ही जिल्ह्यांत असणारे बारमाही पाणी व ऊस शेतीस अनुकुल हवामानामुळे दोन्ही जिल्ह्यातील ऊस उत्पादक पट्यातील उसाचे उत्पादन जादा असते. चांगल्या जमिनीमुळे उताराही १२ ते १२.५० टक्केपर्यंत असतो. यंदाही साखर उताऱ्याच्या बाबतीत सरासरी इतकी आकडेवारी विभागाने गाठली आहे.
या कालावधीत राज्यात ९८४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी १०.४७ टक्के उताऱ्याने १०३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यात यंदा १८९ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. ९५ सहकारी तर ९४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू झाल्यानंतर दररोज ७ लाख टन उसाचे दैनंदिन गाळप राज्यातील साखर कारखान्यांनी केले. पहिल्या दीड ते दोन महिन्यांत गाळपात मागे पडलेल्या कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी २३० लाख टन ऊस गाळप करीत २७ लाख टन साखरेचे उत्पादन करीत अग्रस्थान मिळवले. या खालोखाल पुणे विभागाने २२४ लाख टन ऊस गाळप करीत २४ लाख टन साखरेची निर्मिती केली.
यंदाची ऊस हंगामाची स्थिती १० एप्रिल अखेर (लाख टनात) | |||
विभाग | ऊस गाळप | साखर उत्पादन | साखर उतारा |
कोल्हापूर | २३०.३९ | २७ | ११.९९ |
पुणे | २२४.०१ | २४ | १०.९१ |
सोलापूर | १७५.७० | १६ | ९.३७ |
नगर | १५९.०९ | १५ | ९.७८ |
औरंगाबाद | ९२.७२ | ८ | ८.९३ |
नांदेड | ९२.२५ | ९ | ९.९७ |
अमरावती | ५.८२ | ०.५ | ८.९३ |
नागपूर | ४.१४ | ०.३ | ९.०३ |
एकूण | ९८४.१२ | १०३.७२ | १०.४७ |
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.