[ad_1]
नगर ः श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या कोळगाव, चिखली, कोरेगाव, कोथूळ, घारगाव या भागांतील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतातील पिके पाणी असूनही वाळत आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी थेट महावितरणच्या उपकेंद्रावर धडक मारली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.
कोळगाव परिसरातील गावांमध्ये विजेचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्यांकडे जे पाणी आहे, त्यातून उभी पिके जगविण्याचे आव्हान आहे. त्यातच या भागातील शेतकऱ्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. विजेअभावी त्यांच्याही चारा-पाण्याची हेळसांड होत आहे. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी कोळगावच्या उपकेंद्रावर एकत्र येत आवाज उठविला. योग्य दाबाने वीज देतानाच, भारनियमानाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता दीपक सिंग हे शेतकऱ्यांच्या आक्रमकपणामुळे बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम लगड यांनी दीपक सिंग यांच्याशी चर्चा केली. लोणी व्यंकनाथ येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरू करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. चिखलीतील मंजूर उपकेंद्राचे काम करण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली.
नगर ः श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या कोळगाव, चिखली, कोरेगाव, कोथूळ, घारगाव या भागांतील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतातील पिके पाणी असूनही वाळत आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी थेट महावितरणच्या उपकेंद्रावर धडक मारली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.
कोळगाव परिसरातील गावांमध्ये विजेचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्यांकडे जे पाणी आहे, त्यातून उभी पिके जगविण्याचे आव्हान आहे. त्यातच या भागातील शेतकऱ्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. विजेअभावी त्यांच्याही चारा-पाण्याची हेळसांड होत आहे. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी कोळगावच्या उपकेंद्रावर एकत्र येत आवाज उठविला. योग्य दाबाने वीज देतानाच, भारनियमानाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता दीपक सिंग हे शेतकऱ्यांच्या आक्रमकपणामुळे बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम लगड यांनी दीपक सिंग यांच्याशी चर्चा केली. लोणी व्यंकनाथ येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरू करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. चिखलीतील मंजूर उपकेंद्राचे काम करण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.