[ad_1]
सातारा ः क्षेत्र महाबळेश्वर येथे बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. गारांसह पडणाऱ्या पावसाचा जोर मोठा होता. अक्षरशः रस्त्यावर गारांचा खच पडल्याने आर्थरसिट पॉइंट रस्ता बर्फाने भरून गेला होता. या परिसरातील स्ट्रॅाबेरी, फराशीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
जावळी तालुक्यात आनेवाडी, सायगाव, रायगाव, खर्शी तर्फे कुडाळ, महिगाव, मोरघर, दुदुस्करवाडी, महामुलकरवाडी येथील परिसरात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. बेलावडे, आर्डे, सोनगाव परिसरात गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतशिवारात अजूनही पीक काढणीची लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती. अजूनही काही ठिकाणी गहू,ज्वारीची पिके उभी आहेत. मात्र, या पावसाने गहू व ज्वारी काही ठिकाणी भुईसपाट झाली आहे.
काढून ठेवलेली ज्वारीही भिजल्याने ज्वारीच्या उत्पन्नात घट होऊन ज्वारी काळी पडणार आहे. गहू, कांद्याच्या पिकांची देखील अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी शेतामध्ये गहू काढणीसाठी आणलेले हार्वेस्टर मशिन पावसामुळे शेतातच अडकून पडले होते. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी शेतातील पिकांचे नुकसान झाले. आंब्यांना आलेला मोहर गळून पडला होता.
सातारा ः क्षेत्र महाबळेश्वर येथे बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. गारांसह पडणाऱ्या पावसाचा जोर मोठा होता. अक्षरशः रस्त्यावर गारांचा खच पडल्याने आर्थरसिट पॉइंट रस्ता बर्फाने भरून गेला होता. या परिसरातील स्ट्रॅाबेरी, फराशीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
जावळी तालुक्यात आनेवाडी, सायगाव, रायगाव, खर्शी तर्फे कुडाळ, महिगाव, मोरघर, दुदुस्करवाडी, महामुलकरवाडी येथील परिसरात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. बेलावडे, आर्डे, सोनगाव परिसरात गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतशिवारात अजूनही पीक काढणीची लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती. अजूनही काही ठिकाणी गहू,ज्वारीची पिके उभी आहेत. मात्र, या पावसाने गहू व ज्वारी काही ठिकाणी भुईसपाट झाली आहे.
काढून ठेवलेली ज्वारीही भिजल्याने ज्वारीच्या उत्पन्नात घट होऊन ज्वारी काळी पडणार आहे. गहू, कांद्याच्या पिकांची देखील अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी शेतामध्ये गहू काढणीसाठी आणलेले हार्वेस्टर मशिन पावसामुळे शेतातच अडकून पडले होते. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी शेतातील पिकांचे नुकसान झाले. आंब्यांना आलेला मोहर गळून पडला होता.
[ad_2]
Source link