[ad_1]
बुलडाणा ः नांदुरा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्याने चार शेतकऱ्यांच्या नावे पाचशे क्विटंलपेक्षा अधिक खत विक्री केल्याचा प्रताप समोर आल्यानंतर आता कृषी खात्याने चौकशी सुरु केली आहे. संबंधित विक्रेत्याने या हंगामात सुमारे तीन हजारपेक्षा अधिक बॅग युरियाची विक्री केली असून कृषीची यंत्रणा गावागावांत जाऊन शेतकऱ्यांकडून खातरजमा करून घेणार आहे. याचा एकत्रित अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
नांदुरा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्याने चार शेतकऱ्यांच्या नावे सुमारे एक हजार बॅगपेक्षा अधिक रासायनिक खतांची विक्री केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर कृषी अधिकारीही खळबळून जागे झाले. बुधवारी जिल्ह्याच्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनीही संबंधित कृषी निविष्ठा केंद्राला भेट देत माहिती घेतली. आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येक बॅग विक्रीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात युरीयाच्या एका बॅगसाठी सामान्य शेतकऱ्यांना तासनतास उभे राहावे लागत असताना या निविष्ठा विक्रेत्याने चारच शेतकऱ्यांना सुमारे हजार बॅग कशा दिल्या, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.
कृषी यंत्रणेची डोळेझाक
जिल्ह्यात खत विक्रीत मोठा सावळा गोंधळ सुरु असताना यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. यंत्रणांकडे विक्रेते चुकीची माहिती सादर करीत असतानाही कृषी खाते काहीही करायला तयार नाही. यामुळे नेमके पाणी कुठे मुरते आहे, याचीही आता खमंग चर्चा होत आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्याने ज्या प्रपत्रात चार शेतकऱ्यांना उपरोक्त खत विक्री केल्याची माहिती दिली होती आणि जो अहवाल व्हायरल झाला, तो अहवालच चुकीचा असल्याचे आता कृषी अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या चौकशीचा अहवालसुद्धा आता कसा येईल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
बुलडाणा ः नांदुरा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्याने चार शेतकऱ्यांच्या नावे पाचशे क्विटंलपेक्षा अधिक खत विक्री केल्याचा प्रताप समोर आल्यानंतर आता कृषी खात्याने चौकशी सुरु केली आहे. संबंधित विक्रेत्याने या हंगामात सुमारे तीन हजारपेक्षा अधिक बॅग युरियाची विक्री केली असून कृषीची यंत्रणा गावागावांत जाऊन शेतकऱ्यांकडून खातरजमा करून घेणार आहे. याचा एकत्रित अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
नांदुरा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्याने चार शेतकऱ्यांच्या नावे सुमारे एक हजार बॅगपेक्षा अधिक रासायनिक खतांची विक्री केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर कृषी अधिकारीही खळबळून जागे झाले. बुधवारी जिल्ह्याच्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनीही संबंधित कृषी निविष्ठा केंद्राला भेट देत माहिती घेतली. आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येक बॅग विक्रीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात युरीयाच्या एका बॅगसाठी सामान्य शेतकऱ्यांना तासनतास उभे राहावे लागत असताना या निविष्ठा विक्रेत्याने चारच शेतकऱ्यांना सुमारे हजार बॅग कशा दिल्या, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.
कृषी यंत्रणेची डोळेझाक
जिल्ह्यात खत विक्रीत मोठा सावळा गोंधळ सुरु असताना यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. यंत्रणांकडे विक्रेते चुकीची माहिती सादर करीत असतानाही कृषी खाते काहीही करायला तयार नाही. यामुळे नेमके पाणी कुठे मुरते आहे, याचीही आता खमंग चर्चा होत आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्याने ज्या प्रपत्रात चार शेतकऱ्यांना उपरोक्त खत विक्री केल्याची माहिती दिली होती आणि जो अहवाल व्हायरल झाला, तो अहवालच चुकीचा असल्याचे आता कृषी अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या चौकशीचा अहवालसुद्धा आता कसा येईल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
[ad_2]
Source link