[ad_1]
जळगाव : खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. त्यात पूर्वहंगामी कापसाचे अतिपावसात अतोनात नुकसान झाले आहे. या कापसात हवे तसे उत्पादन येताना दिसत नाही. यामुळे या कापसाखालील क्षेत्र नोव्हेंबरमध्येच रिकामे करून त्यात मका, कांदा व इतर पिके घेण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत.
कापसाची स्थिती सप्टेंबरच्या अखेरिस झालेल्या पावसाने अधिक बिकट झाली आहे. वेचणी करतानाही अधिक श्रम, मजुरी खर्च लागत आहे. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अशात कापसाचे उत्पादन घटणार, हे निश्चित आहे. यंदा पूर्वहंगामी कापसाची वेचणी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच वेगात सुरू होण्याची स्थिती ऑगस्टमध्ये दिसत होती. परंतु, ऑगस्टच्या मध्यात व सप्टेंबरमध्ये अतिपाऊस झाला. बोंडे काळवंडली, कापसाचा दर्जा घसरला. नवीन फुले, पाते लागली नाहीत. खानदेशात सुमारे सव्वा ते दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाचे पीक आहे.
काळ्या कसदार जमिनीच्या भागात म्हणजेच तापी, गिरणा, पांझरा, अनेर, अंजनी, सुसरी, गोमाई आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात पूर्वहंगामी कापूस पीक अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात लागवड अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील पूर्वहंगामी कापसाची लागवड सुमारे ६५ ते ७० हजार हेक्टर एवढी आहे.
कृत्रिम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरिस व जूनच्या पहिल्या दोन, तीन दिवसांत ही लागवड आटोपली होती. भात पिकातील वेचणी या महिन्यात स्वच्छ सूर्यप्रकाशित, कोरडे वातावरण कायम राहिले, तर बऱ्यापैकी होईल.
नोव्हेंबरच्या अखेरीस फरदड (खोडवा) कापूस पीक घेण्यासंबंधी शेतकरी नकार देत आहेत. कारण, फरदड कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा अधिक प्रादुर्भाव होतो. त्यात वेचणी व्यवस्थित करता येत नाही. उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे नोव्हेंबरच्या मध्यानंतर किंवा शेवटच्या आठवड्यात पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात मका, कांदा व इतर पिके घेण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. अनेक शेतकरी क्षेत्र रिकामे करून त्याची चांगली मशागत करतील. जानेवारीत त्यात बाजरी पेरणीचे नियोजन आहे.
पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती अतिपावसाने बिकट बनली आहे. उत्पादन हवे तसे नाही. पुढे फरदड घेणे आणखी नुकसानीचे आहे. यामुळे नोव्हेंबरमध्येच मका किंवा इतर पिकांची लागवड क्षेत्र रिकामे करण्याची तयारी करीत आहे.
– भगवान पाटील, शेतकरी, गाढोदे, जि.जळगाव
जळगाव : खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. त्यात पूर्वहंगामी कापसाचे अतिपावसात अतोनात नुकसान झाले आहे. या कापसात हवे तसे उत्पादन येताना दिसत नाही. यामुळे या कापसाखालील क्षेत्र नोव्हेंबरमध्येच रिकामे करून त्यात मका, कांदा व इतर पिके घेण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत.
कापसाची स्थिती सप्टेंबरच्या अखेरिस झालेल्या पावसाने अधिक बिकट झाली आहे. वेचणी करतानाही अधिक श्रम, मजुरी खर्च लागत आहे. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अशात कापसाचे उत्पादन घटणार, हे निश्चित आहे. यंदा पूर्वहंगामी कापसाची वेचणी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच वेगात सुरू होण्याची स्थिती ऑगस्टमध्ये दिसत होती. परंतु, ऑगस्टच्या मध्यात व सप्टेंबरमध्ये अतिपाऊस झाला. बोंडे काळवंडली, कापसाचा दर्जा घसरला. नवीन फुले, पाते लागली नाहीत. खानदेशात सुमारे सव्वा ते दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाचे पीक आहे.
काळ्या कसदार जमिनीच्या भागात म्हणजेच तापी, गिरणा, पांझरा, अनेर, अंजनी, सुसरी, गोमाई आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात पूर्वहंगामी कापूस पीक अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात लागवड अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील पूर्वहंगामी कापसाची लागवड सुमारे ६५ ते ७० हजार हेक्टर एवढी आहे.
कृत्रिम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरिस व जूनच्या पहिल्या दोन, तीन दिवसांत ही लागवड आटोपली होती. भात पिकातील वेचणी या महिन्यात स्वच्छ सूर्यप्रकाशित, कोरडे वातावरण कायम राहिले, तर बऱ्यापैकी होईल.
नोव्हेंबरच्या अखेरीस फरदड (खोडवा) कापूस पीक घेण्यासंबंधी शेतकरी नकार देत आहेत. कारण, फरदड कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा अधिक प्रादुर्भाव होतो. त्यात वेचणी व्यवस्थित करता येत नाही. उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे नोव्हेंबरच्या मध्यानंतर किंवा शेवटच्या आठवड्यात पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात मका, कांदा व इतर पिके घेण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. अनेक शेतकरी क्षेत्र रिकामे करून त्याची चांगली मशागत करतील. जानेवारीत त्यात बाजरी पेरणीचे नियोजन आहे.
पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती अतिपावसाने बिकट बनली आहे. उत्पादन हवे तसे नाही. पुढे फरदड घेणे आणखी नुकसानीचे आहे. यामुळे नोव्हेंबरमध्येच मका किंवा इतर पिकांची लागवड क्षेत्र रिकामे करण्याची तयारी करीत आहे.
– भगवान पाटील, शेतकरी, गाढोदे, जि.जळगाव
[ad_2]
Source link