[ad_1]
जळगाव ः खानदेशात ऊस गाळप वाढले असून, गाळपाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. यंदा सुमारे २१ लाख टन ऊस गाळप झाले आहे. ऊसतोडणी आणखी आठ ते १० दिवस सुरू राहील, अशी स्थिती आहे.
गाळपात शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. यापाठोपाठ समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील
आयान शुगर या कारखान्याने कार्यवाही केली आहे. आयान कारखान्याची प्रतिदिन गाळपक्षमता खानदेशात सर्वाधिक म्हणजेच आठ हजार टन एवढी होती. हा कारखाना उशिरा सुरू झाला, पण गाळप वेगात केले. यंदा गाळप सुमारे तीन लाख टनांनी वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार कारखाने सुरू होते. त्यात पुरुषोत्तमनगर, समशेरपूर, डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना व तळोदा येथील श्रीकृष्ण कारखान्याचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथील मुक्ताई हा खासगी कारखाना सुरू होता. या कारखान्यानेही बऱ्यापैकी गाळप केले आहे. तर धुळ्यातील शिरपूर येथे एक लहान कारखाना किंवा गुऱ्हाळ सुरू होते. या गुऱ्हाळात प्रतिदिन ८०० टन उसाचे गाळप किंवा प्रक्रिया झाली. जळगाव जिल्ह्यातील न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना यंदा बंद होता. तर चहार्डी (ता.चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना सलग दोन वर्षे बंद राहिला. यामुळे जळगाव जिल्ह्यात नाशिक, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी देखील ऊसतोडणी केली.
चाळीसगावात सर्वाधिक लागवड
चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक चार हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. या तालुक्यात नगर, औरंगाबाद व नाशिकमधील कारखान्यांनी ऊसतोडणी केली. चोपडा तालुक्यातही नाशिक व नंदुरबारमधील कारखान्यांनी ऊसतोडणी केली. ऊसतोडणी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मिळाली.
जळगाव ः खानदेशात ऊस गाळप वाढले असून, गाळपाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. यंदा सुमारे २१ लाख टन ऊस गाळप झाले आहे. ऊसतोडणी आणखी आठ ते १० दिवस सुरू राहील, अशी स्थिती आहे.
गाळपात शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. यापाठोपाठ समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील
आयान शुगर या कारखान्याने कार्यवाही केली आहे. आयान कारखान्याची प्रतिदिन गाळपक्षमता खानदेशात सर्वाधिक म्हणजेच आठ हजार टन एवढी होती. हा कारखाना उशिरा सुरू झाला, पण गाळप वेगात केले. यंदा गाळप सुमारे तीन लाख टनांनी वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार कारखाने सुरू होते. त्यात पुरुषोत्तमनगर, समशेरपूर, डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना व तळोदा येथील श्रीकृष्ण कारखान्याचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथील मुक्ताई हा खासगी कारखाना सुरू होता. या कारखान्यानेही बऱ्यापैकी गाळप केले आहे. तर धुळ्यातील शिरपूर येथे एक लहान कारखाना किंवा गुऱ्हाळ सुरू होते. या गुऱ्हाळात प्रतिदिन ८०० टन उसाचे गाळप किंवा प्रक्रिया झाली. जळगाव जिल्ह्यातील न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना यंदा बंद होता. तर चहार्डी (ता.चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना सलग दोन वर्षे बंद राहिला. यामुळे जळगाव जिल्ह्यात नाशिक, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी देखील ऊसतोडणी केली.
चाळीसगावात सर्वाधिक लागवड
चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक चार हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. या तालुक्यात नगर, औरंगाबाद व नाशिकमधील कारखान्यांनी ऊसतोडणी केली. चोपडा तालुक्यातही नाशिक व नंदुरबारमधील कारखान्यांनी ऊसतोडणी केली. ऊसतोडणी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मिळाली.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.