[ad_1]
जळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले आहे. काढणीला वेग येताच, दर पाडण्याचे प्रकार खरेदीदार करीत आहेत. दरात मोठी घसरण गेल्या काही दिवसांत झाली आहे. परंतु, यामुळे पपई उत्पादक संकटात सापडले आहेत. किमान सव्वासात रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
दरांबाबतचा तिढा या महिन्याच्या सुरवातीलाही तयार झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी दर सहा रुपये प्रतिकिलो, असे झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी तक्रार केली. पपईसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार प्रसिद्ध आहे. या भागात काही शेतकरी गटांनी पपई काढणी सहा रुपये प्रतिकिलो दरात करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. यामुळे शेतकरी पपईची काढणी न करण्याच्या तयारीत आहेत.
पपईची खरेदी स्थानिक एजंटच्या मदतीने राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशातील खरेदीदार करतात. सध्या शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर भागात पपईची काढणी सुरू आहे. सध्या रोज ३५ ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) एवढी पपईची आवक सुरू आहे. आवक वाढत असतानाच दर कमी झाले. सुरवातीला प्रतिकिलो १८ रुपये दर जागेवर मिळत होता. नंतर दरात घसरण होऊन १२ रुपये प्रतिकिलोचा दर झाला.
सध्या सहा रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. यामुळे पपई उत्पादकांना फटका बसत आहे. पीक परवडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पपई उत्पादकांनी काढणी बंद करून दरवाढीची मागणी केली आहे. यासंदर्भात लवकरच शहादा, तळोदा, शिरपूर येथे बाजार समित्या, सहायक उपनिबंधक यांच्याकडे शेतकरी जाऊन तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत. या स्थितीमध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करून कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
जळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले आहे. काढणीला वेग येताच, दर पाडण्याचे प्रकार खरेदीदार करीत आहेत. दरात मोठी घसरण गेल्या काही दिवसांत झाली आहे. परंतु, यामुळे पपई उत्पादक संकटात सापडले आहेत. किमान सव्वासात रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
दरांबाबतचा तिढा या महिन्याच्या सुरवातीलाही तयार झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी दर सहा रुपये प्रतिकिलो, असे झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी तक्रार केली. पपईसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार प्रसिद्ध आहे. या भागात काही शेतकरी गटांनी पपई काढणी सहा रुपये प्रतिकिलो दरात करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. यामुळे शेतकरी पपईची काढणी न करण्याच्या तयारीत आहेत.
पपईची खरेदी स्थानिक एजंटच्या मदतीने राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशातील खरेदीदार करतात. सध्या शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर भागात पपईची काढणी सुरू आहे. सध्या रोज ३५ ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) एवढी पपईची आवक सुरू आहे. आवक वाढत असतानाच दर कमी झाले. सुरवातीला प्रतिकिलो १८ रुपये दर जागेवर मिळत होता. नंतर दरात घसरण होऊन १२ रुपये प्रतिकिलोचा दर झाला.
सध्या सहा रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. यामुळे पपई उत्पादकांना फटका बसत आहे. पीक परवडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पपई उत्पादकांनी काढणी बंद करून दरवाढीची मागणी केली आहे. यासंदर्भात लवकरच शहादा, तळोदा, शिरपूर येथे बाजार समित्या, सहायक उपनिबंधक यांच्याकडे शेतकरी जाऊन तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत. या स्थितीमध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करून कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
[ad_2]
Source link