[ad_1]
मूर्तिजापूर, जि. अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत देशभरात होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणाचा विदर्भातील प्रारंभ मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा या गावात मंगळवारी (ता. १२) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला.
या वेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक विलास शिरोळकर, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकरी बयस, तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन अटाळे या वेळी उपस्थित होते.
नितीन अटाळे यांनी प्रास्ताविकातून ग्रामविकास खात्याच्या या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या प्रकल्पाची रूपरेषा विलास शिरोळकर यांनी मांडली.
शतप्रतिशत अचूकता असणाऱ्या या प्रकल्पाच्या पूर्ततेअंती आपल्या मालमत्तेच्या मालकीहक्काचा पुरावा म्हणजे आखीव पत्रिका तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण प्रकल्पाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ग्रामस्थांना केले. त्यानंतर सर्व्हे ऑफ इंडियाचे अनिलकुमार व चौधरी यांनी खापरवाडा गावाचे ड्रोन सर्वेक्षण केले.
हे होतील फायदे…
५४ दिवसांत पूर्णत्वास जाणाऱ्या या स्वामित्व योजनेतील सर्वेक्षणांती प्रत्येक ग्रामस्थाला मालकी हक्काचा कागद म्हणजे घराची आखीव पत्रिका मिळेल. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. अतिक्रमणामुळे होणारी भांडणे मिटतील. गावठाणातील मोकळ्या जागा नकाशा व आखीव पत्रिकेमुळे सुरक्षित होतील.
मूर्तिजापूर, जि. अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत देशभरात होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणाचा विदर्भातील प्रारंभ मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा या गावात मंगळवारी (ता. १२) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला.
या वेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक विलास शिरोळकर, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकरी बयस, तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन अटाळे या वेळी उपस्थित होते.
नितीन अटाळे यांनी प्रास्ताविकातून ग्रामविकास खात्याच्या या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या प्रकल्पाची रूपरेषा विलास शिरोळकर यांनी मांडली.
शतप्रतिशत अचूकता असणाऱ्या या प्रकल्पाच्या पूर्ततेअंती आपल्या मालमत्तेच्या मालकीहक्काचा पुरावा म्हणजे आखीव पत्रिका तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण प्रकल्पाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ग्रामस्थांना केले. त्यानंतर सर्व्हे ऑफ इंडियाचे अनिलकुमार व चौधरी यांनी खापरवाडा गावाचे ड्रोन सर्वेक्षण केले.
हे होतील फायदे…
५४ दिवसांत पूर्णत्वास जाणाऱ्या या स्वामित्व योजनेतील सर्वेक्षणांती प्रत्येक ग्रामस्थाला मालकी हक्काचा कागद म्हणजे घराची आखीव पत्रिका मिळेल. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. अतिक्रमणामुळे होणारी भांडणे मिटतील. गावठाणातील मोकळ्या जागा नकाशा व आखीव पत्रिकेमुळे सुरक्षित होतील.
[ad_2]
Source link