[ad_1]
नांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गावरान लाल मिरचीचा ठसका महाराष्ट्रासह तेलंगणात भरत होता. परंतु मध्यंतरी कीड, रोगांच्या प्रादुर्भावामुळे लागवड घटलेली ही मिरची यंदा पुन्हा बरबडा शिवारात फुलली आहे. सध्या महिला मजुरांकडून तोडणी सुरू असल्याने वाळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
एकेकाळी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात बरबडा शिवारात येणारी प्रसिद्ध गावरान लाल मिरचीला मोठी मागणी होती. मराठवाड्यात नाव कमावलेल्या गावरान मिरचीचा ठसका महाराष्ट्रासह तेलंगणा या दोन राज्यांतील लोकांना भरत असे. या गावरान मिरचीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे मार्केट बरबडा येथे होते. चवदार असलेल्या या मिरचीमध्ये बियांचे प्रमाण कमी असते.
रंगाने लाल भडक असलेल्या ताज्या लाल मिरचीचे लोणचे बनविले जात असत. तिखट व चवदार मिरची म्हणून बरबड्याच्या मिरचीची वेगळी ओळख आहे. परंतु कालांतराने या मिरचीवर कीडींचा प्रादुर्भाव वाढला. हुमणी अळीमुळे पीक उद्ध्वस्त होवू लागल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली. यामुळे जिल्हा वासीयांना आंध्र प्रदेशातील गुंटूर, तेजा अशा संकरित मिरचीवर गरज भागवावी लागली होती.
परंतु यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने या भागात बरबड्यासह पाटोदा, आंतरगाव या भागात जवळपास दोन हजार हेक्टरवर मिरचीची लागवड झाली. सध्या मिरचीची तोडणी सुरू आहे. तोडणी कामामुळे या भागातील महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे. मिरची वाळवण सुरु असल्याने शेतात लाल रंगाचे ढीग दिसून येत आहेत. या मिरचीला मागणी अधिक असल्याने पुढील काळात मिरची खालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
नांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गावरान लाल मिरचीचा ठसका महाराष्ट्रासह तेलंगणात भरत होता. परंतु मध्यंतरी कीड, रोगांच्या प्रादुर्भावामुळे लागवड घटलेली ही मिरची यंदा पुन्हा बरबडा शिवारात फुलली आहे. सध्या महिला मजुरांकडून तोडणी सुरू असल्याने वाळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
एकेकाळी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात बरबडा शिवारात येणारी प्रसिद्ध गावरान लाल मिरचीला मोठी मागणी होती. मराठवाड्यात नाव कमावलेल्या गावरान मिरचीचा ठसका महाराष्ट्रासह तेलंगणा या दोन राज्यांतील लोकांना भरत असे. या गावरान मिरचीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे मार्केट बरबडा येथे होते. चवदार असलेल्या या मिरचीमध्ये बियांचे प्रमाण कमी असते.
रंगाने लाल भडक असलेल्या ताज्या लाल मिरचीचे लोणचे बनविले जात असत. तिखट व चवदार मिरची म्हणून बरबड्याच्या मिरचीची वेगळी ओळख आहे. परंतु कालांतराने या मिरचीवर कीडींचा प्रादुर्भाव वाढला. हुमणी अळीमुळे पीक उद्ध्वस्त होवू लागल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली. यामुळे जिल्हा वासीयांना आंध्र प्रदेशातील गुंटूर, तेजा अशा संकरित मिरचीवर गरज भागवावी लागली होती.
परंतु यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने या भागात बरबड्यासह पाटोदा, आंतरगाव या भागात जवळपास दोन हजार हेक्टरवर मिरचीची लागवड झाली. सध्या मिरचीची तोडणी सुरू आहे. तोडणी कामामुळे या भागातील महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे. मिरची वाळवण सुरु असल्याने शेतात लाल रंगाचे ढीग दिसून येत आहेत. या मिरचीला मागणी अधिक असल्याने पुढील काळात मिरची खालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.