[ad_1]
अहमदाबाद, गुजरात : गुजरात मधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करण्यासाठी येथेही ट्रॅक्टर आंदोलन केले जाईल, वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी येथे दिला.
दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर श्री. टिकैत यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांना विरोधाकरिता आंदोलन केले जात आहे. श्री. टिकैत हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येथे आल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी श्री. टिकैत बोलत होते. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमधील शेतकरी दु:खी आणि अन्यायग्रस्त आहेत. या शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकरी गुजरातमध्ये ट्रॅक्टर आंदोलन करतील. गांधीनगरला घेराव करण्याचा आणि रस्ते बंद करण्याची वेळ आली आहे. वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील.’’
श्री. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन होत नसल्यामुळे त्यांना अन्याय सहन करून जगावे लागत आहे. न्यायालयांकडून सुद्धा पाठबळ मिळत नाही. येथील शेतकऱ्यांना आम्ही आनंदी आहोत, आम्हाला नफा मिळतो, असे बळेच सांगण्यास भाग पाडले जात आहे. जर खरंच गुजरातमधील शेतकरी आनंदी आणि फायद्यात असतील तर आम्हालाही असे कोणते तंत्रज्ञान आहे, ते दिले जावे.’’
बानासकंटा येथील शेतकरी तीन रुपये किलोने बटाटे विकत आहेत. बटाट्याचे हे दर त्यांना आनंदी ठेवण्यास उपयुक्त आहेत का? आम्ही येथे शेतकऱ्यांच्या मनातून भीती काढून टाकण्यासाठी आलो आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, असे श्री. टिकैत म्हणाले.
अहमदाबाद, गुजरात : गुजरात मधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करण्यासाठी येथेही ट्रॅक्टर आंदोलन केले जाईल, वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी येथे दिला.
दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर श्री. टिकैत यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांना विरोधाकरिता आंदोलन केले जात आहे. श्री. टिकैत हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येथे आल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी श्री. टिकैत बोलत होते. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमधील शेतकरी दु:खी आणि अन्यायग्रस्त आहेत. या शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकरी गुजरातमध्ये ट्रॅक्टर आंदोलन करतील. गांधीनगरला घेराव करण्याचा आणि रस्ते बंद करण्याची वेळ आली आहे. वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील.’’
श्री. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन होत नसल्यामुळे त्यांना अन्याय सहन करून जगावे लागत आहे. न्यायालयांकडून सुद्धा पाठबळ मिळत नाही. येथील शेतकऱ्यांना आम्ही आनंदी आहोत, आम्हाला नफा मिळतो, असे बळेच सांगण्यास भाग पाडले जात आहे. जर खरंच गुजरातमधील शेतकरी आनंदी आणि फायद्यात असतील तर आम्हालाही असे कोणते तंत्रज्ञान आहे, ते दिले जावे.’’
बानासकंटा येथील शेतकरी तीन रुपये किलोने बटाटे विकत आहेत. बटाट्याचे हे दर त्यांना आनंदी ठेवण्यास उपयुक्त आहेत का? आम्ही येथे शेतकऱ्यांच्या मनातून भीती काढून टाकण्यासाठी आलो आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, असे श्री. टिकैत म्हणाले.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.