[ad_1]
नाशिक : ‘‘शेतीसोबत जोडधंदा केल्यास रोजगार निर्मितीसह आर्थिक स्रोत वाढण्यास मदत होते. त्यासाठी मशरूम उत्पादन करण्याचा पर्याय निवडला आहे. या प्रक्रियेत पुरुषांबरोबर महिला काम करत आहेत. ही जमेची बाजू आहे. त्यामुळे उत्पादन करताना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन सुरू आहे. उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनासाठी आदिवासी भागात प्रयत्न सुरू आहे,’’ असे प्रतिपादन नाशिक येथील ”आत्मा”चे प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)तर्फे बुधवारी (ता.९) गावंधपाडा (ता.पेठ) येथे कौशल्य आधारित कामे करणाऱ्या शेतमजुरांना मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ कृषी अधिकारी डॉ. श्रीरंग वाघ, मुकेश महाजन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, कृषी सहायक सुरेश शेळके, विकास गडाख, रणजित आंधळे, विष्णू पवार, विनायक गायकवाड आदींची उपस्थिती होती.
काळे म्हणाले, ‘‘कामाचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. या माध्यमातून ”उत्पादन ते विक्री” प्रक्रिया सुलभ होईल. स्थानिक उत्पादनाचे पौष्टिक गुणधर्म ओळखून त्याचा प्रचार प्रसार केल्यास बाजारपेठ काबीज करता येईल.’’
पगारे म्हणाले, ‘विकेल ते पिकेल’ या उपक्रमाद्वारे भात व नागली पीक निवडले आहे. यातून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून विक्री व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आहे. या भागात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने कृषी विभाग प्रोत्साहनपर मदत देणार आहे. तालुक्यातील स्थानिक स्रोत ओळखून काम करून अर्थकारण उंचावण्यासाठी सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे.’’
या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, नाशिकच्या गृह विज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ अर्चना देशमुख, मशरूम उत्पादक किरण पवार, चेतना पवार यांनी मशरूम उत्पादन, विक्री व मूल्यवर्धन, यासंबंधी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात सहभागी शेतकऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण केले. सूत्रसंचालन डॉ. वाघ यांनी केले. आंधळे यांनी आभार मानले.
नाशिक : ‘‘शेतीसोबत जोडधंदा केल्यास रोजगार निर्मितीसह आर्थिक स्रोत वाढण्यास मदत होते. त्यासाठी मशरूम उत्पादन करण्याचा पर्याय निवडला आहे. या प्रक्रियेत पुरुषांबरोबर महिला काम करत आहेत. ही जमेची बाजू आहे. त्यामुळे उत्पादन करताना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन सुरू आहे. उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनासाठी आदिवासी भागात प्रयत्न सुरू आहे,’’ असे प्रतिपादन नाशिक येथील ”आत्मा”चे प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)तर्फे बुधवारी (ता.९) गावंधपाडा (ता.पेठ) येथे कौशल्य आधारित कामे करणाऱ्या शेतमजुरांना मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ कृषी अधिकारी डॉ. श्रीरंग वाघ, मुकेश महाजन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, कृषी सहायक सुरेश शेळके, विकास गडाख, रणजित आंधळे, विष्णू पवार, विनायक गायकवाड आदींची उपस्थिती होती.
काळे म्हणाले, ‘‘कामाचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. या माध्यमातून ”उत्पादन ते विक्री” प्रक्रिया सुलभ होईल. स्थानिक उत्पादनाचे पौष्टिक गुणधर्म ओळखून त्याचा प्रचार प्रसार केल्यास बाजारपेठ काबीज करता येईल.’’
पगारे म्हणाले, ‘विकेल ते पिकेल’ या उपक्रमाद्वारे भात व नागली पीक निवडले आहे. यातून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून विक्री व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आहे. या भागात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने कृषी विभाग प्रोत्साहनपर मदत देणार आहे. तालुक्यातील स्थानिक स्रोत ओळखून काम करून अर्थकारण उंचावण्यासाठी सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे.’’
या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, नाशिकच्या गृह विज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ अर्चना देशमुख, मशरूम उत्पादक किरण पवार, चेतना पवार यांनी मशरूम उत्पादन, विक्री व मूल्यवर्धन, यासंबंधी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात सहभागी शेतकऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण केले. सूत्रसंचालन डॉ. वाघ यांनी केले. आंधळे यांनी आभार मानले.
[ad_2]
Source link