[ad_1]
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यात ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या गावांमधील बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली होती. अशा सर्व पशुपालकांना त्यांच्या पशुधन मृत्यूप्रकरणी अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केली होती. त्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली असून, या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी मदत व पुनर्वसन खात्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. यानुसार सुमारे पावणेतीन कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळतील, असे दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे.
तालुक्यात ऑगस्ट २०२१ मध्ये अतिवृष्टी झाली होती. पुराच्या पाण्यात तालुक्यातील वाघळी, वाकडीसह नदीकाठच्या काही गावांमधील बऱ्याच शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, बैल, वासरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या वाहून मृत्युमुखी पडल्या होत्या. ज्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा संबंधित विभागाने पंचनामा करून अहवाल शासनाला सादर केला होता. मात्र, अद्यापपर्यंत एकाही पशुपालकाला एक रुपयाचीदेखील मदत शासनाकडून झालेली नव्हती. या संदर्भात जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तालुक्यातील पशुपालकांच्या झालेल्या नुकसानाची त्यांनी सविस्तर माहिती देऊन पशुधनाच्या मृत्यूप्रकरणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यात ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या गावांमधील बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली होती. अशा सर्व पशुपालकांना त्यांच्या पशुधन मृत्यूप्रकरणी अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केली होती. त्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली असून, या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी मदत व पुनर्वसन खात्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. यानुसार सुमारे पावणेतीन कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळतील, असे दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे.
तालुक्यात ऑगस्ट २०२१ मध्ये अतिवृष्टी झाली होती. पुराच्या पाण्यात तालुक्यातील वाघळी, वाकडीसह नदीकाठच्या काही गावांमधील बऱ्याच शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, बैल, वासरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या वाहून मृत्युमुखी पडल्या होत्या. ज्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा संबंधित विभागाने पंचनामा करून अहवाल शासनाला सादर केला होता. मात्र, अद्यापपर्यंत एकाही पशुपालकाला एक रुपयाचीदेखील मदत शासनाकडून झालेली नव्हती. या संदर्भात जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तालुक्यातील पशुपालकांच्या झालेल्या नुकसानाची त्यांनी सविस्तर माहिती देऊन पशुधनाच्या मृत्यूप्रकरणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.
[ad_2]
Source link