[ad_1]
जळगाव : एकीकडे उडदाचे मोठे नुकसान अतिपावसात झाले आहे. दुसरीकडे उडदाचे दर मळणी सुरू असतानाच पाडण्यात आले आहेत. १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर जळगाव, अमळनेर, चोपडा येथील बाजारात सांगितला जात आहे. बाजारात आवक नगण्य आहे. परंतु जशी आवक वाढेल, तशी खरेदीदारांकडून अल्प दरात खरेदी सुरू होईल. मंदीचे कारण सांगून जळगाव बाजार समितीत इतर धान्याची खरेदी केली जात आहे.
जळगाव बाजार समिती जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. परंतु, या बाजार समितीत कुठलेही लिलाव होत नाहीत. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी इतर भागात जावे लागत आहे. या बाजार समितीमधील अडतदार, खरेदीदार सध्या नियमनमुक्तीचा लाभ घेत असून, थेट लातूर, जालना, बुलडाणा, औरंगाबाद भागातील मोठ्या खरेदीदारांकडून शेतमालाची खरेदी करून घेत आहेत.
बाजार समितीबाहेर हे व्यवहार सुरू आहे. खरेदीनंतर थेट डाळ मिला किंवा प्रक्रिया उद्योगात उडीद, मूग पाठविला जात आहे. किरकोळ व्यापार, व्यवहार बाजार समितीत करायचाच नाही, असा पवित्रा किंवा भूमिका काही अडतदारांनी घेतली आहे. नुकसान होत आहे. मंदी आहे, अशी कारणे खरेदीदार सांगत आहेत. एका शेतकऱ्याची ज्वारी व बाजरी मागील तीन महिन्यांपासून एका अडतदाराकडे तशीच पडून आहे. तिचा लिलावही झालेला नाही. अडतदार मनमानी कारभार करीत असून, शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला शेतमाल घरी परत घेवून जावा लागत आहे.
बाजरीची खरेदी अडतदार करीत नाहीत. बाजरीचे दरही १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कुणी खरेदीच करीत नाही. आम्ही कशाला त्याचा साठा करू, अशी बतावणी अडतदार, किरकोळ व्यापारी करीत आहेत. यामुळे शेतकरी बाजार समितीमध्ये नाडला जात आहे. याबाबत कुणीही आवाज उठवायला तयार नाही. अडतदारांची मनमानी आता खरीप हंगाम संपत असताना पुन्हा सुरू झाली असून, मूग, उडदाचे दर पाडले आहेत.
मुगाला २५०० ते ७००० रूपये दर
मुगाचे दर जळगाव बाजार समितीत २५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर, उडदाचे दरही १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दर्जा खराब असल्याचे कारण अडतदार सांगत आहेत. या आठवड्यात उडदाची काही अडतदारांकडे आवक झाली. परंतु त्याचा लिलाव जळगाव बाजार समितीत झाला नाही.
यावल, जळगाव भागातील काही शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी चोपडा, अमळनेर भागात घेवून जात आहेत. तेथेही दर कमी आहेत. या आठवड्यात उडदाची सरासरी प्रतिदिन पाच हजार क्विंटल आवक जळगाव, चोपडा व अमळनेर येथील बाजारात झाली आहे.
जळगाव : एकीकडे उडदाचे मोठे नुकसान अतिपावसात झाले आहे. दुसरीकडे उडदाचे दर मळणी सुरू असतानाच पाडण्यात आले आहेत. १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर जळगाव, अमळनेर, चोपडा येथील बाजारात सांगितला जात आहे. बाजारात आवक नगण्य आहे. परंतु जशी आवक वाढेल, तशी खरेदीदारांकडून अल्प दरात खरेदी सुरू होईल. मंदीचे कारण सांगून जळगाव बाजार समितीत इतर धान्याची खरेदी केली जात आहे.
जळगाव बाजार समिती जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. परंतु, या बाजार समितीत कुठलेही लिलाव होत नाहीत. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी इतर भागात जावे लागत आहे. या बाजार समितीमधील अडतदार, खरेदीदार सध्या नियमनमुक्तीचा लाभ घेत असून, थेट लातूर, जालना, बुलडाणा, औरंगाबाद भागातील मोठ्या खरेदीदारांकडून शेतमालाची खरेदी करून घेत आहेत.
बाजार समितीबाहेर हे व्यवहार सुरू आहे. खरेदीनंतर थेट डाळ मिला किंवा प्रक्रिया उद्योगात उडीद, मूग पाठविला जात आहे. किरकोळ व्यापार, व्यवहार बाजार समितीत करायचाच नाही, असा पवित्रा किंवा भूमिका काही अडतदारांनी घेतली आहे. नुकसान होत आहे. मंदी आहे, अशी कारणे खरेदीदार सांगत आहेत. एका शेतकऱ्याची ज्वारी व बाजरी मागील तीन महिन्यांपासून एका अडतदाराकडे तशीच पडून आहे. तिचा लिलावही झालेला नाही. अडतदार मनमानी कारभार करीत असून, शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला शेतमाल घरी परत घेवून जावा लागत आहे.
बाजरीची खरेदी अडतदार करीत नाहीत. बाजरीचे दरही १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कुणी खरेदीच करीत नाही. आम्ही कशाला त्याचा साठा करू, अशी बतावणी अडतदार, किरकोळ व्यापारी करीत आहेत. यामुळे शेतकरी बाजार समितीमध्ये नाडला जात आहे. याबाबत कुणीही आवाज उठवायला तयार नाही. अडतदारांची मनमानी आता खरीप हंगाम संपत असताना पुन्हा सुरू झाली असून, मूग, उडदाचे दर पाडले आहेत.
मुगाला २५०० ते ७००० रूपये दर
मुगाचे दर जळगाव बाजार समितीत २५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर, उडदाचे दरही १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दर्जा खराब असल्याचे कारण अडतदार सांगत आहेत. या आठवड्यात उडदाची काही अडतदारांकडे आवक झाली. परंतु त्याचा लिलाव जळगाव बाजार समितीत झाला नाही.
यावल, जळगाव भागातील काही शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी चोपडा, अमळनेर भागात घेवून जात आहेत. तेथेही दर कमी आहेत. या आठवड्यात उडदाची सरासरी प्रतिदिन पाच हजार क्विंटल आवक जळगाव, चोपडा व अमळनेर येथील बाजारात झाली आहे.
[ad_2]
Source link